शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्पापूर्वी लोकांचा विचार करावा लागेल, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 15:51 IST

वाघांचे संरक्षण व्हायलाच हवे. जंगलांच्याही रक्षणासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पण वाघ्र संरक्षण प्रकल्प राबवावा की आणखी काय करावे ते अभ्यासाअंती ठरवू.

पणजी - गोव्यात व्याघ्र संरक्षण प्रकल्प राबविण्याची शिफारस केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाच्या चौकशी पथकाने यापूर्वी केली आहे पण गोवा सरकारने असा प्रकल्प राबविण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.म्हादई अभयारण्यात चार वाघांची हत्त्या झाल्यानंतर पर्यावरण मंत्रालयाने चौकशी पथक गोव्यात पाठवले होते. राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणातील अधिका-यांच्या त्या पथकाने गोव्यातील वाघांच्या संरक्षणाविषयी नुकताच अहवाल दिला. गोवा म्हणजे वाघांसाठी मृत्यूचा सापळा बनू नये व त्यासाठी व्याघ्र संरक्षण प्रकल्प राबवावा अशी शिफारस अहवालातून केली गेली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्रकारांनी बुधवारी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले, की अजून अधिकृतरीत्या गोवा सरकारकडे हा अहवाल आलेला नाही. वन मंत्रलयाकडून अहवाल मागू घ्या अशी सूचना मी वरिष्ठ अधिका:यांना केली आहे. प्रसार माध्यमांना अहवाल मिळाला पण सरकारकडे अजून अधिकृत प्रत मिळालेली नाही. आम्ही तो अहवाल वाचू व त्यानंतर वाघ संरक्षणाविषयी काय करता येईल ते पडताळून पाहू.मुख्यमंत्री म्हणाले, की वाघांचे संरक्षण व्हायलाच हवे. जंगलांच्याही रक्षणासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गोव्यात 34 टक्के वन क्षेत्र आहे याचा आम्हाला अभिमान आहे पण वाघ्र संरक्षण प्रकल्प राबवावा की आणखी काय करावे ते अभ्यासाअंती ठरवू. अहवालातून शिफारस करणो सोपे असते पण जंगलात लोकही राहतात याचाही विचार करावा लागतो. त्या लोकांचाही विचार सरकारला करावा लागतो. वाघांच्या रक्षणाविषयी विविध शक्यता आम्ही पडताळून पाहू.दरम्यान, अभयारण्यांमध्ये जे लोक राहतात त्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न सरकार करील असे मुख्यमंत्र्यांनी पणजीत वन भवनाचे बुधवारी उद्घाटन केल्यानंतर सांगितले. अभयारण्यांमध्ये ट्रेकिंगसाठी काही जागा सरकारने निवडल्या आहेत. तिथे ट्रेकर्सना ट्रेकिंगसाठी जाऊ दिले जाईल. औषधी वनस्पती किंवा औषधी पाळेमुळे किंवा बिया जे गोळा करतात, त्यांची नोंदणी सरकार करून घेईल. त्यांना परवाना दिला जाईल व मग त्यांना अभयारण्यांमध्ये जाता येईल. बिया, वनस्पती वगैरे गोळा करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Tigerवाघgoaगोवा