शहरं
Join us  
Trending Stories
1
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
2
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
3
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
4
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
5
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
6
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
7
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
8
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
9
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
10
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
11
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
12
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
13
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
14
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
15
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
16
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
17
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
18
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
19
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
20
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!

मगोप सोडलेल्यांना पुन्हा प्रवेश किंवा तिकीटदेखील देणार नाही: सुदिन ढवळीकर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 13:11 IST

पक्षाच्या आमसभेने आधीच निर्णय घेतल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा प्रवेश नाही तसेच निवडणुकीसाठी तिकीटदेखील दिले जाणार नाही, असा कडक निर्णय मगोपच्या आमसभेने याआधी घेतलेला आहे, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

याबाबत पत्रकारांच्या एका प्रश्नावर बोलताना मंत्री ढवळीकर म्हणाले की, '२००७ नंतर हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. काहीजण पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून येतात व पक्षाला बाधक वक्तव्ये करतात व नंतर पक्ष सोडून अन्य पक्षात प्रवेश करतात. आम्ही तिकीट देऊन निवडून आणतो व नंतर ते पक्ष सोडून जातात, हे यापुढे चालणार नाही. आमसभा जो निर्णय घेते तो मी किंवा पक्षाचा अध्यक्षही बदलू शकत नाही'

ढवळीकर म्हणाले की, 'आणखी एक महत्त्वाचा निर्णय आमसभेने घेतला आहे, तो म्हणजे मगोपच्या तिकिटावर प्रथमच आमदार म्हणून निवडून येणाऱ्याने पहिल्या टर्ममध्ये मंत्रिपद मागू नये. प्रथमच निवडून येणाऱ्याने एखादे महामंडळ स्वीकारावे. इतर काही गोष्टी शिकाव्यात, असा पक्षाचा आग्रह आहे. तर काही करता येते.'

... पक्ष सोडायला नको होता

सुदिन ढवळीकर म्हणाले की, 'मी केवळ मगोपबद्दलच बोलतोय असे नव्हे तर अन्य पक्षातही असे काही नेते आहेत, जे पक्षाच्या तिकिटावर निवडून येऊन मुख्यमंत्री बनले व नंतर त्यांनी पक्ष सोडला.' लक्ष्मीकांत पार्सेकर व दिगंबर कामत यांच्या नावांचा उल्लेख करून ढवळीकर म्हणाले की, 'या दोघांनी पक्ष सोडायला नको होता, असे माझे वैयक्तिक मत आहे. मगोपतून असे अनेकजण गेले, खास करून चांगले नेते गेले. त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले.'

प्रत्येकाला नशीब आजमावण्याचा अधिकार : कामतांचा विजयला टोला

'नशीब आजमावण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे', अशी प्रतिक्रिया आमदार दिगंबर कामत यांनी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी सुरू केलेल्या 'जनता दरबार'वर दिली. आमदार सरदेसाई यांनी विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी 'जनता दरबार' घेतले आहेत. आतापर्यंत त्यांनी पेडणे, म्हापसा, डिचोली, काणकोण येथे दरबार घेतले आहेत.दरम्यान, मडगाव पालिका निवडणुकीत केवळ फातोर्थ्यातच नव्हे, तर मडगावातील प्रभागांमध्येही आपण उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. २०२७ च्या विधानसभेवेळी गोवा फॉरवर्ड मडगावमधूनही लढू शकतो, असे भाष्य अलीकडेच विजय यांनी केल्याने दिगंबर व त्यांचे शत्रुत्व आणखी वाढले आहे.कामत म्हणाले की, 'कोणी कोणालाही अडवू शकत नाही. उद्या मला जनता दरबार भरवावा असे वाटले तर मी तो भरवीन. सर्वांनाच नशीब आजमावण्याचा अधिकार आहे. निवडणुकीला बरेच दिवस आहेत.' 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण