शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नोकरभरती आयोगामार्फतच; सरकारकडून नियमांमध्ये दुरुस्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2024 13:30 IST

नियम क्रमांक ४ मधील कलम ३ मध्ये दुरुस्ती केली आहे. 

पणजी : नोकऱ्या विक्रीचा विषय गाजत असतानाच सरकारने राज्य कर्मचारी निवड आयोगाच्या काही नियमांमध्ये दुरुस्त्या केल्या आहेत. सरकारी खात्यांनी आता रिक्त पदांची निश्चित संख्या आयोगाला कळवावी लागेल. ढोबळ मानाने किंवा अंदाजाने रिक्त जागांबाबत माहिती देऊन चालणार नाही. त्यासाठी नियम क्रमांक ४ मधील कलम ३ मध्ये दुरुस्ती केली आहे. 

एखाद्या उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती प्रमाणपत्रे जोडलेली नसल्यास किंवा चुकीची प्रमाणपत्रे अपलोड केलेली असल्यास कोणतेही कारण न देता अर्ज फेटाळण्याचे अधिकार आयोगाला देण्यात आले आहेत. त्यासाठी नियम क्रमांक ५ मधील कलम ९ मध्ये दुरुस्ती केली आहे. परीक्षागृहात किमान दोन पर्यवेक्षक नेमणे पूर्वी बंधनकारक होते. आता नियम क्रमांक १० मधील कलम ४ मध्ये दुरुस्ती करून केवळ एक पर्यवेक्षक नेमता येईल, अशी तरतूद केली आहे. 

नोकरभरती अधिक पारदर्शक कशा प्रकारे करता येईल यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले. प्रतीक्षा यादीच्या बाबतीतही नवीन तरतूद करण्यात आली आहे. पूर्वी एकूण पदांच्या संख्येच्या २५ टक्के किंवा २ उमेदवार, जी संख्या जास्त असेल ती प्रतीक्षा यादीत टाकली जात असे. आता ४० टक्के किंवा ५ उमेदवार, जी संख्या जास्त असेल ती नावे प्रतीक्षा यादीत टाकली जातील. त्यासाठी नियम १२ मधील कलम २ व ७ मध्ये दुरुस्त्या केल्या आहेत.

काही पदांसाठी कुशलता आवश्यक असते. अशा पदांसाठी आता आयोग स्वतः किंवा खात्यामार्फत अथवा एखाद्या एजन्सीकडून तसेच नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत उमेदवारांची कौशल्य चाचणी घेऊ शकतो. त्यासाठी नियम ११ मध्ये कलम २ मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारjobनोकरी