शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

...तोपर्यंत पणजीत खासगी बसेस; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2024 08:05 IST

ताम्हणकर यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पणजीतील खासगी बसेस १९ डिसेंबरपर्यंत काढून त्यांची जागा कदंबच्या इलेक्ट्रिक बसेस घेतल्या जाणार नाहीत, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्याचे खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताहाणकर यांनी सांगितले.

या बसेसच्या विषयावर लवकरच वाहतूक खाते, स्मार्ट सिटी अधिकारी व स्थानिक आमदारांची संयुक्त बैठक बोलावून तोडगा काढला जाईल. या बैठकीत निर्णय होईपर्यंत खासगी बसेस पणजीत कार्यरत राहतील असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. ताह्मणकर म्हणाले की, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पणजी दोनापावला मिरामार- ताळगाव - बांबोळी या मार्गावर केवळ कदंबच्या इलेक्ट्रिक बसेस धावतील. सध्या सुरू असलेल्या ७० खासगी बसेसची वाहतूक सेवा १९ जानेवारीपासून बंद केली जाईल, असे परिपत्रक वाहतूक खात्याने जारी केले आहे.

खात्याचे हे परिपत्रक अन्यायकारक आहे. या बसेस पैकी बहुतेक बसेस या पोर्तुगीज काळापासून कार्यरत आहेत. या बसेस बंद झाल्यानंतर त्यावर अवलंबून असलेल्या चालक व वाहकांच्या कुटुंबाचे काय ? असा प्रश्न करून खात्याच्या या निर्णयाला आम्ही आक्षेप नोंदवला आहे; मात्र या आक्षेपाची वाहतूक खात्याने कुठलीही दखल घेतली नसल्याची टीका ताम्हणकर यांनी यावेळी केली.

याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत बैठक झाली. यात त्यांनी या विषयावर योग्य तो तोडगा काढेपर्यंत पणजीतील खासगी बसेसची वाहतूक सेवा बंद केली जाणार नाही, असे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांचे आभार आहेत. राज्यात आज सक्षम विरोधकांचा अभाव असल्याने एकतर लोकांना मुख्यमंत्र्यांकडे किंवा न्यायालयात न्याय मिळवण्यासाठी धाव घ्यावी लागते अशी टीका ताह्मणकर यांनी केली.

 

टॅग्स :goaगोवाstate transportएसटीPramod Sawantप्रमोद सावंत