शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
4
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
5
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
7
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
8
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
9
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
10
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
11
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
12
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
13
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
14
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
15
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
16
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
17
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
19
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
20
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!

ट्रकमालकांचे आंदोलन पेटणार

By admin | Updated: December 11, 2015 00:19 IST

खाणग्रस्त ट्रकमालकांचा काही महिन्यांपासून धुमसत असलेला असंतोष गेल्या आठ-दहा दिवसांपासून उफाळून येत आहे.

खाणग्रस्त ट्रकमालकांचा काही महिन्यांपासून धुमसत असलेला असंतोष गेल्या आठ-दहा दिवसांपासून उफाळून येत आहे. आतापर्यंत एखाददुसरा अपवाद वगळता ट्रकमालकांच्या आंदोलनाने उद्रेकाची सीमा ओलांडली नसली तरी येत्या काही दिवसांत हे आंदोलन रौद्र रूप धारण करण्याची शक्यता खाणपट्ट्यात व्यक्त होत आहे. ट्रकमालकांच्या आंदोलनाबाबत राजकीय पातळीवरील अनास्थेमुळे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तीन वर्षे बंद असलेला खाण व्यवसाय थोड्याफार प्रमाणात का होईना पुन्हा सुरू होत असल्यामुळे खाण अवलंबितांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते. मात्र, खाण व्यवसायाच्या नमनालाच खाण व्यवसायात पूर्वीपासून घुसलेल्या किडी वळवळण्यास सुरुवात झाल्याने भविष्यात खाण व्यवसाय विनाअडचण सुरू होईल की नाही, याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. सरकारने खाण व्यवसायाच्या सुरुवातीलाच या व्यवसायातील प्रमुख घटक असलेल्या ट्रकमालकांना दुखावण्याचे काम केले. मुळात तीन वर्षे हालअपेष्टा सोसलेल्या या खाण अवलंबितांना पर्यायाने ट्रकमालकांना थोडीफार सहानुभूती दाखवण्याची गरज होती. मात्र, तसे न करता खाण कंपन्यांचे चोचले पुरवण्यासाठी सरकार पातळीवरून ट्रकमालकांची फरपट चालली आहे. याची सरकारने वेळीच दखल घेण्याची गरजही व्यक्त होत आहे. ट्रकमालकांची खनिज वाहतुकीसाठी रास्त दर देण्याची मागणी आहे. सरकारने ई-लिलाव झालेल्या मालाच्या वाहतुकीसाठी ठरवलेला दर परवडत नसतानाही ट्रकमालकांनी मान्य केला होता. यामागे खाण व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा हीच अपेक्षा होती. मात्र, ई-लिलाव झालेला खनिज माल संपल्यानंतर नव्याने खाण उत्खनन करताना त्या मालाच्या वाहतुकीसाठी ट्रकमालक संघटनेने वेगळा दर मागितला होता. मात्र, खाण कंपन्या सरकार पातळीवरून ई-लिलावासाठी ठरलेल्या दरापेक्षाही कमी दरात वाहतूक करण्यासाठी ट्रकमालकांवर दबाव आणत आहेत. राजकीय आर्थिक स्वार्थापोटी सरकार खाण कंपन्यांपुढे नमते घेत असल्याचे ट्रकमालकांचे म्हणणे आहे. गेल्या निवडणुकांत विद्यमान भाजप सरकारने खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्याच्या आश्वासनामुळे स्पष्ट बहुमत प्राप्त केले होते. भाजपचे खाणपट्ट्यातील चार आमदार जनतेने निवडून दिले होते. मात्र, सध्या या चारपैकी तीन आमदारांनी आपल्याला निवडून दिलेल्या जनतेकडे पाठ फिरवली असून येणाऱ्या २0१७च्या निवडणुकीत भाजपच्या या आमदारांना आपले वर्तन महागात पडण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. आमदार डॉ. प्रमोद सावंत हेच काय ते ट्रकमालकांच्या बरोबर असून (पान २ वर)