शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात भूमिगत वीजवाहिन्या!

By admin | Updated: August 8, 2014 02:26 IST

पणजी : राज्यात सर्वत्र ११ केव्ही वीजवाहिन्या भूमिगत टाकण्यासाठी अभियंत्यांना मतदारसंघनिहाय खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यास सांगितले असून, ज्या ठिकाणी फिडर्स सदोष आहेत

पणजी : राज्यात सर्वत्र ११ केव्ही वीजवाहिन्या भूमिगत टाकण्यासाठी अभियंत्यांना मतदारसंघनिहाय खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यास सांगितले असून, ज्या ठिकाणी फिडर्स सदोष आहेत त्या ठिकाणी प्राधान्यक्रमे हे काम हाती घेतले जाईल, असे वीजमंत्री मिलिंद नाईक यांनी विधानसभेत स्पष्ट केले. खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी पुढे सांगितले की, स्पॉट बिलिंगचे काम बंगळुरूच्या कंपनीकडून काढून घेण्यात आलेले असून ते गोवा इलेक्ट्रॉनिक्स लि. कडे सोपविले जाईल. बिले उशिरा येण्याचे प्रकार त्यामुळे बंद होतील. सदोष फिडर्स तसेच वीज खंडित होण्याचे प्रकार ज्या भागात जास्त आहेत तेथे भूमिगत वीजवाहिन्यांची आधी व्यवस्था केल्यास ७० ते ८० टक्के वीज व्यत्ययाचे प्रमाण कमी होईल, असा दावा नाईक यांनी केला. सध्या ३०० मीटर रीडर्स खात्यात आहेत. आणखी २०० जणांची भरती केली जाईल. एपीडीआरपीच्या अर्धवट सोडलेल्या प्रकल्पांसाठी १८ महिन्यांची मुदतवाढ केंद्राकडून घेतलेली आहे. पहिल्या टप्प्यासाठी लवकरच निविदा काढल्या जातील. राज्यात विजेचा तुटवडा आहे हे मंत्री नाईक यांनी मान्य केले. मार्च ते मे या कालावधीत ५४० मेगावॅट विजेची गरज होती; परंतु प्रत्यक्षात ३१५ मेगावॅटच मिळाली. टंचाई भरून काढण्यासाठी एमयूएनएलकडून ७५ मेगावॅट आणि टाटा कंपनीकडून ५० मेगावॅट वीज खरेदी करण्यात आली. कार्बोकडून ५० मेगावॅट वीज बंद झाली. तसेच रिलायन्सची २५ मेगावॅट वीजही बंद झाल्याचे ते म्हणाले. चतुर्थीला दहा दिवस असताना सर्व पंचायतींना पथदीप व अन्य विजेचे साहित्य मिळेल, अशी ग्वाही नाईक यांनी दिली. वीज लाईनमन व इतरांना कामावर असताना अपघात होऊ नयेत यासाठी फोंडा येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण दिले जाईल. तत्पूर्वी विरोधी पक्षनेते राणे यांनी खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला. लोकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. त्याचबरोबर उद्योगांनाही मोठा फटका बसत आहे. कमी दाबाच्या विजेची समस्याही राज्यातील अनेक भागांमध्ये आहे. मडगावात ६३० केव्ही ट्रॉली आधारित ट्रान्स्फॉर्मरचा अभाव असल्याचे आमदार दिगंबर कामत यांनी निदर्शनास आणले. नुवे मतदारसंघात विजेची समस्या गंभीर असल्याचे आमदार मिकी पाशेको यांनी सांगितले. आमदार नरेश सावळ यांनी वीज खात्याकडे साहित्याचा नेहमीच तुटवडा असतो, याकडे लक्ष वेधले. साळ, लाटंबार्से भागात सायंकाळी ५ नंतर वीज नसते. अनेक आमदारांनी वीज बिले उशिरा मिळत असल्याची तक्रार केली. भारनियमन चालू असल्याचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी निदर्शनास आणले. गरीब पंचायतींना पथदीप बिलांच्या बाबतीत शिथिलता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)