शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय: वाहतुकीचा शिमगा थांबवा, शहरावरील अत्याचार रोखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 11:52 IST

राजधानी पणजीत केवळ पणजीचेच लोक फिरतात असे नाही.

राजधानी पणजीत केवळ पणजीचेच लोक फिरतात असे नाही. चोवीस तासात काही लाख लोक अन्य भागातूनही पणजीत येऊन जातात. बहुतांश पर्यटकही त्यात असतात. शहरात आज जी वाहतूककोंडी होत आहे, ते गृहखात्याचे आणि पोलिसांच्या वाहतूक विभागाचे अपयश आहे. सरकारलाही त्याविषयी थोडा तरी खेद वाटायला हवा. वाहनचालकांना स्वयंशिस्त नाही, त्यामुळे वाहतूककोंडी होते, असे सरकारी यंत्रणेने नमूद करणे हा पणजीवासीयांचा, वाहनचालकांचा अपमान आहे.

दुपारी सर्व विद्यालये सुटतात, शिवाय सरकारी कार्यालयांतील कर्मचारी, खासगी कार्यालयांचा स्टाफ, असे सगळे आपल्या घरी जेवायला जातात. मात्र, यावेळी कुठेच एकही वाहतूक पोलिस उभा नसतो. वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी सकाळी आणि दुपारीही पोलिस पणजी शहरात नसतात. सायंकाळी तर राजधानीतील वाहतूक व्यवस्था रामभरोसेच असते. पणजीतील रस्त्यांची फोडाफोडी अशा पद्धतीने सुरू आहे की, वाहन कसे चालवावे तेच लोकांना कळत नाही. कंत्राटदारांची माणसेही कुठेच उभी राहून वाहतुकीचे व्यवस्थापन करत नाहीत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री बाबूश मोन्सेरात, वरिष्ठ पोलिस अधिकारी, महापौर व सर्व संबंधितांनी येत्या आठवड्यात एक दिवस दुपारच्यावेळी आपल्या खासगी गाड्या घेऊन पणजीत फिरावे. वाहन स्वतः चालवावे आणि स्वयंशिस्त दाखवावी. ही माहिती गुप्त ठेवावी. वाहतूक पोलिस विभागालाही कल्पना देऊ नये. पणजीत वाहतुकीचा कसा शिमगा सुरू आहे आणि वाहनचालकांचा, नागरिकांचा, दुकानदारांचा जीव कसा गुदमरतोय, हे मुख्यमंत्र्यांसह सर्वांना कळून येईल.

मोन्सेरात यांनी दोनवेळा विधान केले की, पणजीत सुरू असलेल्या रस्ते खोदाईचा व कामांचा सामान्य लोकांना त्रास होत नाही. अवघेच चार- पाच जण तक्रारी करतात; पण सर्वसामान्य नागरिकांची त्यामुळे गैरसोय होत नाही. सत्तेत असताना प्रत्येक राजकीय नेत्याला असेच वाटते. स्वयंपाक गॅस सिलिंडरचा दर वाढला तर सामान्य माणसाला त्रास होत नाही, असे काही केंद्रीय नेत्यांना वाटते. पेट्रोल- डिझेल महागले तर मध्यमवर्गीयांना मोठासा त्रास होत नाही, कारण त्यांचे उत्पन्न आता वाढलेय, असाही दावा काही राजकारणी करतात. मोन्सेरात त्याच धर्तीवर पणजीतील सामान्य माणसाविषयी बोलतात. सिद्धार्थ कुंकळ्ळ्येकर पणजीचे आमदार होते तेव्हा निवडणूक काळात भाजपच्या त्यावेळच्या विरोधकांनी स्मार्ट सिटीच्या विषयावरून मोठा वाद निर्माण केला होता. घोटाळ्याचा आरोप करत त्याच मुद्दयावर निवडणूक लढवली होती. आता पणजीत दमदार म्हणता येतील, असे कुणी राजकीय विरोधक राहिलेले नाहीत. मनोहर पर्रीकर आज विरोधी पक्षनेतेपदी असते तर त्यांनी पणजीतील नागरिकांना नेतृत्व देत आंदोलन केले असते. आजचा भाजप पर्रीकरांचा आंदोलनाचा वारसा विसरल्याने पणजीची दुर्दशा झाली आहे. लोक खड्ड्यात पडले, वाहने कलंडली, लोकांचा जीव वाहतूककोंडीत गुदमरला तरी कुणालाच त्याचे वाईट वाटत नाही. कारण काहीही झाले तरी आपल्याला मते मिळतात, यातच सत्ताधारी समाधानी आहेत. पणजीच्या वाट्याला आलेले भोग डोळे मिटून सहन करण्याचे काम राजधानीतील सज्जन करत आहेत.

स्मार्ट सिटीची कामे करताना नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जाता आले असते. एका भागातील काम अगोदर पूर्ण करून नंतर दुसऱ्या भागात काम करून लोकांना व दुकानदारांना दिलासा देता आला असता. पणजीत जणू काही मायनिंग सुरू असल्याप्रमाणे सगळीकडे धूळच धूळ दिसतेय. घरांमध्ये, दुकानात, छोट्या हॉटेलांत, नाका-तोंडात धूळ जाते. फक्त कसिनो जहाजांमध्ये आणि पर्वरीच्या मंत्रालयातही धूळ नाही. त्यामुळे सरकारला वाटतेय की, सामान्य माणसाला काहीच त्रास होत नाही. जे पदपथ पाच वर्षांपूर्वी बांधले, जे रस्ते पाच वर्षांपूर्वी दुरुस्त केले होते, ते पुन्हा फोडले आहेत. महिनाअखेरीस अनेक कामे पणजीत पूर्ण होतील, असा दावा सरकार करते. मात्र, सद्यस्थिती पाहता काम पूर्ण होईल, असे वाटत नाही. जूनमध्ये पाऊस सुरू झाला की, पणजी खरोखर स्मार्ट झालीय की पणजीचेच रूपांतर महामांडवीत झालेय ते कळून येईल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा