शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कुणबी व्हिलेज साकारू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2025 09:43 IST

आदिरंगोत्सव महोत्सवाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : 'आज आमच्या पारंपरिक गोष्टींचे महत्त्व आम्हालाच माहीत नाही, अशी स्थिती आहे. पिढीजात चालत आलेल्या आमच्या काही गोष्टींचे मूल्यमापन इतर लोक जाणून आहेत. आमची संस्कृती, परंपरा, आमचे पारंपरिक उद्योग, व्यवसाय व त्यातून निर्माण होणाऱ्या वस्तूंचे महत्त्व जाणून घेण्याची गरज आहे. याच विचाराने प्रेरित होऊन आम्ही केंद्र सरकारच्या सहकार्यातून 'कुणबी व्हिलेज' ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

भूमिपुत्र सेवा संघटनेने आयोजित केलेल्या आदिरंगोत्सव कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, हस्तकला महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय गावडे, भूमिपुत्र सेवा संघटनेचे अध्यक्ष डॉ. वेंकू गावडे व्यासपीठावर उपस्थित होते.

विकासाचे स्वप्न

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'आज प्रत्येक क्षेत्रात संशोधन करण्यासाठी युवकांनी पुढे यायला हवे. क्रांतिकारक समाज परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही सुविधा निर्माण करत आहोत. युवकांच्या स्वप्नांना पाठबळ देणाऱ्या सामाजिक संस्था निर्माण झाल्या तर पंतप्रधानांचे विकसित भारत हे स्वप्न सत्यात उतरेल.'

अंत्योदय तत्त्वावर काम

मुख्यमंत्री म्हणाले की, 'मी राजकारणात सक्रिय आहे, ते स्वतःसाठी नाही तर अंत्योदय तत्त्वावर काम करण्यासाठी. तळागाळातील शेवटची व्यक्ती वंचित राहणार नाही, यासाठी लक्ष देत आहे. सरकारचा प्रत्येक घटक हा सामान्य लोकांसाठी झटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा आज विकास व परंपरा या दोन गोष्टींवर भर देत आहेत.'

सामान्य लोकांचा विचार करा

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'जीवन जगत असताना फक्त घेणे ही वृत्ती बदलायची वेळ आली आहे. आजघडीला आपण समाजाला व समाजातील प्रत्येक घटकाला काय देऊ शकतो, याचा विचार व्हायला हवा. त्याचवेळी अंत्योदय तत्त्वावर माणुसकीचे जतन केले जावे, या विचाराला प्राधान्य द्या. आज आरक्षणाच्या माध्यमातून जे लोक उच्च पदावर पोहोचले आहेत, त्यांनी आपल्या अधिकारपदाचा वापर हा आपल्या समाजातील लोकांबरोबरच, सामान्य लोकांच्या कल्याणासाठी करायला हवा. समाजाचा उद्धार करत असताना आपले कुटुंब, आपले आप्तेष्ट यांचा फक्त विचार करू नका. त्याच्या पलीकडे जाऊन विचार करा.'

आदिवासी परंपरेचा गौरव

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'बिरसा मुंडा यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्याचे काम आम्ही केले आहे. दहा वर्षांपूर्वी बिरसा मुंडांचे नाव क्वचितच कुणाला माहीत होते. आदिवासी परंपरा ही आमची राष्ट्रीय परंपरा आहे हे ठळकपणे आज कार्यक्रमाद्वारे आम्ही दाखवून देत आहोत. आमच्या उज्ज्वल चालीरिती सांभाळून विकास आम्ही घडवत आहोत. हे सर्व करत असताना अत्याधुनिक तंत्रज्ञान बरोबर घेऊन आम्ही जाणार आहोत.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत