शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

नोकऱ्या आयोगामार्फतच; सावध राहा, नोकऱ्यांसाठी पैसे देऊ नका: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2024 08:39 IST

परीक्षा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर होणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जाहिरात न केलेल्या पदांसाठीही लोक पैसे देऊन मोकळे होतात. पदवीधर सुशिक्षितही फालतू माणसांच्या कारनाम्यांना बळी पडतात. लोकांनी सावध राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी केले. आता कर्मचारी निवड आयोगातर्फे गुणवत्तेवरच नोकऱ्या दिल्या जातील. परीक्षा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले की, 'नोकऱ्यांसाठी पैसे उकळणाऱ्या कोणाचीही सरकार गय करणार नाही. त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई केली जाईल. सामान्य व्यक्तीपासून राजकारण्यांपर्यंत कोणीही सुटणार नाही. गुणवत्तेवरच नोकऱ्या दिल्या जातील. लवकरच कर्मचारी निवड आयोगाकडून जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील. आयोगाची स्थापनाच मुळात नोकर भरतीतील घोटाळे रोखण्यासाठी केलेली आहे,' असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.

सध्या गाजत असलेल्या पूजा नाईक प्रकरणाबद्दल, तसेच काणकोण व इतर ठिकाणी सरकारी नोकरीच्या नावाखाली युवक-युवतींना जो गंडा घालण्यात आला आहे, त्यासंबंधी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, 'सरकारने हे प्रकार गंभीरपणे घेतलेले आहेत. यातून कोणीही सुटणार नाही.' २०२१ साली गाजलेल्या बांधकाम खात्यातील नोकर भरती घोटाळा प्रकरणी विचारले असता ते म्हणाले की, 'काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, तर काही पोलिसांकडे आहेत.

'पुढे येऊन तक्रारी द्या' 

मुख्यमंत्री म्हणाले की, कोणीही अशी फसवणूक करताना आढळल्यास पोलिसांना कळवा. ज्यांची फसवणूक झालेली आहे, त्यांनी पुढे येऊन पोलिसात तक्रारी कराव्यात. संबंधितांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. नोकर भरती भ्रष्टाचाराची जी काही प्रकरणे पोलिसांकडे असतील, त्या सर्व प्रकरणात आरोपपत्रे सादर करून पुढील कारवाई केली जाईल.'

'प्रदूषण नकोच' 

राज्य मानवी हक्क आयोगाने दिवाळीत नरकासूर मंडळांना गोंगाट व आवाज प्रदूषण न करण्याबाबत दिलेल्या इशाऱ्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सण साजरे करताना लोकांनी ध्वनी आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवायलाच हवे. इतर नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

१२ हजार विद्यार्थ्यांना मोफत चष्मे 

'स्वयंपूर्ण गोवा' उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या ३३ हजार विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. १२ हजार विद्यार्थ्यांना मोफत चष्मे दिले. आठ ते दहा विद्यार्थ्यांच्या डोळ्ळ्यांवर किरकोळ शस्त्रक्रिया केल्या आहेत.

फळे कृत्रिमरीत्या पिकवणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई 

म्हापसा यार्डात केळी तसेच अन्य फळे कृत्रिमरीत्या पिकविण्यासाठी रसायनांची फवारणी करणाऱ्या ज्या व्यक्तीला अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी पकडले आहे, तिला तुरुंगात टाकले जाईल आणि त्याचे दुकानही बंद केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. म्हापसा यार्ड मधून बेळगावच्या विक्रेत्याला ९ क्विंटल केळींवर रसायनाची फवारणी केल्याबद्दल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले. 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारPramod Sawantप्रमोद सावंत