शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

नोकरभरती आयोगामार्फतच; सरकारकडून नियमांमध्ये दुरुस्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2024 13:30 IST

नियम क्रमांक ४ मधील कलम ३ मध्ये दुरुस्ती केली आहे. 

पणजी : नोकऱ्या विक्रीचा विषय गाजत असतानाच सरकारने राज्य कर्मचारी निवड आयोगाच्या काही नियमांमध्ये दुरुस्त्या केल्या आहेत. सरकारी खात्यांनी आता रिक्त पदांची निश्चित संख्या आयोगाला कळवावी लागेल. ढोबळ मानाने किंवा अंदाजाने रिक्त जागांबाबत माहिती देऊन चालणार नाही. त्यासाठी नियम क्रमांक ४ मधील कलम ३ मध्ये दुरुस्ती केली आहे. 

एखाद्या उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती प्रमाणपत्रे जोडलेली नसल्यास किंवा चुकीची प्रमाणपत्रे अपलोड केलेली असल्यास कोणतेही कारण न देता अर्ज फेटाळण्याचे अधिकार आयोगाला देण्यात आले आहेत. त्यासाठी नियम क्रमांक ५ मधील कलम ९ मध्ये दुरुस्ती केली आहे. परीक्षागृहात किमान दोन पर्यवेक्षक नेमणे पूर्वी बंधनकारक होते. आता नियम क्रमांक १० मधील कलम ४ मध्ये दुरुस्ती करून केवळ एक पर्यवेक्षक नेमता येईल, अशी तरतूद केली आहे. 

नोकरभरती अधिक पारदर्शक कशा प्रकारे करता येईल यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले. प्रतीक्षा यादीच्या बाबतीतही नवीन तरतूद करण्यात आली आहे. पूर्वी एकूण पदांच्या संख्येच्या २५ टक्के किंवा २ उमेदवार, जी संख्या जास्त असेल ती प्रतीक्षा यादीत टाकली जात असे. आता ४० टक्के किंवा ५ उमेदवार, जी संख्या जास्त असेल ती नावे प्रतीक्षा यादीत टाकली जातील. त्यासाठी नियम १२ मधील कलम २ व ७ मध्ये दुरुस्त्या केल्या आहेत.

काही पदांसाठी कुशलता आवश्यक असते. अशा पदांसाठी आता आयोग स्वतः किंवा खात्यामार्फत अथवा एखाद्या एजन्सीकडून तसेच नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत उमेदवारांची कौशल्य चाचणी घेऊ शकतो. त्यासाठी नियम ११ मध्ये कलम २ मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारjobनोकरी