शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 19:19 IST

वाहतूक पोलिसांच्या कर्तृत्वाला सलाम : धूळ, धुराचे प्रदूषण सोसत आरोग्याची होते आबाळ

वासुदेव पागी/पणजी : ‘तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो... मी बीज सावलीचे पेरीत चाललो...’ अशीच काहीशी अवस्था गोव्याच्या वाहतूक पोलिसांची उन्हाळ्यात झालेली दिसते. रखरखते ऊन असो किंवा मुसळधार पाऊस, परिस्थितीची वा परिणामांची तमा न बाळगता त्यांना कर्तव्यनिष्ठेशी ठाम राहावे लागते. ग्रीष्माचा दाह सोसून शरीरे भाजल्यागत काळी कुळकुळीत होतात, धूळ व धुराचे प्रदूषण सोसून आरोग्याची आबाळ होते, अशा वाहतूक विभागात कुणीही स्वखुशीने येत नसतो; परंतु कर्तव्यभावनेमुळे ते याही परिस्थितीचा सामना करतात.उन्हात त्वचा रापल्यामुळे काळे पडणारे अंग व व पांढराशुभ्र गणवेश यामुळे  वाहतूक पोलिसांची थट्टा केली जाते. त्यांना नावे ठेवणे सोपे असते; परंतु त्यांची तशी स्थिती का होते, हे समजून घेतले, तर त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावे लागते याची कल्पना येते. गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागाची राज्यात १२ पोलीस स्थानके आहेत. एकूण ५५० पोलीस कर्मचारी आहेत. ज्यांना प्रत्यक्ष रस्त्यावर राहून काम करावे लागते, असे कॉन्स्टेबलपासून उपनिरीक्षकापर्यंतचे ५०० कर्मचारी आहेत. अशा १० कर्मचा-यांशी प्रस्तुत प्रतिनिधीने संवाद साधला असता, त्यांनी व्यथा कथन केल्या.१२ तास ड्युटी करणे अडचणीचे नाही; परंतु ही ड्युटी प्रत्येक दिवशी रस्त्यावर रणरणत्या उन्हात करावी लागते, तेव्हा यातना होतात. घामाच्या धारांनी कपडेही भिजून जातात. त्यातही मधुमेह व रक्तदाबाची समस्या असलेले अनेक पोलीस असल्यामुळे आरोग्य बिघडण्याचा धोका असतो. उन्हात चक्कर येऊन कोसळण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. आज उन्हात राहिलेला पोलीस पुन्हा दुस-या दिवशी उन्हात ड्युटी न करता इतर ठिकाणी ड्युटी करू शकेल, अशी व्यवस्था केली तर त्यांच्या यातना कमी होऊ शकतात. शिवाय उन्हाळ्यात लांब हातमोजे, मास्क यांसारखे साहित्य त्यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. हातमोजे केवळ व्हीआयपींचा प्रवास असतानाच वापरले जात आहेत. वारंवार ठप्प होणारी वाहतूक ही पोलिसांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ असते. त्यावेळी त्यांना फारच धावपळ करावी लागते.  कमी सिग्नल, अधिक ताणक्रॉसिंगच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांना सर्वाधिक वेळ द्यावा लागतो. चार किंवा अधिक रस्त्यांच्या ठिकाणी पोलिसांना वाहनांना रस्ता पार करण्यासाठी सतत हालचाली करून निर्देश द्यावे लागतात. ज्या ठिकाणी स्वयंचलित सिग्नल्स कार्यान्वित आहेत, अशा ठिकाणी वाहतूक कर्मचा-याला फारसे सायास पडत नाहीत. त्यामुळे तो केवळ परिस्थितीवर लक्ष ठेवून निर्धास्त राहू शकतो. पणजीसारख्या शहरातही दिवजा सर्कल, सांतइनेज व इतर अनेक जंक्शन्सवर सिग्नल लावलेले नाहीत. 

पोलिसांना नावे ठेवणे सोपे असते; परंतु तासन्तास उन्हात राहून पोलीस वाहतूक व्यवस्था सुरळीत करतात. एक दिवस वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरले नाहीत, तर वाहतुकीची काय दशा होईल, याचा विचार केल्यास त्यांचे महत्त्व जाणवेल. पोलिसांच्या सेवेत दर्जात्मक सुधारणा होताना दिसत आहेत.- धर्मेश आंगले, उपअधीक्षक, वाहतूक विभाग

आमचे पोलीस कठीण परिस्थितीतही सेवा बजावत आहेत. ते उन्हापावसाची तमा बाळगत नाहीत. त्यांच्या कार्याची आम्हाला जाणीव आहे व अभिमानही आहे.- ब्रॅँडन डिसोझा, निरीक्षक, वाहतूक विभाग

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस