शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

नारळ उत्पादकांना पावणेदोन कोटी: रवी नाईक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 12:48 IST

४८९ शेतकऱ्यांना आधारभूत किमतीचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : कृषी खात्यातर्फे नारळ उत्पादनावर देण्यात येणारी आधारभूत किमत २०२२-२३ या आर्थिक वर्षात ४८९ शेतकऱ्यांना एकूण १ कोटी ७२ लाख ४८ हजार ८६१ रुपये अनुदानीत रुपात देण्यात आले. तसेच ४९० शेतकऱ्यांचा एकूण २ कोटी ५३ लाख १८ हजार ८९९ एवढा निधी देणे बाकी आहे, अशी माहिती कृषीमंत्री रवी नाईक यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे.

कृषी खात्याने गेल्या आर्थिक वर्षात अनुदानीत योजनेसाठी एकूण ९७९ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. कृषी खात्याकडून नारळ उत्पादनावर आधारभूत किंमत म्हणून निधी दिला जातो. यासाठी शेतकऱ्यांना हा निधी दिला जातो. जास्तीत जास्त लोक शेतीकडे वळावेत, हा या मागचा हेतू आहे. पण, गेल्या वर्षीचा निधी अजूनही काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. खात्याकडून सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती अधिवेशनात कृषी मंत्री रवी नाईक यांनी लेखी स्वरुपात दिली आहे.

सासष्टीतील १७४ शेतकऱ्यांना लाभ

२०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण ४८९ शेतकऱ्यांना आधारभूत किंमत देण्यात आली आहे. एकूण १ कोटी ७२ लाख ४८ हजार ८६२ एवढा निधी देण्यात आला आहे. यात सार्वाधिक जास्त सासष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. सासष्टीत एकूण १७४ शेतकन्यांना या निधीचा लाभ मिळला आहे तर केपे तालुक्यातील १०९ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.

सत्तरीतील शेतकऱ्यांना अनुदान प्रलंबित

कृषी खात्याकडून अजूनही ४९० शेतकऱ्यांना अनुदान देणे बाकी आहे. सत्तरी तालुक्यातील अद्याप एकाही शेतकऱ्याला अनुदान मिळालेले नाही. सासष्टी तालुक्यात एकूण २९८ जणांनी अर्ज केले होते. यातील १७४ जणांना लाभ मिळाला आहे. तर सांगे तालुक्यातील २२९ शेतकऱ्यांनी अर्ज केले यातील ८१ जणांना अनुदान मिळाले आहे. तर केपे तालुक्यातील १७२ शेतकऱ्यांपैकी फक्त १०९ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभा