शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

फोंडा तालुक्याची तहान भागवणाऱ्या दूधसागर नदीची पाणी पातळी घटली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2023 18:34 IST

फोंडा तालुक्याची तहान भागवणाऱ्या दूधसागर नदीची पाणी पातळी घटली आहे. 

अजय बुवा

फोंडा : संपूर्ण तिसवाडी व फोंडा तालुक्याची तहान भागवणाऱ्या दूधसागर नदीच्या पाण्याची पातळी कमालीची खाली आली असून, आठ दिवसाच्या आत13 पैकी तीन बंधारे  सोडण्यात आले आहेत. असे असतानाही पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे. पाण्याची पातळी वाढली नाही तर संपूर्ण फोंडा तालुक्या बरोबरच तिसवाडी तालुक्याला पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू शकते.

आमच्या प्रतिनिधीने ओपा येथील पाणी प्रक्रिया प्रकल्पाला भेट देऊन नदीची पाहणी केली असता  मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याची पातळी बरीच खाली आढळून आली. गेल्या दहा दिवसापासून कुळे परिसरातील दोन बंधारे खुले करण्यात आले होते. गुरुवारी आणखीन एक बंधारा खुला करण्यात आला आहे. पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी जलस्त्रोत तसेच बांधकाम खात्याचे अभियंते कसोशीने प्रयत्न करत आहेत. 

ओपा पाणी प्रक्रिया प्रकल्पा मध्ये चार मीटर पाणी असणे गरजेचे असते. सध्या या पाण्याची पातळी 2. 70 मीटर असून पाहण्या पाण्याची पातळी 2.40 मीटर पर्यंत आल्यानंतर फोंडा व तिसवाडी तालुक्यात मर्यादित पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी 2020 साली ओपा प्रकल्पाला पाण्याची अशीच समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी जलस्त्रोत खात्यातर्फे धारबांदोडा तालुक्यातील विविध खाणीचे पाणी दूधसागर नदीत सोडण्यात आले होते. जेणेकरून दूधसागर नदीची पातळी राखली जाईल. त्यावेळी सदर प्रयोग यशस्वी ठरला होता  यावेळी सुद्धा पाण्याची पातळी राखण्याकरता व दोन्ही महत्त्वाच्या तालुक्याला सुरळीत पाणीपुरवठा करण्याकरता खनिज खंदकातील पाणी पुन्हा एकदा दूधसागर नदीत सोडण्याची प्रक्रिया त्वरित हाती घ्यावी लागेल. या संदर्भात जलस्त्रोत खात्याचे अभियंते सुद्धा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली आहे. अभियंताची प्रतिक्रिया:-दूधसागर नदीच्या पाण्याचे पातळी कमी होत आहे ही वस्तुस्थिती आहे. जलस्त्रोत खात्याने कुळे परिसरातील बंधारे सुद्धा खुले केले आहेत .पाण्याची पातळी अशीच जर खाली येत राहिल्यास  लोकांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. यंदा पाऊस सुद्धा तुलनेने तसा कमीच पडला आहे. नागरिकांनी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. जयंत प्रभू, सहाय्यक अभियंता 

ओपा पाणी प्रक्रिया प्रकल्प, पाणी नेमके जाते कुठे फोंड्यात नदी,ओहोळ, नाल्यांची काही कमी नाही. धारबांदोडा तालुक्यात  नदीवर लहान एम एल डी चे पाणी प्रक्रिया प्रकल्प राबवून पाणीपुरवठा होत आहे. तीच पद्धत कुठेतरी फोंडा तालुक्यातील नदीवर सुद्धा राबवण्याची वेळ आलेली आहे. मुबलक पाणीसाठा असताना सुद्धा दूधसागर नदीच्या पात्रात मात्र का कमी पाणी मिळते याची शहनशा व्हायला हवी. पूर्वीसारखे सगळे नाले व ओहोळ नदीला मिळाले तर दूधसागर नदीचे पाणी कधीच कमी होणार नाही. परंतु आज काही ठिकाणी नदी व ओहळाचे पाणी अडवण्यात आल्याचे सरास आढळून येत आहे. खांडेपार येथे तर अशी चर्चा आहे की खांडेपार ओहोळाचे पाणी अडवून ते चक्क टँकर मध्ये भरण्यात येत आहे.  ही बाब जर खरी असेल तर पाणी विभागाच्या अभियंतानी तिथे जाऊन त्या संपूर्ण ओव्हाळाची पाहणी करायला हवी. नेमके पाणी कोण अडवतो याची माहिती घ्यायला हवी. ते टँकर कुणाचे हे पण जाणून घ्यायला हवे.

पाऊस लवकर येणे गरजेचेज्या तऱ्हेने  तापमान वाढलेले आहे ते  पाहता त्याचे परिणाम नदीवर सुद्धा होऊ शकतात. नदी आटण्याचे प्रमाण जोर धरू शकते. तेव्हा ठीक ठिकाणी लहानसहान बंधारे घालून पाणी अडवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ओहोळ व नाल्यातले पाणी नदीत सोडण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. किंवा यावर्षी पाऊस लवकर यावा म्हणून देवाकडे याचना करावी लागेल.

 

टॅग्स :goaगोवाriverनदी