शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

राज्यात पेट्रोलटंचाई नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 13:07 IST

प्राथमिक अहवाल मिळाला त्यानुसार कंपनीला कडक इशारा देणारे पत्र पाठवले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : माटवे-दाबोळी येथे पेट्रोल गळती प्रकरणात प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून ही गळती नैसर्गिक असल्याचे आढळून आले आहे. संबंधित पेट्रोलियम कंपनीवर कारवाई केली जाईल. तूर्त पेट्रोलची कोणतीही टंचाई नसल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत बोलताना एका प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतलेली आहे. असले प्रकार मुळीच खपवून घेतले जाणार नाहीत. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच दक्षिण जिल्हाधिकारी कार्यालय करडी नजर ठेवून आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे. प्राथमिक अहवाल मिळाला त्यानुसार कंपनीला कडक इशारा देणारे पत्र पाठवले आहे.

संबंधित पेट्रोलवाहिनी बराच काळ विनावापर होती. सरकारने कंपनीला ती बदलण्यास सांगितले आहे. या कामासाठी महिनाभर जाईल. वाहिनी बदलल्यानंतरच पेट्रोलसाठी वापरली जाईल. दरम्यान, पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली असून राज्यात पेट्रोलची मुळीच टंचाई नसल्याचे सावंत यांनी सांगितले.

विश्वकर्मा : १४ हजार जणांची नोंद

केंद्राच्या विश्वकर्मा योजनेत राज्यभरात १४ हजार जणांनी नोंदणी केली असून २० हजार नोंदणी अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. व्यापार, व्यवसाय करणाऱ्या १८ प्रकारच्या व्यावसायिकांना याचा लाभ दिला जातो. ही योजना जातीवर आधारित नव्हे, काहीजणांनी गैरसमज करुन घेतला आहे तो दूर करावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवा