शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा आंबा काजू पिकालाही फटका - शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2024 15:47 IST

सत्तरीतील शेतकरी रामा गावकर म्हणाले यंदा आमचे काजूचे पीक मोठ्या प्रमाणात घटले त्यामुळे नुकसान झाली. आता कुठे आंबा पिकायला आले होते.

नारायण गावस 

पणजी: राज्यात आताच कुठेतरी स्थानिक आंब्याची आवक वाढली होती पण शनिवारी  झालेल्या वादळी वाऱ्यासह  मुसळधार पावसामुळे आंबा पिकाला फटका बसला आहे. पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता  हवामान खात्याने वर्तविली असल्याने यंदा आंबा पीक नुकसानीत येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

यंदा अगोदरच काजू उत्पादन ५० टक्क्यांनी घटले आहे त्यात आता आंब्याचा पिकावरही या पावसाचा परिणाम जाणवला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी  चिंताग्रस्त असून कृषी खात्याने आर्थिक सहाय करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडू्न केली जात आहे.  राज्यात शनिवारी झालेल्या पावसाने पिकायला आलेला आंबा वादळी वाऱ्याने झडला. तसेच काजू पिकावरही याचा परिणाम झाला. माेठ्या  प्रमाणात कच्चे आंबेही पडल्याने आंबा उत्पादकांना  नुकसान झाले.

सध्या मे महिना सुरु असल्याने मानकुराद तसेच हापूस आंबे पिकायला आले आहेत. अनेक आंबाउत्पादकांनी ते काढून पिकायला घातले आहे. तर अनेक आंबे हे झाडावरच होते पण अवकाळी पावसामुळे या आंब्याचे पीक झडले आहे. या वर्षी अगोदर आंबे पीक हे कमी  होते त्यात आता हा निसर्गकडून नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

सत्तरीतील शेतकरी रामा गावकर म्हणाले यंदा आमचे काजूचे पीक मोठ्या प्रमाणात घटले त्यामुळे नुकसान झाली. आता कुठे आंबा पिकायला आले होते.  त्याला दरही ५०० ते ७०० डझन पर्यत मिळत होता. पण शनिवारी झालेल्या वादळी पावसाने आंबा गळून पडल्याने ते कुजले आहेत.  त्यामुळे आंब्याचे नुकसान यंदा सहन करावे लगणार आहे. त्यामुळे कृषी खात्याने नुकसान भरपाई द्यावी, असे ते म्हणाले.

केपेचे शेतकरी उल्हास वेळीप म्हणाले यंदा हवामानाचा फटका बसल्याने काजू  उत्पादन ५० टक्क्यांनी घटले. आंबा लागवडही  यंदा कमी झाली होती. त्यात आता हा अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. आंब्याच्या बागायतीत असलेले मानकुराद आंबे पावसामुळे कुजले आहेत. आणखी पुढील १५ दिवस तरी पाऊस नसला तर हे  आंबे आम्हाला मिळू शकतात.