शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

...तर नव्या बांधकामांना नळ जोडण्या देणार नाही; यापुढे 'पाणी उपलब्धता प्रमाणपत्र' सक्तीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2024 09:28 IST

बेकायदेशीरपणे बोअरवेलची खुदाई करुन पाणी चोरले जात असल्याचेही आढळून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : पाणी चोरीचे प्रकार अधिकतर प्रकार हे बांधकामाच्या ठिकाणी आढळून येतात. यापुढे नव्या बांधकामांनी 'पाणी उपलब्धता प्रमाणपत्र' सादर केल्याशिवाय त्यांना नळ जोडणी दिली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिला.

बेकायदेशीरपणे बोअरवेलची खुदाई करुन पाणी चोरले जात असल्याचेही आढळून आले आहे. बेकायदेशीर बोअरवेलविरोधात सरकार कारवाई करण्याचे धाडस करीत आहे. अशा प्रकारे बोअरवेल खुदाई करणाऱ्यांना १० लाखांचा दंड ठोठावला जाईल. तसेच सध्या जे बोअरवेलच्या पाण्याचा वापर करीत आहेत, त्यांच्याकडून है पैसे वसूल केले जातील असा इशाराही त्यांनी दिला. राज्यातील अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे. २४ तास पाणी पुरवठ्यासाठी सरकारने कोणती ठोस पावले उचलली, अशी लक्षवेधी सूचना आमदार विजय सरदेसाई यांनी मांडली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना वरील इशारा दिला.

आमदार सरदेसाई म्हणाले, सरकार एका बाजूने 'हर घर जल'चा नारा देत असले तरी अनेक ठिकाणी पाण्याची प्रचंड कमतरता आहे. पिसुर्ले सारख्या भागात पाणी समस्येविरोधात लोकांना न्यायालयात जावे लागले. तर काहींनी राज्य मानवाधिकार आयोगाचेही दरवाजे ठोठावले. सरकारने पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी सुविधा तयार कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. आमदार वीरेश बोरकर म्हणाले, की सरकार हर घर जल, २४ तास पाणी देण्याचा नारा देत असताना आजही अनेक भागांमध्ये लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. गावांतच नव्हे तर शहरांमध्येही अनियमत पाणी येत असून २४ तास सोडाच साधे दोन ते तीन तासही पाणी येत नाही. गावडोंगरी सारख्या गावात शालेय विद्यार्थी सकाळी उठून घरात पाणी भरतात व नंतर शाळेत जातात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री म्हणाले, सरकार प्रत्येक नागरिकाला १६ क्युबीक पाणी मोफत देत आहे. म्हणजेच जवळपास ४० टक्के लोकांना फुकट पाणी मिळते. असे असूनही सरकारच्या महसूलात १६ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. पाणी चोरीचे प्रकार मात्र वाढले आहेत. बेकायदेशीरपणे बोअरवेल खोदून तर काहीजण दुसऱ्यांच्या नळाच्या जोडणीतून पाणी चोरतात. बांधकामाच्या ठिकाणी असे प्रकार आढळतात. पाणी चोरीवर चाप आणण्यासाठी नव्या बांधकामांनी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय त्यांना पाणी जोडणी दिली जाणार नाही. सरकारची याबाबत कडक भूमिका असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनPramod Sawantप्रमोद सावंत