शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

...तर नव्या बांधकामांना नळ जोडण्या देणार नाही; यापुढे 'पाणी उपलब्धता प्रमाणपत्र' सक्तीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2024 09:28 IST

बेकायदेशीरपणे बोअरवेलची खुदाई करुन पाणी चोरले जात असल्याचेही आढळून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : पाणी चोरीचे प्रकार अधिकतर प्रकार हे बांधकामाच्या ठिकाणी आढळून येतात. यापुढे नव्या बांधकामांनी 'पाणी उपलब्धता प्रमाणपत्र' सादर केल्याशिवाय त्यांना नळ जोडणी दिली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिला.

बेकायदेशीरपणे बोअरवेलची खुदाई करुन पाणी चोरले जात असल्याचेही आढळून आले आहे. बेकायदेशीर बोअरवेलविरोधात सरकार कारवाई करण्याचे धाडस करीत आहे. अशा प्रकारे बोअरवेल खुदाई करणाऱ्यांना १० लाखांचा दंड ठोठावला जाईल. तसेच सध्या जे बोअरवेलच्या पाण्याचा वापर करीत आहेत, त्यांच्याकडून है पैसे वसूल केले जातील असा इशाराही त्यांनी दिला. राज्यातील अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे. २४ तास पाणी पुरवठ्यासाठी सरकारने कोणती ठोस पावले उचलली, अशी लक्षवेधी सूचना आमदार विजय सरदेसाई यांनी मांडली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना वरील इशारा दिला.

आमदार सरदेसाई म्हणाले, सरकार एका बाजूने 'हर घर जल'चा नारा देत असले तरी अनेक ठिकाणी पाण्याची प्रचंड कमतरता आहे. पिसुर्ले सारख्या भागात पाणी समस्येविरोधात लोकांना न्यायालयात जावे लागले. तर काहींनी राज्य मानवाधिकार आयोगाचेही दरवाजे ठोठावले. सरकारने पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी सुविधा तयार कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. आमदार वीरेश बोरकर म्हणाले, की सरकार हर घर जल, २४ तास पाणी देण्याचा नारा देत असताना आजही अनेक भागांमध्ये लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. गावांतच नव्हे तर शहरांमध्येही अनियमत पाणी येत असून २४ तास सोडाच साधे दोन ते तीन तासही पाणी येत नाही. गावडोंगरी सारख्या गावात शालेय विद्यार्थी सकाळी उठून घरात पाणी भरतात व नंतर शाळेत जातात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री म्हणाले, सरकार प्रत्येक नागरिकाला १६ क्युबीक पाणी मोफत देत आहे. म्हणजेच जवळपास ४० टक्के लोकांना फुकट पाणी मिळते. असे असूनही सरकारच्या महसूलात १६ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. पाणी चोरीचे प्रकार मात्र वाढले आहेत. बेकायदेशीरपणे बोअरवेल खोदून तर काहीजण दुसऱ्यांच्या नळाच्या जोडणीतून पाणी चोरतात. बांधकामाच्या ठिकाणी असे प्रकार आढळतात. पाणी चोरीवर चाप आणण्यासाठी नव्या बांधकामांनी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय त्यांना पाणी जोडणी दिली जाणार नाही. सरकारची याबाबत कडक भूमिका असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनPramod Sawantप्रमोद सावंत