शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

गोव्यात भंडारी समाजाचे आता तीन मंत्री!; २५ टक्के प्रमाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 22:55 IST

गोव्यात मिलिंद नाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भंडारी समाजाच्या एकूण मंत्र्यांची संख्या आता तीन झाली आहे. दक्षिण गोव्यात आगामी लोकसभा निवडणुकीत भंडारी समाजाच्या मतांवर डोळा ठेवून या समाजाला आणखी एक मंत्रिपद दिले गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पणजी : गोव्यात मिलिंद नाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भंडारी समाजाच्या एकूण मंत्र्यांची संख्या आता तीन झाली आहे. दक्षिण गोव्यात आगामी लोकसभा निवडणुकीत भंडारी समाजाच्या मतांवर डोळा ठेवून या समाजाला आणखी एक मंत्रिपद दिले गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. १२ सदस्यीय मंत्रिमंडळात आता भंडारी मंत्र्यांचे प्रमाण २५ टक्के झाले आहे. 

राज्यात भंडारी समाजाची लोकसंख्या २७ टक्के आहे. तेवढे आरक्षणही या समाजाला मिळत आहे. मंत्रिमंडळात जलस्रोतमंत्री विनोद पालयेंकर आणि गृहनिर्माणमंत्री जयेश साळगांवकर हे दोघे भंडारी समाजाचे मंत्री होते. त्यात आता मिलिंद यांची भर पडली आहे. समाजातर्फे या गोष्टीचे स्वागत करण्यात आले. 

गोमंतक भंडारी समाजाचे महासचिव उपेंद्र गांवकर यांनी मिलिंद यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल स्वागत केले आहे. ते म्हणाले की, ‘मडकईकर यांच्याकडील समाज कल्याण खाते मिलिंद यांना मिळाल्याने ते समाजाला अत्यंत उपयुक्त ठरेल. समाजाची अनेक कामे रेंगाळत पडली आहेत. पर्वरी येथे भंडारी समाजासाठी जागा दिली जावी, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी रेंगाळत पडली आहे. सरकारने २७ टक्के राखीवता दिली असली तरी अंमलबजावणीच्या बाबतीत टाळाटाळ केली जाते. उपजिल्हाधिका-यांकडून जातीचे दाखले देण्याबाबत दिरंगाई केली जाते. या सर्व गोष्टी आम्ही आमच्या समाजाच्या मंत्र्यांकडे मांडणार आहोत.’

राज्यात भंडारी समाजाची संख्या मोठी आहे. समाजाच्या दोन गटांमध्ये अलीकडेच समेट होऊन दोन्ही गट एकत्र आल्याने आता दुरावाही राहिलेला नाही. समाजाला मंत्रिमंडळात पुरेसे स्थान मिळायला हवे, अशी समाजाची नेहमीच मागणी राहिलेली आहे. 

टॅग्स :goaगोवा