शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

ही तर मराठी भाषा नाकारण्याची कायदेशीर चूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2025 13:59 IST

मायमराठीच्या बाबतीत मुख्यमंत्री हा आपपरभाव का करत आहेत, याला कोणत्या छुप्या षडयंत्राच्या, दबावांच्या गोष्टी कारणीभूत आहेत का?

डॉ. अनुजा जोशी, वाळपई

राज्य कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षेत फक्त कोंकणी भाषा अनिवार्य करणे म्हणजेच सहभाषा मराठीला टाळणे हे अन्यायकारक आहे. राजभाषा कायद्यात मराठीच्या सर्वप्रकारच्या कायदेशीर वापराची तरतूद असताना, सर्वत्र दोन्ही भाषा एकत्र नांदत असताना केवळ निवड आयोगाच्या परीक्षेत मराठी भाषा नाकारण्याची कायदेशीर चूक सरकार करत आहे. त्यासाठीची दिली गेलेली कारणेही लंगडी वाटतात. आणि त्याबद्दल आवाज उठवण्याची वेळ यावी हे केवळ दुर्दैवी आहे.

रहिवासी दाखल्यासारख्या गोष्टींच्या आधारे गोमंतकीयांनाच नोकरी मिळणे सहज शक्य आहे. त्यासाठी परीक्षेत मराठी टाळण्याची कोणतीच गरज नाही. या एकांगी निर्णयाने होणारी हानी ही केवळ मराठी भाषेची नसून ती गोव्याच्या संस्कृतीची, शिक्षणाची, प्रगतीची सर्वांगीण हानी ठरेल. आधीच भारतीय भाषांशी नाळ तुटत चाललेला नोकरदार युवा वर्ग यामुळे आणखी विस्कळीत होईल. 'म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो' या म्हणीप्रमाणे मराठीची गळचेपी गोव्याच्या भवितव्यावर घाला घालू शकते, हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. मूल्यांच्या पडझडीच्या या बिकट काळात सरकारने असे आततायी निर्णय घेणे हे सर्व बाजूंनी घातक ठरेल. विचारवंत व साहित्यिकांशी साधक बाधक चर्चा करून सरकारने याप्रकारच्या निर्णयांचे दूरगामी दुष्परिणाम समजून घ्यावे व आपला निर्णय बदलावा असा आम्ही आग्रह धरत आहोत.

सरकारला गोव्याच्या इतिहासातील मराठीचे स्थान व संघर्ष पूर्णपणे ठाऊक आहे. जनमानसात असलेली लोकप्रियता व शिक्षण, कला, संस्कृती, विज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात मराठीने जगभर पोचवलेली गोव्याची कीर्ती, परकीय आक्रमणांतूनही मराठीने जपलेली गोमंतकीय अस्मिता, ही पुरातन काळापासूनची मराठीची थोरवी मुख्यमंत्री जाणतातच. पूर्वी ते मराठी चळवळीत सक्रियही होते. भाजप सरकार हे आमचे हक्काचे सरकार आहे व आम्ही सरकारचे आहोत, अशीही बहुतांश मराठीप्रेमींची गेली अनेक वर्षे मनोधारणा दिसते. 'केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र'च्या धर्तीवर 'केंद्रात मोदी सरकार-गोव्यात प्रमोदी सरकार' असा डंकाही गोव्यात पुढील काळात गाजू शकतो. जनसामान्यांना आपलासा वाटणारा धडाडीचा नेता अशी मुख्यमंत्र्यांची प्रतिमा आहे. बिकट परिस्थितीत राज्यकारभार हाती येऊनही अतिशय कुशलतेने व वेगाने प्रशासकीय कामांचा धडाका लावून अल्पावधीत अफाट लोकप्रिय झालेले व दमदारपणे वाटचाल करणारे मुख्यमंत्री सावंत हे गोमंतकीयांचे लाडके व्यक्तिमत्त्व आहे.

गोमंतकीय इतिहासात डॉ. सावंत यांच्या लोकप्रियतेची व राज्यकारभाराची वेगळी नोंद निश्चितपणे घेतली जाईल, अशी वेगळी गुणवत्ता त्यांच्यामध्ये आहे. असे असताना अभिजात मायमराठीच्या बाबतीत मुख्यमंत्री हा आपपरभाव का करत आहेत, याला कोणत्या छुप्या षडयंत्राच्या, दबावांच्या गोष्टी कारणीभूत आहेत का? असे असंख्य प्रश्न मराठीप्रेमींच्या मनात स्वाभाविकपणे उमटत आहेत व गुंते वाढवायला अनेक राजकीय, जातीयवादी विघातक शक्ती छुपेपणाने मदत करत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मराठीप्रेमींनी याची गंभीर दखल घेत एकत्र यायला सुरुवात केली आहेच. पण या प्रश्नासाठी आंदोलन वगैरे उभारण्याची वेळ मुख्यमंत्री नक्कीच येऊ देणार नाहीत, असाही विश्वास आम्हाला वाटतो.

तरी आणखी विलंब न करता दोन्ही भाषांबद्दलच्या समान संवेदनशीलतेने, कृतज्ञ जाणीवेने व मराठीजनांच्या हृदयातील सरकारविषयीच्या आस्थेला व प्रेमाला स्मरून सरकारने मराठीच्या मुळावर उठलेली ही समस्या त्वरित सोडवावी व कोकणीप्रमाणेच नोकरभरती परीक्षांमध्ये मराठीचाही समावेश अनिवार्य करावा. या अशा अन्यायकारक गोष्टी व कुरापती कायमच्या टाळण्यासाठीच मराठी राजभाषा होणे अपरिहार्य आहे. कोकणीबरोबर मराठीलाही राजभाषेचा दर्जा देऊन भाषावादाच्या शापातून गोमंतकाला कायमचे मुक्त करण्याचा सुवर्णाक्षरी इतिहास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनीच रचावा अशाच आमच्या सदिच्छा!

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतmarathiमराठी