शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

...तर नव्या बांधकामांना नळ जोडण्या देणार नाही; यापुढे 'पाणी उपलब्धता प्रमाणपत्र' सक्तीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2024 09:28 IST

बेकायदेशीरपणे बोअरवेलची खुदाई करुन पाणी चोरले जात असल्याचेही आढळून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : पाणी चोरीचे प्रकार अधिकतर प्रकार हे बांधकामाच्या ठिकाणी आढळून येतात. यापुढे नव्या बांधकामांनी 'पाणी उपलब्धता प्रमाणपत्र' सादर केल्याशिवाय त्यांना नळ जोडणी दिली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिला.

बेकायदेशीरपणे बोअरवेलची खुदाई करुन पाणी चोरले जात असल्याचेही आढळून आले आहे. बेकायदेशीर बोअरवेलविरोधात सरकार कारवाई करण्याचे धाडस करीत आहे. अशा प्रकारे बोअरवेल खुदाई करणाऱ्यांना १० लाखांचा दंड ठोठावला जाईल. तसेच सध्या जे बोअरवेलच्या पाण्याचा वापर करीत आहेत, त्यांच्याकडून है पैसे वसूल केले जातील असा इशाराही त्यांनी दिला. राज्यातील अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे. २४ तास पाणी पुरवठ्यासाठी सरकारने कोणती ठोस पावले उचलली, अशी लक्षवेधी सूचना आमदार विजय सरदेसाई यांनी मांडली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना वरील इशारा दिला.

आमदार सरदेसाई म्हणाले, सरकार एका बाजूने 'हर घर जल'चा नारा देत असले तरी अनेक ठिकाणी पाण्याची प्रचंड कमतरता आहे. पिसुर्ले सारख्या भागात पाणी समस्येविरोधात लोकांना न्यायालयात जावे लागले. तर काहींनी राज्य मानवाधिकार आयोगाचेही दरवाजे ठोठावले. सरकारने पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी सुविधा तयार कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. आमदार वीरेश बोरकर म्हणाले, की सरकार हर घर जल, २४ तास पाणी देण्याचा नारा देत असताना आजही अनेक भागांमध्ये लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. गावांतच नव्हे तर शहरांमध्येही अनियमत पाणी येत असून २४ तास सोडाच साधे दोन ते तीन तासही पाणी येत नाही. गावडोंगरी सारख्या गावात शालेय विद्यार्थी सकाळी उठून घरात पाणी भरतात व नंतर शाळेत जातात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री म्हणाले, सरकार प्रत्येक नागरिकाला १६ क्युबीक पाणी मोफत देत आहे. म्हणजेच जवळपास ४० टक्के लोकांना फुकट पाणी मिळते. असे असूनही सरकारच्या महसूलात १६ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. पाणी चोरीचे प्रकार मात्र वाढले आहेत. बेकायदेशीरपणे बोअरवेल खोदून तर काहीजण दुसऱ्यांच्या नळाच्या जोडणीतून पाणी चोरतात. बांधकामाच्या ठिकाणी असे प्रकार आढळतात. पाणी चोरीवर चाप आणण्यासाठी नव्या बांधकामांनी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय त्यांना पाणी जोडणी दिली जाणार नाही. सरकारची याबाबत कडक भूमिका असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनPramod Sawantप्रमोद सावंत