शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

महागड्या हॉटेलांकडे पर्यटकांची पाठ; किनारी भागातील खर्च टाळला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 13:30 IST

नाताळातील सुट्टीतला पर्यटन हंगाम हा गोव्यातला सर्वात जास्त पर्यटक येणारा हंगाम मानला जातो.

म्हापसा : सुट्टीच्या दिवसात गोव्यात येवून सुट्टी घालवणे म्हणजे खर्चीक बाब असते. सुट्टीच्या दिवसात पर्यटन स्थळांतील किंमती वाढवल्या जातात. त्यामुळे आवाक्या बाहेरील महागडा खर्च करण्यापेक्षा गाडीतून येवून सुट्टी साजरी करणे व पुन्हा माघारी जाणे परवडण्यासारखे असल्याचे मत नाताळानिमित्त गोव्यात आलेल्या पर्यटकांनी व्यक्त केले आहे. गरजेच्या वस्तूवर अव्वाच्या सव्वा किंमती लावल्या जात असल्याने त्यातून नाराजी व्यक्त करणारी प्रतिक्रिया पर्यटकांनी दिली आहे.

नाताळातील सुट्टीतला पर्यटन हंगाम हा गोव्यातला सर्वात जास्त पर्यटक येणारा हंगाम मानला जातो. चांगले वातावरण त्यात नाताळचे दिवस असल्याने आयोजित होणाऱ्या विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमामुळे पर्यटक गोव्यात सुट्टीसाठी येण्यावर प्राधान्य देत असतात. काही दिवस सुट्टीत घालवल्यानंतर पुन्हा माघारी निघून जातात. या वर्षी गोव्यात येणाºया चार्टड विमानांचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. त्यातून विदेशी पर्यटकांची संख्या रोडावली आहे. अशा वेळी पर्यटन व्यावसायिक देशी पर्यटकांवर अवलंबून होते. त्यांच्यावर व्यावसायिकांची सर्वात जास्त अपेक्षा होती; पण आलेल्या पर्यटकांना यंदा वर्षापेक्षा जास्त प्रमाणावर खर्च करावे लागले असल्याने किनारी भागातील व्यावसायिकांकडे जाणे देशी पर्यटकांनी टाळले आहे. 

व्यावसायिकांकडून विविध वस्तूवर न परवडणाऱ्या किंमती पर्यटकांवर लादल्या जात आहेत. या किंमती न परवडण्या सारख्या असल्याने जाणे टाळले असल्याची प्रतिक्रिया काही पर्यटकांनी दिली. किंमती वाढल्याने पर्यटकांनी किमान किनारी भागात तरी व्यवहार करण्याचे यावर्षी टाळले आहे. बहुतेक व्यवहारासाठी ते शहरी भागावर अवलंबून राहिले आहेत.  

वाढलेल्या किंमतीमुळे यंदा आलेल्या बहुतेक पर्यटकांनी स्वत:च्या वाहनातून येण्यावर प्राधान्य दिले आहे. किंमती वाढल्याने किनारी भागात हॉटेलाचा आसरा घेण्यापेक्षा एकतर त्यांनी स्वत:च्या वाहनाचा वापर केला किंवा शहरी भागात राहून किनारी भागात जाण्यावर भर दिला. काही पर्यटकांनी नाताळाची रात्र किनारी भागात मौज मजा करण्यात तेथे होणाऱ्या पार्ट्यात रंगण्यात घालवली. त्यानंतर आलेल्या गाडीतूनच माघारी जाणे पसंत केले. माघारी जाताना शहरात येवून गरजा भागवल्यानंतर माघारी निघून गेले. 

सुट्टीच्या दिवसात किनारी भागात हॉटेल्स, खाद्य पदार्थ किंवा इतर वस्तूंचे भाव इतर दिवसाच्या तुलनेत न परवडणारे असतात. त्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने कशाही प्रकारे किंमती लावल्या जातात अशी माहिती नियमितपणे येणाºया काही पर्यटकांनी दिली आहे. गुजरातमधून आलेल्या एका पर्यटकाने दिलेल्या माहितीनुसार आपण मागील बºयाच वर्षांपासून सुट्टी घालवण्यासाठी गोव्यात येत असतो; पण या वर्षी मात्र न परवडणाºया किंमती लागू करुन केल्या असल्याचे लक्षात आल्याने किनारी भागात व्यवहार करणे टाळले असल्याचे सांगितले. कळंगुट परिसरातील काही व्यावसायिकांनी देशी पर्यटकांची संख्या सुद्धा कमी असल्याचे सांगितले. 

टॅग्स :goaगोवाChristmasनाताळ