शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

वेलिंगकर-ढवळीकरांचा राष्ट्रवादाआडून महाराष्ट्रवाद - विजय सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 17:22 IST

ओपिनियन पोलच्या मुद्दय़ावरुन राजकारण  करणारे गोवा सुरक्षा मंचाचे सुभाष वेलिंगकर आणि मगोचे सुदीन ढवळकर हे दोघेही राष्ट्रवादाच्या नावाखाली अजूनही महाराष्ट्रवादच करत आहेत

मडगाव - ओपिनियन पोलच्या मुद्दय़ावरुन राजकारण  करणारे गोवा सुरक्षा मंचाचे सुभाष वेलिंगकर आणि मगोचे सुदीन ढवळकर हे दोघेही राष्ट्रवादाच्या नावाखाली अजूनही महाराष्ट्रवादच करत आहेत. ओपिनियन पोलच्यावेळी आपण लोकांबरोबर होतो असे म्हणणाऱ्यांनी त्यावेळी गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व राहावे यासाठी मतदान केले की विलिनीकरणाच्या बाजूने, असा सवाल नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी केला.

ओपिनियन पोल संदर्भात वक्तव्य करून सरदेसाई यांनी स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी आपले शब्द मागे घेत माफी मागावी अन्यथा 26 जानेवारीच्या कार्यक्रमात त्यांना काळे झेंडे दाखविण्यात येतील, असा इशारा वेलिंगकर यांनी दिला होता. त्याचा समाचार घेताना सरदेसाई म्हणाले, ज्यावेळी गोवा मुक्त झाला त्यावेळी त्यावेळचे प्रधानमंत्री पं. नेहरू यांनी भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले, असे वक्तव्य केले होते. त्याच धर्तीवर आपण ओपिनियन पोल जिंकल्यावर गोवा खऱ्या अर्थाने मुक्त झालो, असे वक्तव्य केले होते. गोवा मुक्तीने गोमंतकीयांना भारतीय बनविले. मात्र ते खऱ्या अर्थाने गोंयकार ओपिनियन पोलच्या निकालानंतरच झाले. हे माझे ठाम मत असून, त्यासाठी मी कुणाचीही माफी मागणार नाही. जर कुणाला काळे झेंडे दाखवायचे असतील तर त्यांनी अवश्य दाखवावेत त्यांनाही आम्ही पाहून घेऊ, असे प्रतिआव्हान सरदेसाई यांनी दिले.सोमवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सरदेसाई म्हणाले, गोवा मुक्ती लढय़ातील स्वातंत्र्य सैनिकांबद्दल मला आदर आहे, किंबहुना गोवा मुक्ती लढा आणि विलिनीकरणविरोधी लढा या दोन्ही लढय़ांशी माझ्या  कुटुंबियांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे मी स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणो शक्यच नाही. माझे घर गोवा मुक्ती लढय़ातील स्वातंत्र्य सैनिकांचा अड्डा होता त्यामुळेच माझे वडील ज्यावेळी अमेरिकेतून लिस्बनमध्ये गेले त्यावेळी त्यांचा पासपोर्ट पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अराष्ट्रीय असा ठपका ठेवून बाहेर फेकून दिला होता. पोर्तुगालच्या दफ्तरात अजूनही ही नोंद आहे. त्यामुळे राष्ट्रवादासंदर्भात कुणीही आम्हाला शिकवू नये, असे सरदेसाई म्हणाले.डॉ. जॅक सिक्वेरा यांनी गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यासाठी जे कार्य केले आहे त्याची दखल गोमंतकीयांना घ्यावीच लागेल. गोव्यातील वेगवेगळ्या गावातून डॉ. सिक्वेरा यांचे पुतळे उभे रहातील, असेही सरदेसाई यांनी ठामपणे सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण