शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

महागड्या हॉटेलांकडे पर्यटकांची पाठ; किनारी भागातील खर्च टाळला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 13:30 IST

नाताळातील सुट्टीतला पर्यटन हंगाम हा गोव्यातला सर्वात जास्त पर्यटक येणारा हंगाम मानला जातो.

म्हापसा : सुट्टीच्या दिवसात गोव्यात येवून सुट्टी घालवणे म्हणजे खर्चीक बाब असते. सुट्टीच्या दिवसात पर्यटन स्थळांतील किंमती वाढवल्या जातात. त्यामुळे आवाक्या बाहेरील महागडा खर्च करण्यापेक्षा गाडीतून येवून सुट्टी साजरी करणे व पुन्हा माघारी जाणे परवडण्यासारखे असल्याचे मत नाताळानिमित्त गोव्यात आलेल्या पर्यटकांनी व्यक्त केले आहे. गरजेच्या वस्तूवर अव्वाच्या सव्वा किंमती लावल्या जात असल्याने त्यातून नाराजी व्यक्त करणारी प्रतिक्रिया पर्यटकांनी दिली आहे.

नाताळातील सुट्टीतला पर्यटन हंगाम हा गोव्यातला सर्वात जास्त पर्यटक येणारा हंगाम मानला जातो. चांगले वातावरण त्यात नाताळचे दिवस असल्याने आयोजित होणाऱ्या विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमामुळे पर्यटक गोव्यात सुट्टीसाठी येण्यावर प्राधान्य देत असतात. काही दिवस सुट्टीत घालवल्यानंतर पुन्हा माघारी निघून जातात. या वर्षी गोव्यात येणाºया चार्टड विमानांचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. त्यातून विदेशी पर्यटकांची संख्या रोडावली आहे. अशा वेळी पर्यटन व्यावसायिक देशी पर्यटकांवर अवलंबून होते. त्यांच्यावर व्यावसायिकांची सर्वात जास्त अपेक्षा होती; पण आलेल्या पर्यटकांना यंदा वर्षापेक्षा जास्त प्रमाणावर खर्च करावे लागले असल्याने किनारी भागातील व्यावसायिकांकडे जाणे देशी पर्यटकांनी टाळले आहे. 

व्यावसायिकांकडून विविध वस्तूवर न परवडणाऱ्या किंमती पर्यटकांवर लादल्या जात आहेत. या किंमती न परवडण्या सारख्या असल्याने जाणे टाळले असल्याची प्रतिक्रिया काही पर्यटकांनी दिली. किंमती वाढल्याने पर्यटकांनी किमान किनारी भागात तरी व्यवहार करण्याचे यावर्षी टाळले आहे. बहुतेक व्यवहारासाठी ते शहरी भागावर अवलंबून राहिले आहेत.  

वाढलेल्या किंमतीमुळे यंदा आलेल्या बहुतेक पर्यटकांनी स्वत:च्या वाहनातून येण्यावर प्राधान्य दिले आहे. किंमती वाढल्याने किनारी भागात हॉटेलाचा आसरा घेण्यापेक्षा एकतर त्यांनी स्वत:च्या वाहनाचा वापर केला किंवा शहरी भागात राहून किनारी भागात जाण्यावर भर दिला. काही पर्यटकांनी नाताळाची रात्र किनारी भागात मौज मजा करण्यात तेथे होणाऱ्या पार्ट्यात रंगण्यात घालवली. त्यानंतर आलेल्या गाडीतूनच माघारी जाणे पसंत केले. माघारी जाताना शहरात येवून गरजा भागवल्यानंतर माघारी निघून गेले. 

सुट्टीच्या दिवसात किनारी भागात हॉटेल्स, खाद्य पदार्थ किंवा इतर वस्तूंचे भाव इतर दिवसाच्या तुलनेत न परवडणारे असतात. त्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने कशाही प्रकारे किंमती लावल्या जातात अशी माहिती नियमितपणे येणाºया काही पर्यटकांनी दिली आहे. गुजरातमधून आलेल्या एका पर्यटकाने दिलेल्या माहितीनुसार आपण मागील बºयाच वर्षांपासून सुट्टी घालवण्यासाठी गोव्यात येत असतो; पण या वर्षी मात्र न परवडणाºया किंमती लागू करुन केल्या असल्याचे लक्षात आल्याने किनारी भागात व्यवहार करणे टाळले असल्याचे सांगितले. कळंगुट परिसरातील काही व्यावसायिकांनी देशी पर्यटकांची संख्या सुद्धा कमी असल्याचे सांगितले. 

टॅग्स :goaगोवाChristmasनाताळ