शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

येत्या पाच वर्षांत दोन लाख नोकऱ्या! मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2024 10:00 IST

आयटीआय केंद्रांतील अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन रोजगार मिळवा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बड्या तारांकित हॉटेल्ससह इतर ठिकाणी आदरातिथ्यासाठी सेवा क्षेत्रात पुढील पाच वर्षांत गोव्यात दोन लाख नोकऱ्या निर्माण होतील. त्यामुळे सरकारने आयटीआय केंद्रांमध्ये सुरू केलेल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन हा रोजगार गोमंतकीय तरुणांनी मिळवावा, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

जागतिक कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कला अकादमी संकुलात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासह टाटा, जग्वार, ताज हॉटेल, पुत्झमायझर व इतर कंपन्यांचे प्रतिनिधी, आयटीआय केंद्रांमधील विद्यार्थी, शिक्षकही उपस्थित होते. राज्यभरातील आठवी, नववीच्या हजारो विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम लाइव्ह पाहिला. यावेळी ताज हॉटेल्सशी सरकारने सामंजस्य करार केला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आयटीआयमध्ये सहा महिने थेअरी व ताज हॉटेलमध्ये सहा महिने प्रॅक्टिकल करावे लागेल. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या ताज हॉटेल किंवा इतर बड्या हॉटेलांमध्ये शंभर टक्के नोकरी मिळू शकते युवकांनी सरकारी नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा आयटीआयमध्ये विविध अभ्यासक्रम आहेत, ते करावेत. सरकारने सर्व अकराही आयटीआय केंद्रांचा कायापालट करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी २२० कोटी रुपये खर्च केले जातील. टाटा समूहाकडून १७० कोटी रुपये मिळतील. ताज ग्रुपसारखे इतरांनी यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

दरम्यान, कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयातर्फे कला अकादमी संकुलात आयोजित जागतिक युवा कौशल्य दिनाच्या या कार्यक्रमास शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेंकर, कौशल्य विकास व उद्योजकता संचालनालयाचे संचालक एस. एस. गावकर, ग्रामीण विकास संस्थेचे संचालक गोपाळ पार्सेकर, नियोजन व सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना, गौरीश धोंड, टाटा टेक्नॉलॉजीजचे दक्षिण विभागप्रमुख प्रशांत हंडीगुंडर व 'ताज'चे वरिष्ठ उपाध्यक्ष, रणजित फिलिपोस आदी उपस्थित होते.

राज्यातील सर्व आयटीआय तसेच कौशल्य विकास खात्याला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. डिचोली, काकोडा, फार्मागुढी, म्हापसा व वास्को या पाच केंद्रांवर उत्कृष्टतेच्या केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले तसेच कुशल कारागीर, विविध कौशल्य स्पर्धेतील विजेते विद्यार्थी यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

पाच टक्केच युवक सेवा क्षेत्रात

मुख्यमंत्री म्हणाले की, बड्या हॉटेलांना लागणारे मनुष्यबळ गोव्यात मिळत नाही. त्यामुळे परप्रांतीय नोकऱ्या बळकावतात. तसे करू देऊ नका, गोव्याचे ५ टक्केच युवक सेवा क्षेत्रात येतात. पांढरपेशी नोकरी असूनही याकडे दुर्लक्ष केले जाते व सरकारी नोकरीचा आग्रह धरला जातो. तसे करू नये. प्रत्येक हाताला कौशल्य देणे महत्त्वाचे. त्यासाठी मोदींनी कौशल्य मंत्रालय सुरू केले. प्रधानमंत्री कौशल्य योजना आणली. पूर्वी स्थिती वेगळी होती. कुठेच प्रवेश मिळाला नाही तर विद्यार्थी आयटीआयकडे येत असत. आता परिस्थिती बदलली आहे.

आता विदेशी भाषांमधून टुरिस्ट अॅम्बेसिडर कोर्स

आयटीआयमध्ये लवकरच टुरिस्ट अॅम्बेसिडर हा कोर्सही सुरू केला जाणार असून फ्रेंच, जर्मन व रशियन या विदेशी भाषांमधून परदेशी पर्यटकांची कसा संवाद साधावा, हे शिकवले जाईल. हा अभ्यासक्रम केल्यानंतर पर्यटकांशी चांगल्या पद्धतीने संवाद साधता येईल आणि या क्षेत्रात रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत