शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पुढील पाच वर्षात गोव्यात ५० हजार कोटींचे प्रकल्प आणू - नीतीन गडकरी 

By किशोर कुबल | Updated: July 12, 2024 16:21 IST

ताळगांव येथील कम्युनिटी हॉलमध्ये झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीवेळी ते बोलत होते.

पणजी : गोव्याच्या विकासासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे. पुढील पाच वर्षात राज्यात ५० हजार कोटींचे प्रकल्प आणू, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी यांनी जाहीर केले.

ताळगांव येथील कम्युनिटी हॉलमध्ये झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीवेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले की,  देशातील पहिल्या पाच सुंदर राज्यांमध्ये गोव्याला स्थान मिळावे या दृष्टिकोनातून गोव्याचा कायापालट केला जाईल. मोठ्या प्रमाणात येथे विकासकामे केली जातील. त्यासाठी गोव्याला केवळ प्रामाणिक नेत्यांची गरज आहे.'

या बैठकीला मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे मंत्रिमंडळातील इतर मंत्री, आमदार, पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

गडकरी उपस्थित नेत्यांना उद्देशून म्हणाले की, 'तुम्ही जे काही चांगले अथवा वाईट करता त्याची संपूर्ण माहिती तुमच्या मतदारांकडे असते. राजकारण्यांचे खरे तर हे परफॉर्मन्स ऑडिटच असते.  पुढील दोन वर्षात चांगले काम करा, त्यामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपचे सरकार सत्तेवर येईल.

'लोकांची नाराजी जाणून घ्या'

गडकरी यांनी असा सल्ला दिला की, लोकांची सरकारबद्दल काय नाराजी आहे, हे सर्व क्षण करून जाणून घ्या. गाफील राहू नका. त्यामुळे आपले कुठे काय चुकते, हेही कळून येईल आणि त्यानुसार सुधारणा करता येतील.

टॅग्स :goaगोवाNitin Gadkariनितीन गडकरी