शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

राजकारणावरून भंडारी समाजात फुटू देणार नाही- अशोक नाईक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 20:16 IST

समाज एकसंध ठेवण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं समाजाचे नवनिवार्चित अध्यक्ष अशोक नाईक यांनी म्हटलं.

पणजी: गोव्याच्या लोकसंख्येचा एक मोठा हिस्सा असलल्या गोमंतक भंडारी समाजात यापुढे राजकीय मुद्यांवरून फूट पडू देणार नाही, अशी घोषणा असे या समाजाचे नवनिवार्चित अध्यक्ष अशोक कृष्णा नाईक यांनी केली आहे. राजकीय मतभेद बाजूला सारून समाज एकसंध राखणे आणि समाजाचा विकास करणे हे उद्दिष्ट ठेऊन काम करणार असल्याचे त्यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

भंडारी समाजाच्या राज्य कार्यकारणीची निवडणूक नुकतीच पार पाडून अशोक नाईक हे या समाजाचे अध्यक्ष झाले. प्रबळ उमेदवार असलेले अनिल होबळे यांचा त्यांनी ७८ मतांनी पराभव केला. लोकमतशी संवाद साधताना ते म्हणाले की, समाज एकसंध राखणे हे ब्रीद राहील  आणि सर्वांना सोबत घेऊन एकत्रपणे काम करणे हेच आपले तंत्र राहील. पक्षीय राजकारणाला बळी पडून समाजाचे विघटन होवू देणार नाही. समाजाच्या एका झालेल्या व्यापक बैठकीतही तसा निर्णय घेण्यात अला आहे. भाजपमध्ये असलेले केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, माजी आमदार दामू नाईक, दयानंद मांद्रेकरही आमचेच आहेत आणि काँग्रेसमध्ये असलेले आमदार रवी नाईकही आमचेच आहेत. 

गोव्यात ४.५ लाख लोक हे भंडारी समाजाचे घटक आहेत.  समाजातील लोकांची शीरगणती करण्याचे काम हाती घेण्यात येईल. त्यामुळे समाजासाठी विकासाचे उपक्रम हाती घेण्यासाठी ते सोयीचे होईल. विशेषत: शिक्षणाच्या बाबतीत या समाजाची जी प्रगती झालेली आहे ती पुरेशी नाही. विशेषत: मुलींच्या शिक्षणासाठी बरेच काही करण्यासारखे आहे. माझे कार्यकारणी सदस्य व समाजबांधवाच्या मदतीने सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. गोव्याच्या १४.५ लाख लोकसंख्येत भंडारी समाजाचे प्रमाण हे २७ टक्क्यांहून अधिक आहे. गोव्याच्या राजकारणातही या समाजाची छाप आहे. या समाजाचे घटक असलेले श्रीपाद नाईक हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आयुश मंत्री आहेत. तसेच सध्या काँग्रेसचे आमदार असलेले रवी नाईक हे या समाजातून मुख्यमंत्री झालेले एकमेव नेते आहेत. 

टॅग्स :goaगोवा