शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणावरून भंडारी समाजात फुटू देणार नाही- अशोक नाईक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 20:16 IST

समाज एकसंध ठेवण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं समाजाचे नवनिवार्चित अध्यक्ष अशोक नाईक यांनी म्हटलं.

पणजी: गोव्याच्या लोकसंख्येचा एक मोठा हिस्सा असलल्या गोमंतक भंडारी समाजात यापुढे राजकीय मुद्यांवरून फूट पडू देणार नाही, अशी घोषणा असे या समाजाचे नवनिवार्चित अध्यक्ष अशोक कृष्णा नाईक यांनी केली आहे. राजकीय मतभेद बाजूला सारून समाज एकसंध राखणे आणि समाजाचा विकास करणे हे उद्दिष्ट ठेऊन काम करणार असल्याचे त्यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

भंडारी समाजाच्या राज्य कार्यकारणीची निवडणूक नुकतीच पार पाडून अशोक नाईक हे या समाजाचे अध्यक्ष झाले. प्रबळ उमेदवार असलेले अनिल होबळे यांचा त्यांनी ७८ मतांनी पराभव केला. लोकमतशी संवाद साधताना ते म्हणाले की, समाज एकसंध राखणे हे ब्रीद राहील  आणि सर्वांना सोबत घेऊन एकत्रपणे काम करणे हेच आपले तंत्र राहील. पक्षीय राजकारणाला बळी पडून समाजाचे विघटन होवू देणार नाही. समाजाच्या एका झालेल्या व्यापक बैठकीतही तसा निर्णय घेण्यात अला आहे. भाजपमध्ये असलेले केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, माजी आमदार दामू नाईक, दयानंद मांद्रेकरही आमचेच आहेत आणि काँग्रेसमध्ये असलेले आमदार रवी नाईकही आमचेच आहेत. 

गोव्यात ४.५ लाख लोक हे भंडारी समाजाचे घटक आहेत.  समाजातील लोकांची शीरगणती करण्याचे काम हाती घेण्यात येईल. त्यामुळे समाजासाठी विकासाचे उपक्रम हाती घेण्यासाठी ते सोयीचे होईल. विशेषत: शिक्षणाच्या बाबतीत या समाजाची जी प्रगती झालेली आहे ती पुरेशी नाही. विशेषत: मुलींच्या शिक्षणासाठी बरेच काही करण्यासारखे आहे. माझे कार्यकारणी सदस्य व समाजबांधवाच्या मदतीने सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. गोव्याच्या १४.५ लाख लोकसंख्येत भंडारी समाजाचे प्रमाण हे २७ टक्क्यांहून अधिक आहे. गोव्याच्या राजकारणातही या समाजाची छाप आहे. या समाजाचे घटक असलेले श्रीपाद नाईक हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आयुश मंत्री आहेत. तसेच सध्या काँग्रेसचे आमदार असलेले रवी नाईक हे या समाजातून मुख्यमंत्री झालेले एकमेव नेते आहेत. 

टॅग्स :goaगोवा