शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गोमंतकीयांच्या अनधिकृत बांधकामांना मिळणार संरक्षण: मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:57 IST

अध्यादेश किंवा विधेयक आणणार; रस्त्यालगतची बेकायदा बांधकामे पाडणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : अनधिकृत बांधकामे कायदेशीर करण्यासाठी नवा अध्यादेश किंवा विधेयक आणण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. तर दुसरीकडे रस्त्यालगतच्या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई होणारच आहे. त्यामुळे ती स्वतःहून हटवावीत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. या बैठकीस महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, मुख्य सचिव व्ही. कांडावेलू, महसूल तसेच अन्य संबंधित खात्यांचे सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यात बेकायदा बांधकामांना थारा दिला जाणार नाही. दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. उच्च न्यायालयाने बेकायदा बांधकामे पाडण्यासंबंधी दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली.

अलीकडेच झालेल्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत एका मंत्र्याने हा विषय उपस्थित करून बांधकामांवर कारवाई झाल्यास आगामी निवडणुकांमध्ये भाजपला त्याचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली होती. येत्या डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायत निवडणुका होणार आहेत, त्यानंतर मार्चमध्ये पालिका निवडणुका व २०२७ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. बांधकामांवर बुलडोझर फिरवल्यास या निवडणुकांमध्ये भाजपला त्याची किंमत मोजावी लागणार, असे अनेक सत्ताधारी आमदारांचेही म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांनी बेकायदा बांधकामे खपवून घेतली जाणार नाहीत. मात्र अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आवश्यक ती तरतूद केली जाईल, असे स्पष्ट केले होते.

महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात म्हणाले की, रस्त्यालगत आलेली अतिक्रमणे, जी मार्ग रुंदीकरणासाठी अडथळा ठरत आहेत, ती हटवण्याचा निर्णय झालेला आहे. बेकायदा बांधकामे, अतिक्रमणांबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. या बांधकामांवर कोणती कारवाई कारवाई करावी हे स्पष्टपणे सांगितलेले नाही. बैठकीत आम्ही यावर सविस्तरपणे चर्चा केली.

सरकारी किंवा कोमुनिदादींच्या जमिनींमध्ये पिढ्यानपिढ्या ही घरे उभी आहेत. काही घरमालकांकडे घर क्रमांक सोडून कोणतेही दस्तऐवज नाहीत. ही घरे मूळ गोमंतकीयांची आहेत. त्यांच्यावर सरकारला अन्याय करायचा नाही. त्यामुळे या घरांना संरक्षण दिले जाईल. पंचायती, पालिका, नगर नियोजन खाते आदी सर्व यंत्रणांकडे उच्चस्तरीय बैठकीत सल्लामसलत केलेली आहे. लवकरच अनधिकृत घरांना संरक्षण देण्यासाठी कायदेशीर तरतूद केली जाईल.

उत्तर, दक्षिण गोव्यात भरारी पथके स्थापन

हायकोर्टाच्या आदेशानंतर सरकारने रस्त्यालगतच्या बेकायदा बांधकामांना नोटिसा बजावून पंधरा दिवसांच्या आत ती हटवण्यास सांगितले होते. बेकायदा बांधकामांवर कारवाईसाठी तालुकावार भरारी पथकेही स्थापन करण्यात आलेली आहेत. मामलेदार, तलाठी तसेच इतर अधिकाऱ्यांचा या पथकामध्ये समावेश आहे. १०० क्रमांकावर डायल करून तक्रार केल्यास ही पथके कारवाई करतील. उत्तर गोव्यात याआधीच तालुकानिहाय पथकांचा आदेश जाहीर झाला होता. दक्षिण गोव्यात आज हा आदेश काढण्यात आला.

गोमंतकीयांना दिलासा देण्याची तयारी : गुदिन्हो

पंचायतमंत्री माविन गुदिन्हो हेही बैठकीला उपस्थित होते. ते म्हणाले की, हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे राष्ट्रीय महामार्गालगतची व्यावसायिक अतिक्रमणे पाडली जातील. ही अतिक्रमणे रस्ता रुंदीकरणात तसेच वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत. इतरत्र जी अनधिकृत घरे आहेत, त्याबद्दल हायकोर्टाने, असे निर्देश दिलेले आहेत की पंचायत राज किंवा अन्य कायद्यांनुसार सरकारने या बांधकामांबाबत काय तो निर्णय घ्यावा. त्यानुसार उच्चस्तरीय बैठकीत गोमंतकीयांच्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यासाठी वटहुकूम काढण्याचे किंवा विधेयक आणण्याचे ठरले आहे. गोमंतकीयांची घरे पाडून त्यांना आम्ही रस्त्यावर आणणार नाही.

 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारPramod Sawantप्रमोद सावंत