शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोकण मार्गावर आजपासून धावणार 'वंदे भारत'; PM मोदी दाखविणार हिरवा बावटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 10:40 IST

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी हे या रेल्वेंचा शुभारंभ करणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव:गोवा ते मुंबई मार्गावर धावणारी बहुचर्चित 'वंदे 'भारत' रेल्वे आज, मंगळवारपासून मडगावातून धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वेस्थानकावरून एकाच वेळी गोवा मुंबई यासह एकूण पाच वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेना हिरवा कंदील दाखवणार आहेत.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी हे या रेल्वेंचा शुभारंभ करणार आहेत. ३ जून रोजी गोवा ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ होणार होता. मात्र ओडिशा येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे तो नंतर पुढे ढकलण्यात आला. आज मडगाव कोकण रेल्वे स्थानकात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, खासदार विनय तेंडुलकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दीन, आमदार दिगंबर कामत हे उपस्थित राहणार आहेत. गोवा मुंबई- वंदे भारत ही रेल्वे १२० किमी प्रतितास वेगाने धावत असून मडगाव ते मुंबईपर्यंतचे अंतर आठ तासांत पूर्ण करणार आहे.

१० तासांचा प्रवास...

वंदे भारत रेल्वेला पावसाळ्यातच मुंबई ते गोवा गाठण्यासाठी दहा तास लागणार आहेत. इतरवेळी ५८६ किमीचे अंतर आणि ११ स्थानकांवर थांबण्यासाठी ७.५० तास लागणार आहेत. सध्याच्या मार्गावरील वेगवान ट्रेनला हे अंतर कापण्यासाठी ८.५० तासांचा वेळ लागत आहे.

आठवड्यातून तीन दिवसच...

सुरुवातीला वंदे भारत मुंबई गोवा कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातून तीनच दिवस चालविली जाणार आहे. पावसाळी वेळापत्रकामुळे हा बदल असणार आहे. सामान्य वेळापत्रकानुसार वंदे भारत आठवड्याचे सहा दिवस या मार्गावर धावणार आहे. पावसाळी वेळापत्रकानुसार दरड कोसळण्याची शक्यता, दृष्यमान आदी कारणांमुळे कोकण रेल्वेवर वेगाचे लिमिट आहे. या लिमिटमुळे वंदे भारत ८० किमी प्रति तासच्या वेगापुढे धावू शकणार नाही.

वंदे भारत ही आठवड्यातून एकदाच म्हणजे शुक्रवारी धावणार नाही. तर पावसाळी वेळापत्रकानुसार मुंबईहून सुटणारी वंदे भारत ही मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी निघणार आहे. वंदे भारत ही या तीन दिवसांना सीएम- एमटीवरून सकाळी ५.३२ वाजता सुटेल तर १० तासांनी ती मडगावला दुपारी साडेतीनला पोहोचणार आहे. गोव्यावरून परतीच्या प्रवासाला निघताना वंदे भारत ही आठवड्यातून तीन दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुटणार आहे. मडगावहून ही ट्रेन दुपारी १२.२० वाजता सुटणार आहे. तर सीएमएमटीला ही ट्रेन रात्री १०.२५ वाजता पोहोचणार आहे. याबाबतचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

 

टॅग्स :goaगोवाVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसKonkan Railwayकोकण रेल्वे