शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महागड्या हॉटेलांकडे पर्यटकांची पाठ; किनारी भागातील खर्च टाळला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 13:30 IST

नाताळातील सुट्टीतला पर्यटन हंगाम हा गोव्यातला सर्वात जास्त पर्यटक येणारा हंगाम मानला जातो.

म्हापसा : सुट्टीच्या दिवसात गोव्यात येवून सुट्टी घालवणे म्हणजे खर्चीक बाब असते. सुट्टीच्या दिवसात पर्यटन स्थळांतील किंमती वाढवल्या जातात. त्यामुळे आवाक्या बाहेरील महागडा खर्च करण्यापेक्षा गाडीतून येवून सुट्टी साजरी करणे व पुन्हा माघारी जाणे परवडण्यासारखे असल्याचे मत नाताळानिमित्त गोव्यात आलेल्या पर्यटकांनी व्यक्त केले आहे. गरजेच्या वस्तूवर अव्वाच्या सव्वा किंमती लावल्या जात असल्याने त्यातून नाराजी व्यक्त करणारी प्रतिक्रिया पर्यटकांनी दिली आहे.

नाताळातील सुट्टीतला पर्यटन हंगाम हा गोव्यातला सर्वात जास्त पर्यटक येणारा हंगाम मानला जातो. चांगले वातावरण त्यात नाताळचे दिवस असल्याने आयोजित होणाऱ्या विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमामुळे पर्यटक गोव्यात सुट्टीसाठी येण्यावर प्राधान्य देत असतात. काही दिवस सुट्टीत घालवल्यानंतर पुन्हा माघारी निघून जातात. या वर्षी गोव्यात येणाºया चार्टड विमानांचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. त्यातून विदेशी पर्यटकांची संख्या रोडावली आहे. अशा वेळी पर्यटन व्यावसायिक देशी पर्यटकांवर अवलंबून होते. त्यांच्यावर व्यावसायिकांची सर्वात जास्त अपेक्षा होती; पण आलेल्या पर्यटकांना यंदा वर्षापेक्षा जास्त प्रमाणावर खर्च करावे लागले असल्याने किनारी भागातील व्यावसायिकांकडे जाणे देशी पर्यटकांनी टाळले आहे. 

व्यावसायिकांकडून विविध वस्तूवर न परवडणाऱ्या किंमती पर्यटकांवर लादल्या जात आहेत. या किंमती न परवडण्या सारख्या असल्याने जाणे टाळले असल्याची प्रतिक्रिया काही पर्यटकांनी दिली. किंमती वाढल्याने पर्यटकांनी किमान किनारी भागात तरी व्यवहार करण्याचे यावर्षी टाळले आहे. बहुतेक व्यवहारासाठी ते शहरी भागावर अवलंबून राहिले आहेत.  

वाढलेल्या किंमतीमुळे यंदा आलेल्या बहुतेक पर्यटकांनी स्वत:च्या वाहनातून येण्यावर प्राधान्य दिले आहे. किंमती वाढल्याने किनारी भागात हॉटेलाचा आसरा घेण्यापेक्षा एकतर त्यांनी स्वत:च्या वाहनाचा वापर केला किंवा शहरी भागात राहून किनारी भागात जाण्यावर भर दिला. काही पर्यटकांनी नाताळाची रात्र किनारी भागात मौज मजा करण्यात तेथे होणाऱ्या पार्ट्यात रंगण्यात घालवली. त्यानंतर आलेल्या गाडीतूनच माघारी जाणे पसंत केले. माघारी जाताना शहरात येवून गरजा भागवल्यानंतर माघारी निघून गेले. 

सुट्टीच्या दिवसात किनारी भागात हॉटेल्स, खाद्य पदार्थ किंवा इतर वस्तूंचे भाव इतर दिवसाच्या तुलनेत न परवडणारे असतात. त्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने कशाही प्रकारे किंमती लावल्या जातात अशी माहिती नियमितपणे येणाºया काही पर्यटकांनी दिली आहे. गुजरातमधून आलेल्या एका पर्यटकाने दिलेल्या माहितीनुसार आपण मागील बºयाच वर्षांपासून सुट्टी घालवण्यासाठी गोव्यात येत असतो; पण या वर्षी मात्र न परवडणाºया किंमती लागू करुन केल्या असल्याचे लक्षात आल्याने किनारी भागात व्यवहार करणे टाळले असल्याचे सांगितले. कळंगुट परिसरातील काही व्यावसायिकांनी देशी पर्यटकांची संख्या सुद्धा कमी असल्याचे सांगितले. 

टॅग्स :goaगोवाChristmasनाताळ