शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आदिवासी उपजीविका स्थलांतर सर्वेक्षण अंतर्गत राज्यातील २२,३२४ लोकांशी आदिवासी खात्याने साधला संपर्क : संचालक दशरथ रेडकर

By समीर नाईक | Updated: March 15, 2024 15:45 IST

राज्यातील आदिवासी खात्यातर्फे आदिवासी रिसर्च इन्स्टिट्यूट आणि दिशा फाऊंडेशन यांच्या सहाय्याने आदिवासी उपजीविका स्थलांतर सर्वेक्षण सुरूकेले आहे.

पणजी: राज्यातील आदिवासी खात्यातर्फे आदिवासी रिसर्च इन्स्टिट्यूट आणि दिशा फाऊंडेशन यांच्या सहाय्याने आदिवासी उपजीविका स्थलांतर सर्वेक्षण सुरूकेले आहे. २०२३ मध्ये हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, आतापर्यंत ५५८१ घरातील मिळून सुमारे २२,३२४ लोकांपर्यंत आम्ही संपर्क साधला आहे. आदिवासी समाजातील लोकांच्या नेमक्या समस्या जाणून घेणे, व त्यांचे समाधान  करणे हा या सर्वेक्षणाचा मुख्य हेतू आहे, अशी माहिती आदिवासी खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांनी दिली.

पणजीत शुक्रवारी आयोजीत पत्रकार परिषदेत आदिवासी खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत आदिवासी रिसर्च इन्स्टिट्यूचे संचालक राजेंद्र मिरजकर, व दिशा फाऊंडेशनच्या डॉ. अंजली बोहराडे उपस्थित होत्या.

आदिवासी समाजातील लोक नेहमीच उपजीविकेसाठी स्थलांतर होत असतात. अनेकजण गावातून शहरांकडे स्थलांतर होत असतात. यांचे नेमके कारण काय? हे जाणून घेण्यासाठी सदर सर्वेक्षण आवश्यक आहे. या सर्वेक्षणच्या माध्यमातून आदिवासी समाजातील समस्यांचे निरसन आम्ही करण्यावर भर देणार आहोत. तसेच उपजिविकेसाठी त्यांना जे आवश्यक आहे, ते त्यांना गावातच उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे रेडकर यांनी यावेळी सांगितले.

या सर्वेक्षणच्या माध्यमातून एसटी समाजातील लोकांसाठी ज्या काही सरकारी योजना अस्तित्वात आहे, ते देखील त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात येईल. त्यामुळे आदिवासी समाजातील युवकांनी या सर्वेक्षणात सहभागी होत, समजाच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहनही रेडकर यांनी केले 

 पैशांचे ९० टक्के उपयोग 

आदिवासी समाज खात्याला जो बजेट सरकारतर्फे देण्यात आला आहे, त्यापैकी ९० टक्के पैसे आम्ही लोकांसाठी खर्च करत असतो. तसेच आमच्याशी सलग्न असलेल्या अनेक विभागातून नियमित बैठक घेत पैसे योग्य प्रकारे, योग्य ठिकाणी खर्च होते की नाही याचाही आढावा घेतला जातो. योजनांबाबत देखील जागृती कार्यक्रम आयोजित करत असतो, असेही रेडकर यांनी यावेळी सांगितले.