शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

अवकाळी पावसाचा आंबा काजू पिकालाही फटका - शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2024 15:47 IST

सत्तरीतील शेतकरी रामा गावकर म्हणाले यंदा आमचे काजूचे पीक मोठ्या प्रमाणात घटले त्यामुळे नुकसान झाली. आता कुठे आंबा पिकायला आले होते.

नारायण गावस 

पणजी: राज्यात आताच कुठेतरी स्थानिक आंब्याची आवक वाढली होती पण शनिवारी  झालेल्या वादळी वाऱ्यासह  मुसळधार पावसामुळे आंबा पिकाला फटका बसला आहे. पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता  हवामान खात्याने वर्तविली असल्याने यंदा आंबा पीक नुकसानीत येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

यंदा अगोदरच काजू उत्पादन ५० टक्क्यांनी घटले आहे त्यात आता आंब्याचा पिकावरही या पावसाचा परिणाम जाणवला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी  चिंताग्रस्त असून कृषी खात्याने आर्थिक सहाय करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडू्न केली जात आहे.  राज्यात शनिवारी झालेल्या पावसाने पिकायला आलेला आंबा वादळी वाऱ्याने झडला. तसेच काजू पिकावरही याचा परिणाम झाला. माेठ्या  प्रमाणात कच्चे आंबेही पडल्याने आंबा उत्पादकांना  नुकसान झाले.

सध्या मे महिना सुरु असल्याने मानकुराद तसेच हापूस आंबे पिकायला आले आहेत. अनेक आंबाउत्पादकांनी ते काढून पिकायला घातले आहे. तर अनेक आंबे हे झाडावरच होते पण अवकाळी पावसामुळे या आंब्याचे पीक झडले आहे. या वर्षी अगोदर आंबे पीक हे कमी  होते त्यात आता हा निसर्गकडून नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

सत्तरीतील शेतकरी रामा गावकर म्हणाले यंदा आमचे काजूचे पीक मोठ्या प्रमाणात घटले त्यामुळे नुकसान झाली. आता कुठे आंबा पिकायला आले होते.  त्याला दरही ५०० ते ७०० डझन पर्यत मिळत होता. पण शनिवारी झालेल्या वादळी पावसाने आंबा गळून पडल्याने ते कुजले आहेत.  त्यामुळे आंब्याचे नुकसान यंदा सहन करावे लगणार आहे. त्यामुळे कृषी खात्याने नुकसान भरपाई द्यावी, असे ते म्हणाले.

केपेचे शेतकरी उल्हास वेळीप म्हणाले यंदा हवामानाचा फटका बसल्याने काजू  उत्पादन ५० टक्क्यांनी घटले. आंबा लागवडही  यंदा कमी झाली होती. त्यात आता हा अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. आंब्याच्या बागायतीत असलेले मानकुराद आंबे पावसामुळे कुजले आहेत. आणखी पुढील १५ दिवस तरी पाऊस नसला तर हे  आंबे आम्हाला मिळू शकतात.