शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राज्यातील सर्व सीसीटीव्हींची पडताळणी करा; गोवा फॉरवर्डचे मुख्य सचिवांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2024 16:02 IST

दुर्गादास कामत म्हणाले, राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्हे वाढत आहेत.

-नारायण गावस

पणजी: राज्यात वाढते गुन्हे पाहता राज्यातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी करावी या मागणीचे निवेदन गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे मुख्य सचिवांना देण्यात आले आहे, असे गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी पत्रकार परिषदे घेऊन सांगितले.

दुर्गादास कामत म्हणाले, राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्हे वाढत आहेत. बहुतांश गुन्हे शहरी भागाप्रमाणे आता ग्रामिण भागातही घडत आहेत. त्यामुळे आता रस्त्यावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही असणे गरजेचे आहे. राज्यातील सर्व नगरपालिका तसेच पंचायतींनी आपल्या क्षेत्रात बसविलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे चालतात की नाही याची पडताळणी करावी. कारण या सीसीटीव्हीमुळे अनेक गुन्ह्यांचा तपास लावण्यात लाभ होत आहेत. अनेक गुन्हे हे या कॅमेरामध्ये सापडले आहेत. त्यामुळे आम्ही मुख्य सचिवांना निवेदन दिले असून सचिवांनी सर्व जबाबदार खात्यांना असे आदेश द्यावे, असेही कामत म्हणाले.

कामत म्हणाले, राज्यात काही जे गुन्हे घडले आहेत त्यांचा शोध घेताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पाेलिसांना सहकार्य लाभत आहे. काही दिवसांपूर्वी जे अनेक गुन्हे घडले आहेत त्यांचा शोध लावण्यास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा फायदा मिळाला आहे. पण काही ठिकाणी कॅमेरा आहे पण ते व्यवस्थित चालत नाही फक़्त बसविले आहेत. त्यांची नगरपालिका तसेच पंचायती पाहणी करत नाही. त्यामुळे आता मुख्य सचिवांनी त्यांना पाहणी करण्याचे आदेश देऊन ही सीसीटीव्हींची पडताळणी करावी तसेच ज्या प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत अशा ठिकाणी सीसीटीव्ही बसवावे असेही कामत म्हणाले.

टॅग्स :goaगोवा