शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
3
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
4
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
5
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
6
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
7
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
8
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
9
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
10
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
11
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
12
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
13
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
14
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
15
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
16
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
17
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
18
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
19
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
20
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी उपजीविका स्थलांतर सर्वेक्षण अंतर्गत राज्यातील २२,३२४ लोकांशी आदिवासी खात्याने साधला संपर्क : संचालक दशरथ रेडकर

By समीर नाईक | Updated: March 15, 2024 15:45 IST

राज्यातील आदिवासी खात्यातर्फे आदिवासी रिसर्च इन्स्टिट्यूट आणि दिशा फाऊंडेशन यांच्या सहाय्याने आदिवासी उपजीविका स्थलांतर सर्वेक्षण सुरूकेले आहे.

पणजी: राज्यातील आदिवासी खात्यातर्फे आदिवासी रिसर्च इन्स्टिट्यूट आणि दिशा फाऊंडेशन यांच्या सहाय्याने आदिवासी उपजीविका स्थलांतर सर्वेक्षण सुरूकेले आहे. २०२३ मध्ये हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, आतापर्यंत ५५८१ घरातील मिळून सुमारे २२,३२४ लोकांपर्यंत आम्ही संपर्क साधला आहे. आदिवासी समाजातील लोकांच्या नेमक्या समस्या जाणून घेणे, व त्यांचे समाधान  करणे हा या सर्वेक्षणाचा मुख्य हेतू आहे, अशी माहिती आदिवासी खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांनी दिली.

पणजीत शुक्रवारी आयोजीत पत्रकार परिषदेत आदिवासी खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत आदिवासी रिसर्च इन्स्टिट्यूचे संचालक राजेंद्र मिरजकर, व दिशा फाऊंडेशनच्या डॉ. अंजली बोहराडे उपस्थित होत्या.

आदिवासी समाजातील लोक नेहमीच उपजीविकेसाठी स्थलांतर होत असतात. अनेकजण गावातून शहरांकडे स्थलांतर होत असतात. यांचे नेमके कारण काय? हे जाणून घेण्यासाठी सदर सर्वेक्षण आवश्यक आहे. या सर्वेक्षणच्या माध्यमातून आदिवासी समाजातील समस्यांचे निरसन आम्ही करण्यावर भर देणार आहोत. तसेच उपजिविकेसाठी त्यांना जे आवश्यक आहे, ते त्यांना गावातच उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे रेडकर यांनी यावेळी सांगितले.

या सर्वेक्षणच्या माध्यमातून एसटी समाजातील लोकांसाठी ज्या काही सरकारी योजना अस्तित्वात आहे, ते देखील त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात येईल. त्यामुळे आदिवासी समाजातील युवकांनी या सर्वेक्षणात सहभागी होत, समजाच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहनही रेडकर यांनी केले 

 पैशांचे ९० टक्के उपयोग 

आदिवासी समाज खात्याला जो बजेट सरकारतर्फे देण्यात आला आहे, त्यापैकी ९० टक्के पैसे आम्ही लोकांसाठी खर्च करत असतो. तसेच आमच्याशी सलग्न असलेल्या अनेक विभागातून नियमित बैठक घेत पैसे योग्य प्रकारे, योग्य ठिकाणी खर्च होते की नाही याचाही आढावा घेतला जातो. योजनांबाबत देखील जागृती कार्यक्रम आयोजित करत असतो, असेही रेडकर यांनी यावेळी सांगितले.