शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

वास्कोत दोन गटांत वाद

By admin | Updated: August 5, 2014 01:47 IST

वास्को : ऐन पावसाळ्यात बायणा समुद्रकिनाऱ्यावरील होडीमालकांनी सुरक्षिततेसाठी आपली मच्छीमारी होडी व्होळांत समुद्रकिनाऱ्यावर नांगरून ठेवल्याने

वास्को : ऐन पावसाळ्यात बायणा समुद्रकिनाऱ्यावरील होडीमालकांनी सुरक्षिततेसाठी आपली मच्छीमारी होडी व्होळांत समुद्रकिनाऱ्यावर नांगरून ठेवल्याने वास्कोतील मच्छीमार आणि व्होळांत गावातील नागरिक यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. सध्या त्या गावात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे़ दरवर्षी, बायणा समुद्रातील पाण्याची पातळी वाढत असल्याने तसेच वादळी लाटांमुळे समुद्रकिनाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धूप होत असते़ हल्लीच काटे बायणा येथे तुफानी लाटांमुळे किनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या डिंगी होड्या तसेच ‘पनेळ’ होड्या व मच्छीमारी जाळी समुद्रात वाहून गेल्याने मच्छीमारांचे बरेच नुकसान झाले होते़ पावसाळ्यात होडी नांगरण्यास हा किनारा सुरक्षित नसल्याने काही मच्छीमारांनी आपल्या होड्या व्होळांत येथील किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या़ तसेच त्या समुद्री भागात मासेमारीही केली होती़ त्यामुळे खोलांत या भागातील मच्छीमारांनी वास्कोतील मच्छीमारांना त्या भागात मासेमारी करण्यास व किनाऱ्यावर होडी नांगरून ठेवण्यास मनाई केली़ तसेच वास्कोतील मच्छीमारांना जीवे मारण्याची धमक्या दिल्या व होडीवर काम करणाऱ्या मजुरांवर हल्लाही केला़ त्यामुळे वास्को मच्छीमार आणि वेळसांव, कासांवली, व्होळांत या भागातील मच्छीमार यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला़ या संघर्षामुळे व्होळांत गावात तणावग्रस्त स्थिती निर्माण झाली़ दरम्यान, कुठ्ठाळी मतदारसंघाच्या आमदार तथा पर्यटनमंत्री एलिना साल्ढाणा यांना या दोन्ही गटांतील संघर्षाची माहिती मिळाल्यावर त्यांनी दोन्ही गटांमध्ये मध्यस्थी करून तडजोडीचा प्रयत्न केला़ त्यांनी वेर्णा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेलेल्या व्होळांत, वेळसांव, कासांवली भागातील नागरिकांची भेट घेऊन त्यांना आपापल्या क्षेत्राच्या सीमेतच मासेमारी करण्याचे व होड्या नांगरून ठेवण्याची विनंती करून दोन्ही गटांतील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले़तद्नंतर वास्कोतील ओल्ड क्रॉस होडीमालक संघटना, खारवीवाडा, दिस्तेरो मच्छीमार संघटना आणि बायणा रापोणकार होडीमालक संघटना या तीन संलग्नित संघटनेच्या सुमारे १५० सदस्यांनी वेळसांव, कासांवली आणि व्होळांत या भागातील मच्छीमारांकडून बायणा किनाऱ्यावरील बैठकीत मिळालेल्या धमकीचा निषेध करण्यासाठी तसेच त्यांच्या विरुध्द आवाज उठविण्यासाठी समुद्रातील वादळी हवामानामुळे त्यांना व्होळांत येथील किनाऱ्यावर मासळी उतरविण्यास तात्पुर्ती मुभा देण्याची मागणी राज्य सरकार आणि मच्छीमार खात्याकडे केली आहे़ (प्रतिनिधी)