शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नोकऱ्या आयोगामार्फतच; सावध राहा, नोकऱ्यांसाठी पैसे देऊ नका: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2024 08:39 IST

परीक्षा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर होणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जाहिरात न केलेल्या पदांसाठीही लोक पैसे देऊन मोकळे होतात. पदवीधर सुशिक्षितही फालतू माणसांच्या कारनाम्यांना बळी पडतात. लोकांनी सावध राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी केले. आता कर्मचारी निवड आयोगातर्फे गुणवत्तेवरच नोकऱ्या दिल्या जातील. परीक्षा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले की, 'नोकऱ्यांसाठी पैसे उकळणाऱ्या कोणाचीही सरकार गय करणार नाही. त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई केली जाईल. सामान्य व्यक्तीपासून राजकारण्यांपर्यंत कोणीही सुटणार नाही. गुणवत्तेवरच नोकऱ्या दिल्या जातील. लवकरच कर्मचारी निवड आयोगाकडून जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील. आयोगाची स्थापनाच मुळात नोकर भरतीतील घोटाळे रोखण्यासाठी केलेली आहे,' असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.

सध्या गाजत असलेल्या पूजा नाईक प्रकरणाबद्दल, तसेच काणकोण व इतर ठिकाणी सरकारी नोकरीच्या नावाखाली युवक-युवतींना जो गंडा घालण्यात आला आहे, त्यासंबंधी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, 'सरकारने हे प्रकार गंभीरपणे घेतलेले आहेत. यातून कोणीही सुटणार नाही.' २०२१ साली गाजलेल्या बांधकाम खात्यातील नोकर भरती घोटाळा प्रकरणी विचारले असता ते म्हणाले की, 'काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, तर काही पोलिसांकडे आहेत.

'पुढे येऊन तक्रारी द्या' 

मुख्यमंत्री म्हणाले की, कोणीही अशी फसवणूक करताना आढळल्यास पोलिसांना कळवा. ज्यांची फसवणूक झालेली आहे, त्यांनी पुढे येऊन पोलिसात तक्रारी कराव्यात. संबंधितांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. नोकर भरती भ्रष्टाचाराची जी काही प्रकरणे पोलिसांकडे असतील, त्या सर्व प्रकरणात आरोपपत्रे सादर करून पुढील कारवाई केली जाईल.'

'प्रदूषण नकोच' 

राज्य मानवी हक्क आयोगाने दिवाळीत नरकासूर मंडळांना गोंगाट व आवाज प्रदूषण न करण्याबाबत दिलेल्या इशाऱ्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सण साजरे करताना लोकांनी ध्वनी आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवायलाच हवे. इतर नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

१२ हजार विद्यार्थ्यांना मोफत चष्मे 

'स्वयंपूर्ण गोवा' उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या ३३ हजार विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. १२ हजार विद्यार्थ्यांना मोफत चष्मे दिले. आठ ते दहा विद्यार्थ्यांच्या डोळ्ळ्यांवर किरकोळ शस्त्रक्रिया केल्या आहेत.

फळे कृत्रिमरीत्या पिकवणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई 

म्हापसा यार्डात केळी तसेच अन्य फळे कृत्रिमरीत्या पिकविण्यासाठी रसायनांची फवारणी करणाऱ्या ज्या व्यक्तीला अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी पकडले आहे, तिला तुरुंगात टाकले जाईल आणि त्याचे दुकानही बंद केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. म्हापसा यार्ड मधून बेळगावच्या विक्रेत्याला ९ क्विंटल केळींवर रसायनाची फवारणी केल्याबद्दल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले. 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारPramod Sawantप्रमोद सावंत