शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

गोव्यात आदिवासी उपनियोजन फंड वापराविना, विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांकडून नाराजी व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 21:15 IST

आदिवासी उपनियोजन योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या निधीचा उपयोग विविध खात्यांकडून होत नसल्यामुळे आमदारांकडून विधानसभेत नाराजी व्यक्त करण्यात आली.

पणजी: आदिवासी उपनियोजन योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या निधीचा उपयोग विविध खात्यांकडून होत नसल्यामुळे आमदारांकडून विधानसभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. या खात्यांवर कोण देखरेख ठेवणार ? असा प्रश्न विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर आणि निलेश काब्राल यांनी केला.कवळेकर यांनी हा तारांकित स्वरूपाचा प्रश्न उपस्थित केला होता. आदिवासी उपनियोजनाअंतर्गत राज्याला यंदा २० कोटी रुपये निधी आल्याची माहिती आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी विधानसभेत दिली. हा निधी सर्व खात्यांना वितरीत केला जातो, परंतु सर्व खाती हा निधी वापरत नसल्याचे आढळून आल्याची माहिती कवळेकर व नंतर निलेश काब्रा यांनीही दिली. या खात्यांकडून कामे करून घेण्याच्या बाबतीत काही देखरेख यंत्रणे आहेत काय ? किंवा अनुसूचित जाती जमाती खाते त्यांच्यावर देखरेख ठेऊ शकेल काय यावर दोन्ही आमदारांनी प्रश्न विचारले.केंद्राकडून मिळालेला निधी विविध खात्यांकडून वापरला जात नसल्याची कबुली मंत्री गावडे यांनीही दिली. यावर गांभिर्याने विचार होईल असे ते म्हणाले. हा निधी वापरण्यात आला नाही तर तो इतर खात्यात वळविण्याचे प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. परंतु कायद्या अंतर्गत तसे करणे शक्य नसल्याचे आणि मंत्र्यांनी तसे करूही नये असे आमदार निलेश काब्राल यांनी सांगितले. त्या ऐवजी ज्या खात्यात आदिवासी उपनियोजन फंडाचा वापर केला जात नाही त्या खात्याकडून तो करून घेण्यासाठी यंत्रणे उभारण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान आदिवासी कल्याण खात्याकडून चांगले काम केले जात असल्याचे प्रशस्तीपत्र विरोधी नेते कवळेकर यांनी गावडे यांना दिले.

टॅग्स :goaगोवा