शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

कुणबी व्हिलेज साकारू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2025 09:43 IST

आदिरंगोत्सव महोत्सवाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : 'आज आमच्या पारंपरिक गोष्टींचे महत्त्व आम्हालाच माहीत नाही, अशी स्थिती आहे. पिढीजात चालत आलेल्या आमच्या काही गोष्टींचे मूल्यमापन इतर लोक जाणून आहेत. आमची संस्कृती, परंपरा, आमचे पारंपरिक उद्योग, व्यवसाय व त्यातून निर्माण होणाऱ्या वस्तूंचे महत्त्व जाणून घेण्याची गरज आहे. याच विचाराने प्रेरित होऊन आम्ही केंद्र सरकारच्या सहकार्यातून 'कुणबी व्हिलेज' ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

भूमिपुत्र सेवा संघटनेने आयोजित केलेल्या आदिरंगोत्सव कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, हस्तकला महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय गावडे, भूमिपुत्र सेवा संघटनेचे अध्यक्ष डॉ. वेंकू गावडे व्यासपीठावर उपस्थित होते.

विकासाचे स्वप्न

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'आज प्रत्येक क्षेत्रात संशोधन करण्यासाठी युवकांनी पुढे यायला हवे. क्रांतिकारक समाज परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही सुविधा निर्माण करत आहोत. युवकांच्या स्वप्नांना पाठबळ देणाऱ्या सामाजिक संस्था निर्माण झाल्या तर पंतप्रधानांचे विकसित भारत हे स्वप्न सत्यात उतरेल.'

अंत्योदय तत्त्वावर काम

मुख्यमंत्री म्हणाले की, 'मी राजकारणात सक्रिय आहे, ते स्वतःसाठी नाही तर अंत्योदय तत्त्वावर काम करण्यासाठी. तळागाळातील शेवटची व्यक्ती वंचित राहणार नाही, यासाठी लक्ष देत आहे. सरकारचा प्रत्येक घटक हा सामान्य लोकांसाठी झटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा आज विकास व परंपरा या दोन गोष्टींवर भर देत आहेत.'

सामान्य लोकांचा विचार करा

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'जीवन जगत असताना फक्त घेणे ही वृत्ती बदलायची वेळ आली आहे. आजघडीला आपण समाजाला व समाजातील प्रत्येक घटकाला काय देऊ शकतो, याचा विचार व्हायला हवा. त्याचवेळी अंत्योदय तत्त्वावर माणुसकीचे जतन केले जावे, या विचाराला प्राधान्य द्या. आज आरक्षणाच्या माध्यमातून जे लोक उच्च पदावर पोहोचले आहेत, त्यांनी आपल्या अधिकारपदाचा वापर हा आपल्या समाजातील लोकांबरोबरच, सामान्य लोकांच्या कल्याणासाठी करायला हवा. समाजाचा उद्धार करत असताना आपले कुटुंब, आपले आप्तेष्ट यांचा फक्त विचार करू नका. त्याच्या पलीकडे जाऊन विचार करा.'

आदिवासी परंपरेचा गौरव

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'बिरसा मुंडा यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्याचे काम आम्ही केले आहे. दहा वर्षांपूर्वी बिरसा मुंडांचे नाव क्वचितच कुणाला माहीत होते. आदिवासी परंपरा ही आमची राष्ट्रीय परंपरा आहे हे ठळकपणे आज कार्यक्रमाद्वारे आम्ही दाखवून देत आहोत. आमच्या उज्ज्वल चालीरिती सांभाळून विकास आम्ही घडवत आहोत. हे सर्व करत असताना अत्याधुनिक तंत्रज्ञान बरोबर घेऊन आम्ही जाणार आहोत.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत