शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

मगोप सोडलेल्यांना पुन्हा प्रवेश किंवा तिकीटदेखील देणार नाही: सुदिन ढवळीकर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 13:11 IST

पक्षाच्या आमसभेने आधीच निर्णय घेतल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा प्रवेश नाही तसेच निवडणुकीसाठी तिकीटदेखील दिले जाणार नाही, असा कडक निर्णय मगोपच्या आमसभेने याआधी घेतलेला आहे, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

याबाबत पत्रकारांच्या एका प्रश्नावर बोलताना मंत्री ढवळीकर म्हणाले की, '२००७ नंतर हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. काहीजण पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून येतात व पक्षाला बाधक वक्तव्ये करतात व नंतर पक्ष सोडून अन्य पक्षात प्रवेश करतात. आम्ही तिकीट देऊन निवडून आणतो व नंतर ते पक्ष सोडून जातात, हे यापुढे चालणार नाही. आमसभा जो निर्णय घेते तो मी किंवा पक्षाचा अध्यक्षही बदलू शकत नाही'

ढवळीकर म्हणाले की, 'आणखी एक महत्त्वाचा निर्णय आमसभेने घेतला आहे, तो म्हणजे मगोपच्या तिकिटावर प्रथमच आमदार म्हणून निवडून येणाऱ्याने पहिल्या टर्ममध्ये मंत्रिपद मागू नये. प्रथमच निवडून येणाऱ्याने एखादे महामंडळ स्वीकारावे. इतर काही गोष्टी शिकाव्यात, असा पक्षाचा आग्रह आहे. तर काही करता येते.'

... पक्ष सोडायला नको होता

सुदिन ढवळीकर म्हणाले की, 'मी केवळ मगोपबद्दलच बोलतोय असे नव्हे तर अन्य पक्षातही असे काही नेते आहेत, जे पक्षाच्या तिकिटावर निवडून येऊन मुख्यमंत्री बनले व नंतर त्यांनी पक्ष सोडला.' लक्ष्मीकांत पार्सेकर व दिगंबर कामत यांच्या नावांचा उल्लेख करून ढवळीकर म्हणाले की, 'या दोघांनी पक्ष सोडायला नको होता, असे माझे वैयक्तिक मत आहे. मगोपतून असे अनेकजण गेले, खास करून चांगले नेते गेले. त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले.'

प्रत्येकाला नशीब आजमावण्याचा अधिकार : कामतांचा विजयला टोला

'नशीब आजमावण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे', अशी प्रतिक्रिया आमदार दिगंबर कामत यांनी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी सुरू केलेल्या 'जनता दरबार'वर दिली. आमदार सरदेसाई यांनी विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी 'जनता दरबार' घेतले आहेत. आतापर्यंत त्यांनी पेडणे, म्हापसा, डिचोली, काणकोण येथे दरबार घेतले आहेत.दरम्यान, मडगाव पालिका निवडणुकीत केवळ फातोर्थ्यातच नव्हे, तर मडगावातील प्रभागांमध्येही आपण उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. २०२७ च्या विधानसभेवेळी गोवा फॉरवर्ड मडगावमधूनही लढू शकतो, असे भाष्य अलीकडेच विजय यांनी केल्याने दिगंबर व त्यांचे शत्रुत्व आणखी वाढले आहे.कामत म्हणाले की, 'कोणी कोणालाही अडवू शकत नाही. उद्या मला जनता दरबार भरवावा असे वाटले तर मी तो भरवीन. सर्वांनाच नशीब आजमावण्याचा अधिकार आहे. निवडणुकीला बरेच दिवस आहेत.' 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण