शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गोव्यात अल्पसंख्यांक आयोग नसल्याने मुस्लिम, ख्रिस्ती बांधवांकडून नाराजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 12:59 IST

अल्पसंख्यांकांनी दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पणजी : गोव्यात अद्याप राज्य अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना झालेली नसल्याने मुस्लिम, ख्रिस्ती आदी अल्पसंख्यांक बांधवांनी दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. 

 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम. के. शेख म्हणाले की, ‘ हे सरकार अल्पसंख्यांकांना न्याय देऊ शकत नाही आणि या सरकारच्या कारकिर्दित आम्हाला आयोग मिळणार नाही याची जाणीव आम्हाला आहे. सफिना हिच्या बाबतीत आता मानवी हक्क आयोगानेच दखल घेऊन तिला न्याय द्यावा.’ 

शेख पुढे म्हणाले की, ‘भारतीय घटनेने प्रत्येकाला काय खावे, कोणता वेश परिधान करावा किंवा आपल्या धर्माप्रमाणे वागण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे सफिना हिच्याबाबतीत अन्याय झाल्याचे स्पष्टपणे दिसते. तिने अखिल भारतीय अल्पसंख्यांक आयोगाकडे हे प्रकरण न्यावे.’

‘लोकांचो आधार’चे ट्रोजन डिमेलो म्हणाले की, ‘ अल्पसंख्यांकांवर अन्याय होतो तेव्हा न्याय मागण्यासाठी कोणाकडे जावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. हे सरकार निष्क्रीय बनले असून या सरकारच्या कारकिर्दित अल्पसंख्यांक आयोग मिळणे कठीणच आहे. आयोग स्थापन करण्यास टाळाटाळ करुन सरकार अप्रत्यक्षपणे अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांना खतपाणी घालत आहे.’

राज्यात सुमारे २७ टक्के ख्रिस्ती तर सुमारे ७ टक्के मुस्लिम बांधव आहेत. अलीकडेच सफिना खान सौदागर या महिलेला हिजाब परिधान केल्याने ‘नेट’ परीक्षा देण्यास मनाई केल्याचे प्रकरण गाजत असतानाच अल्पसंख्यांक आयोगाची उणीव प्रकर्षाने भासत आहे.

टॅग्स :goaगोवा