शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

व्याघ्र प्रकल्प सरकारला अमान्य; चरावणे धरणाच्या प्रस्तावावरही होणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 10:04 IST

न्यायालयात व्याघ्र प्रकल्पाच्या विषयावर युक्तीवाद सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : म्हादई अभयारण्य क्षेत्रात व्याघ्र प्रकल्प राबविणे किंवा ते व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर करणे गोवा सरकारला मान्य नाही. तसा निर्णय घेण्याच्या हेतूने राज्य वन्यप्राणी मंडळाची तातडीची बैठक सरकारने येत्या बुधवारी बोलावली असल्याची माहिती शनिवारी मिळाली.

न्यायालयात व्याघ्र प्रकल्पाच्या विषयावर युक्तीवाद सुरू आहेत. राज्यातील अनेक पर्यावरणप्रेमींनी अशा प्रकल्पाची मागणी केलेली आहे. हा प्रकल्प झाला तर म्हादई पाणीप्रश्नी गोव्याची बाजू मजबूत बनेल, असाही दावा पर्यावरणप्रेमी करतात.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे वन्यप्राणी मंडळाचे चेअरमन आहेत. मंडळावर वन मंत्री विश्वजित राणे, पर्येच्या आमदार दिव्या राणे तसेच काही माजी सरपंच, वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी व इतर आहेत. मंडळाच्या बैठकीत सर्वांची मते ऐकून घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. सत्तरी तालुक्यात चरावणे येथे धरण बांधण्याविषयीचा प्रस्तावही बैठकीत चर्चेस येणार आहे. धरण बांधण्यासाठी वन्यप्राणी मंडळाची परवानगी मिळणे गरजेचे आहे. तशी परवानगी देण्यास सरकार तयार झाले असल्याची माहिती मिळाली.

तथापि, गोवा सरकारची भूमिका आता वेगळी आहे. म्हादई अभयारण्यातील बहुतांश भाग हा सत्तरी तालुक्यात येतो. व्याघ्र प्रकल्प होणे, आम्हाला मान्य नाही अशी वन्यप्राणी मंडळाच्या काही सदस्यांची भूमिका आहे. येत्या बुधवारी होणाऱ्या तातडीच्या बैठकीत याविषयी चर्चा व निर्णय होणार आहे. 

खंडपीठात उद्या सुनावणी

म्हादई अभयारण्य हे व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून अधिसूचित करावे. या मागणीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाली आहे. दि. ३ जुलै आणि ४ जुलै रोजी झालेल्या सुनावणीत या प्रकरणातील याचिकादार गोवा फाउंडेशनतर्फे जोरदार युक्तिवाद झाले. अँड. नॉर्मा आल्यारीस यांनी व्याघ्र संवर्धनाची गरज व्यक्त करताना राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणच्या गोवा विभागाकडून म्हादई क्षेत्र व्याघ्र संरक्षित विभाग म्हणून जाहीर करण्याच्या शिफारशींचा निर्वाळा दिला. या प्रकरणात सोमवारी अंतिम सुनावणी होणार आहे.

सरकारची सावध भूमिका

न्यायालयात सरकारतर्फे भूमिका मांडताना अॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी सरकारचा व्याघ्र प्रकल्पाला विरोध नसल्याचे सांगतानाच, केंद्राकडे तशी शिफारस करण्यासाठी आणखी अभ्यास करावा लागेल, असे निवेदन दिले होते. त्यामुळेच अभ्यासाचा निर्वाळा देत सरकार काय भूमिका घेईल याबद्दल तेव्हाच पर्यावरणप्रेमींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती.

टॅग्स :goaगोवाTigerवाघ