शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

हा आंतरराष्ट्रीय नव्हे, देशी चित्रपट महोत्सव; विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांची जोरदार टीका

By किशोर कुबल | Updated: November 1, 2023 13:05 IST

- श्वेतपत्रिका काढण्याची मागणी

पणजी : गोव्यात होणाय्र इफ्फीच्या आयोजनावर  टिकेची झोड उठवताना विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यानी हा आंतरराष्ट्रीय नव्हे, देशी चित्रपट महोत्सव असल्याचे म्हटले आहे. श्वेतपत्रिका काढून दरवर्षी होणाऱ्या अवाढव्य  खर्चाच्या तुलनेत  इफ्फीचा गोव्याला काय फायदा झाला, हे जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गेल्या चार वर्षांत इफ्फीसाठी केवळ २६९ विदेशी प्रतिनिधींची नोंदणी झाली.  गोवा सरकारकडून सुमारे  १०० कोटी खर्च झाला. केंद्राकडून ११.८ कोटींचे नगण्य अर्थसहाय्य गोवा सरकारला मिळाले आणि इफ्फीच्या अधिकृत विभागात गोव्याचा फक्त एक चित्रपट प्रदर्शित झाला, अशी आकडेवारीच युरी यांनी दिली आहे.ते म्हणाले कि, ‘आकडेवारी जाहीर करण्याचे माझे आव्हान मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले नाही त्यामुळे मला  ही आकडेवारी सार्वजनिक करणे भाग पडले आहे.’

इफ्फीचे अधिकार आता गोवा सरकार अथवा मनोरंजन संस्थेकडे राहिले नसून, केवळ निवास व वाहतूक व्यवस्था सांभाळणे एवढीच जबाबदारी गोवा सरकारकडे आहे.  ते म्हणाले कि,‘ २०१९ साली झालेल्या ५० व्या इफ्फीला केवळ ११६ आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी झाले, तर २०२१ मधील ५१ व्या इफ्फीत केवळ ३३ आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित होते.  २०२२ मधील ५२ व्या इफ्फीसाठी ३७ विदेशी प्रतिनिधींनी नोंदणी केली  तर ५३  व्या इफ्फीत केवळ ८३ आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित होते. सरकारनेच दिलेल्या  माहितीवरुन २०१९ ते २०२२ पर्यंत इफ्फीसाठी नोंदणी करणाऱ्या एकूण प्रतिनिधींची संख्या केवळ २२,००३ होती. त्यापैकी ६४८० गोमंतकीय होते.

मागील चार इफ्फींसाठी सरकारला फक्त ४.५ कोटींचे प्रायोजकत्व मिळू शकले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इफ्फीच्या ५० व्या आवृत्तीचे प्रमुख प्रायोजक हे गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ आणि माहिती तंत्रज्ञान हे सरकारी विभाग होते.  सुवर्ण महोत्सवी आवृत्तीसाठीसुद्धा सरकारला कोणतेही खाजगी प्रायोजक मिळू शकले नाहीत.

५३ व्या इफ्फीत भारतीय पॅनोरमाच्या अधिकृत विभागात राजेश पेडणेकर निर्मित आणि साईनाथ उसकईकर  दिग्दर्शित “वाग्रो” हा एकच लघू चित्रपट निवडला गेला. गोवा फिल्म फायनान्स योजना २००६ मध्ये काँग्रेस सरकारने सुरू केली होती. दुर्दैवाने, गोवा मनोरंजन संस्थेने सदर योजना २०१२ ते २०१६ या काळात बासनात गुंडाळून ठेवली. आजपर्यंत या योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या ३५ चित्रपटांपैकी जवळपास ७५ टक्के चित्रपटांची निर्मिती  काँग्रेस सरकारच्या काळात झाली होती, असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.