शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

गोव्यातील मद्यबंदी शिथिल होणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 19:58 IST

मद्यबंदीचे निर्बंध शिथिल करण्यासाठी पर्यटन खात्याचं आयोगाला साकडं 

पणजी : आचारसंहिता काळात रात्री ११ नंतर मद्यबंदीचे निर्बंध शिथिल करुन व्यावसायिकांना मुभा द्यावी, अशी मागणी अखेर पर्यटन खात्याने निवडणूक आयोगाकडे केली आहे. निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे. बार आणि रेस्टॉरण्ट मालकांनी या निर्बंधांवर फेरविचार केला जावा अशी विनंती करणारे निवेदन पर्यटन खात्याला सादर केले होते. उन्हाळी सुट्टी सुरू झाली असून देशी पर्यटक गोव्यात येऊ लागले आहेत. गूड फ्रायडेची सुट्टी विकएंडला सलग लागून आल्याने पुढील चार-दिवस पर्यटकांचा प्रचंड ओघ राहणार आहे. त्यानंतर महिनाभर देशी पाहुण्यांची संख्या लक्षणीय असणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत विदेशी पाहुण्यांची संख्या कमी असते. परंतु देशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. किनाऱ्यांवर तसेच अन्य पर्यटनस्थळांवर गर्दी उसळलेली असते. बार तसेच किनाऱ्यांवरील शॅकमध्ये रात्री ११ नंतर मद्य बंद करण्यात आल्याने व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. आचारसंहिता २३ मे नंतरच संपणार आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बार आणि रेस्टॉरण्ट मालकांच्या शिष्टमंडळाने चालू आठवड्याच्या प्रारंभीच पर्यटन संचालक संजीव गडकर यांची भेट घेऊन निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, पर्यटन खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी हा विषय केंद्रीय आयोगाकडे नेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिलेले आहे.  

टॅग्स :goaगोवाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक