शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा आंबा काजू पिकालाही फटका - शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2024 15:47 IST

सत्तरीतील शेतकरी रामा गावकर म्हणाले यंदा आमचे काजूचे पीक मोठ्या प्रमाणात घटले त्यामुळे नुकसान झाली. आता कुठे आंबा पिकायला आले होते.

नारायण गावस 

पणजी: राज्यात आताच कुठेतरी स्थानिक आंब्याची आवक वाढली होती पण शनिवारी  झालेल्या वादळी वाऱ्यासह  मुसळधार पावसामुळे आंबा पिकाला फटका बसला आहे. पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता  हवामान खात्याने वर्तविली असल्याने यंदा आंबा पीक नुकसानीत येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

यंदा अगोदरच काजू उत्पादन ५० टक्क्यांनी घटले आहे त्यात आता आंब्याचा पिकावरही या पावसाचा परिणाम जाणवला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी  चिंताग्रस्त असून कृषी खात्याने आर्थिक सहाय करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडू्न केली जात आहे.  राज्यात शनिवारी झालेल्या पावसाने पिकायला आलेला आंबा वादळी वाऱ्याने झडला. तसेच काजू पिकावरही याचा परिणाम झाला. माेठ्या  प्रमाणात कच्चे आंबेही पडल्याने आंबा उत्पादकांना  नुकसान झाले.

सध्या मे महिना सुरु असल्याने मानकुराद तसेच हापूस आंबे पिकायला आले आहेत. अनेक आंबाउत्पादकांनी ते काढून पिकायला घातले आहे. तर अनेक आंबे हे झाडावरच होते पण अवकाळी पावसामुळे या आंब्याचे पीक झडले आहे. या वर्षी अगोदर आंबे पीक हे कमी  होते त्यात आता हा निसर्गकडून नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

सत्तरीतील शेतकरी रामा गावकर म्हणाले यंदा आमचे काजूचे पीक मोठ्या प्रमाणात घटले त्यामुळे नुकसान झाली. आता कुठे आंबा पिकायला आले होते.  त्याला दरही ५०० ते ७०० डझन पर्यत मिळत होता. पण शनिवारी झालेल्या वादळी पावसाने आंबा गळून पडल्याने ते कुजले आहेत.  त्यामुळे आंब्याचे नुकसान यंदा सहन करावे लगणार आहे. त्यामुळे कृषी खात्याने नुकसान भरपाई द्यावी, असे ते म्हणाले.

केपेचे शेतकरी उल्हास वेळीप म्हणाले यंदा हवामानाचा फटका बसल्याने काजू  उत्पादन ५० टक्क्यांनी घटले. आंबा लागवडही  यंदा कमी झाली होती. त्यात आता हा अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. आंब्याच्या बागायतीत असलेले मानकुराद आंबे पावसामुळे कुजले आहेत. आणखी पुढील १५ दिवस तरी पाऊस नसला तर हे  आंबे आम्हाला मिळू शकतात.