शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

फोंडा तालुक्याची तहान भागवणाऱ्या दूधसागर नदीची पाणी पातळी घटली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2023 18:34 IST

फोंडा तालुक्याची तहान भागवणाऱ्या दूधसागर नदीची पाणी पातळी घटली आहे. 

अजय बुवा

फोंडा : संपूर्ण तिसवाडी व फोंडा तालुक्याची तहान भागवणाऱ्या दूधसागर नदीच्या पाण्याची पातळी कमालीची खाली आली असून, आठ दिवसाच्या आत13 पैकी तीन बंधारे  सोडण्यात आले आहेत. असे असतानाही पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे. पाण्याची पातळी वाढली नाही तर संपूर्ण फोंडा तालुक्या बरोबरच तिसवाडी तालुक्याला पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू शकते.

आमच्या प्रतिनिधीने ओपा येथील पाणी प्रक्रिया प्रकल्पाला भेट देऊन नदीची पाहणी केली असता  मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याची पातळी बरीच खाली आढळून आली. गेल्या दहा दिवसापासून कुळे परिसरातील दोन बंधारे खुले करण्यात आले होते. गुरुवारी आणखीन एक बंधारा खुला करण्यात आला आहे. पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी जलस्त्रोत तसेच बांधकाम खात्याचे अभियंते कसोशीने प्रयत्न करत आहेत. 

ओपा पाणी प्रक्रिया प्रकल्पा मध्ये चार मीटर पाणी असणे गरजेचे असते. सध्या या पाण्याची पातळी 2. 70 मीटर असून पाहण्या पाण्याची पातळी 2.40 मीटर पर्यंत आल्यानंतर फोंडा व तिसवाडी तालुक्यात मर्यादित पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी 2020 साली ओपा प्रकल्पाला पाण्याची अशीच समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी जलस्त्रोत खात्यातर्फे धारबांदोडा तालुक्यातील विविध खाणीचे पाणी दूधसागर नदीत सोडण्यात आले होते. जेणेकरून दूधसागर नदीची पातळी राखली जाईल. त्यावेळी सदर प्रयोग यशस्वी ठरला होता  यावेळी सुद्धा पाण्याची पातळी राखण्याकरता व दोन्ही महत्त्वाच्या तालुक्याला सुरळीत पाणीपुरवठा करण्याकरता खनिज खंदकातील पाणी पुन्हा एकदा दूधसागर नदीत सोडण्याची प्रक्रिया त्वरित हाती घ्यावी लागेल. या संदर्भात जलस्त्रोत खात्याचे अभियंते सुद्धा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली आहे. अभियंताची प्रतिक्रिया:-दूधसागर नदीच्या पाण्याचे पातळी कमी होत आहे ही वस्तुस्थिती आहे. जलस्त्रोत खात्याने कुळे परिसरातील बंधारे सुद्धा खुले केले आहेत .पाण्याची पातळी अशीच जर खाली येत राहिल्यास  लोकांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. यंदा पाऊस सुद्धा तुलनेने तसा कमीच पडला आहे. नागरिकांनी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. जयंत प्रभू, सहाय्यक अभियंता 

ओपा पाणी प्रक्रिया प्रकल्प, पाणी नेमके जाते कुठे फोंड्यात नदी,ओहोळ, नाल्यांची काही कमी नाही. धारबांदोडा तालुक्यात  नदीवर लहान एम एल डी चे पाणी प्रक्रिया प्रकल्प राबवून पाणीपुरवठा होत आहे. तीच पद्धत कुठेतरी फोंडा तालुक्यातील नदीवर सुद्धा राबवण्याची वेळ आलेली आहे. मुबलक पाणीसाठा असताना सुद्धा दूधसागर नदीच्या पात्रात मात्र का कमी पाणी मिळते याची शहनशा व्हायला हवी. पूर्वीसारखे सगळे नाले व ओहोळ नदीला मिळाले तर दूधसागर नदीचे पाणी कधीच कमी होणार नाही. परंतु आज काही ठिकाणी नदी व ओहळाचे पाणी अडवण्यात आल्याचे सरास आढळून येत आहे. खांडेपार येथे तर अशी चर्चा आहे की खांडेपार ओहोळाचे पाणी अडवून ते चक्क टँकर मध्ये भरण्यात येत आहे.  ही बाब जर खरी असेल तर पाणी विभागाच्या अभियंतानी तिथे जाऊन त्या संपूर्ण ओव्हाळाची पाहणी करायला हवी. नेमके पाणी कोण अडवतो याची माहिती घ्यायला हवी. ते टँकर कुणाचे हे पण जाणून घ्यायला हवे.

पाऊस लवकर येणे गरजेचेज्या तऱ्हेने  तापमान वाढलेले आहे ते  पाहता त्याचे परिणाम नदीवर सुद्धा होऊ शकतात. नदी आटण्याचे प्रमाण जोर धरू शकते. तेव्हा ठीक ठिकाणी लहानसहान बंधारे घालून पाणी अडवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ओहोळ व नाल्यातले पाणी नदीत सोडण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. किंवा यावर्षी पाऊस लवकर यावा म्हणून देवाकडे याचना करावी लागेल.

 

टॅग्स :goaगोवाriverनदी