शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वेलिंगकर-ढवळीकरांचा राष्ट्रवादाआडून महाराष्ट्रवाद - विजय सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 17:22 IST

ओपिनियन पोलच्या मुद्दय़ावरुन राजकारण  करणारे गोवा सुरक्षा मंचाचे सुभाष वेलिंगकर आणि मगोचे सुदीन ढवळकर हे दोघेही राष्ट्रवादाच्या नावाखाली अजूनही महाराष्ट्रवादच करत आहेत

मडगाव - ओपिनियन पोलच्या मुद्दय़ावरुन राजकारण  करणारे गोवा सुरक्षा मंचाचे सुभाष वेलिंगकर आणि मगोचे सुदीन ढवळकर हे दोघेही राष्ट्रवादाच्या नावाखाली अजूनही महाराष्ट्रवादच करत आहेत. ओपिनियन पोलच्यावेळी आपण लोकांबरोबर होतो असे म्हणणाऱ्यांनी त्यावेळी गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व राहावे यासाठी मतदान केले की विलिनीकरणाच्या बाजूने, असा सवाल नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी केला.

ओपिनियन पोल संदर्भात वक्तव्य करून सरदेसाई यांनी स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी आपले शब्द मागे घेत माफी मागावी अन्यथा 26 जानेवारीच्या कार्यक्रमात त्यांना काळे झेंडे दाखविण्यात येतील, असा इशारा वेलिंगकर यांनी दिला होता. त्याचा समाचार घेताना सरदेसाई म्हणाले, ज्यावेळी गोवा मुक्त झाला त्यावेळी त्यावेळचे प्रधानमंत्री पं. नेहरू यांनी भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले, असे वक्तव्य केले होते. त्याच धर्तीवर आपण ओपिनियन पोल जिंकल्यावर गोवा खऱ्या अर्थाने मुक्त झालो, असे वक्तव्य केले होते. गोवा मुक्तीने गोमंतकीयांना भारतीय बनविले. मात्र ते खऱ्या अर्थाने गोंयकार ओपिनियन पोलच्या निकालानंतरच झाले. हे माझे ठाम मत असून, त्यासाठी मी कुणाचीही माफी मागणार नाही. जर कुणाला काळे झेंडे दाखवायचे असतील तर त्यांनी अवश्य दाखवावेत त्यांनाही आम्ही पाहून घेऊ, असे प्रतिआव्हान सरदेसाई यांनी दिले.सोमवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सरदेसाई म्हणाले, गोवा मुक्ती लढय़ातील स्वातंत्र्य सैनिकांबद्दल मला आदर आहे, किंबहुना गोवा मुक्ती लढा आणि विलिनीकरणविरोधी लढा या दोन्ही लढय़ांशी माझ्या  कुटुंबियांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे मी स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणो शक्यच नाही. माझे घर गोवा मुक्ती लढय़ातील स्वातंत्र्य सैनिकांचा अड्डा होता त्यामुळेच माझे वडील ज्यावेळी अमेरिकेतून लिस्बनमध्ये गेले त्यावेळी त्यांचा पासपोर्ट पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अराष्ट्रीय असा ठपका ठेवून बाहेर फेकून दिला होता. पोर्तुगालच्या दफ्तरात अजूनही ही नोंद आहे. त्यामुळे राष्ट्रवादासंदर्भात कुणीही आम्हाला शिकवू नये, असे सरदेसाई म्हणाले.डॉ. जॅक सिक्वेरा यांनी गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यासाठी जे कार्य केले आहे त्याची दखल गोमंतकीयांना घ्यावीच लागेल. गोव्यातील वेगवेगळ्या गावातून डॉ. सिक्वेरा यांचे पुतळे उभे रहातील, असेही सरदेसाई यांनी ठामपणे सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण