शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
3
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
4
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
5
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
6
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
7
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
8
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
9
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
10
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
11
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
12
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
13
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
14
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
15
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
16
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
17
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
18
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
19
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
20
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री

...तर राजीनामा द्या,उद्धव ठाकरेंनी सुरेश प्रभूंना ठणकावलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2017 19:17 IST

रेल्वेत नोकरभरतीची मागणी पूर्ण करणे शक्य नसेल तर सुरेश प्रभू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव यांनी केली

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 1 - रेल्वेत नोकरभरतीची मागणी पूर्ण करणे शक्य नसेल तर सुरेश प्रभू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव यांनी केली. मराठी तरुणांवर झालेल्या लाठीहल्ल्याबाबत त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘बुलेट ट्रेनची स्वप्ने नको, आधी नोक-या द्या. आजपावेतो भकडकथा भरपूर ऐकल्या. जमत नसेल तर प्रभू यांनी मंत्रिपद सोडवे’. 
उध्दव म्हणाले की, दिल्लीत ज्या मराठी युवकांवर लाठीहल्ला झाला त्यांच्याबाबत सेनेला सहानुभुती आहेच. शिवसेनेचे खासदार खैरे, अडसूळ  संसद मार्ग पोलिस स्थानकात सर्वप्रथम पोचले आणि त्यांनी या युवकांची विचारपूस केली. 
भाजपवर हल्लाबोल
भाजपवर हल्लाबोल करताना ‘ते शिडीसारखा वापर करतात, आणि माडीवर चढल्यावर शिडीवर लाथ मारतात’, असे म्हटले आहे. ‘लाचारी पत्करुन आम्हाला सत्ता नको’ असे प्रतिपादन त्यांनी केले. त्याचबरोबर गोव्यात भाजपने मगोपला संपविण्याचा डाव रचल्याचा आरोपही केला. 
 
 गोव्याकडे दुर्लक्ष झाल्याची प्रांजळ कबुली 
मधल्या काळात शिवसेनेने गोव्याकडे राजकीयदृष्ट्या दुर्लक्ष केले, अशी प्रांजळ कबुली देताना उध्दव म्हणाले की, आपल्या विचारांची माणसे दुसºया राज्यात जर काम करत असतील तर त्यांना अडचण येऊ नये म्हणून मध्ये पडलो नाही. भाजपला अडथळा नको म्हणून दुर्लक्ष केले पण भाजपने तत्त्वांना सोडचिठ्ठी देत गोमंतकीय जनतेचा भ्रमनिरास केला आहे. ते म्हणाले की, मगोपबरोबर युती व्हावी असे बाळासाहेबांना नेहमीच वाटत होते. १९९0 च्या दशकात म्हापशात मोठी सभा घेतली त्यावेळी त्यांनी तशी इच्छाही व्यक्त केली होती परंतु दुर्दैवाने ते शक्य झाले नाही. 
अर्थसंकल्पाबाबत कडवी प्रतिक्रिया
केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत बोलताना उध्दव यांनी केंद्र सरकार मनमानी निर्णय घेत असल्याचा आरोप केला. गतवर्षीच्ी आश्वासने पूर्ण करु शकत नसाल तर अर्थसंकल्पाची गरजच काय, याचसाठी का बहुमत मागता? असा खडा सवाल त्यांनी केला. नोटाबंदीची घोषणा गेल्या अर्थसंकल्पात कुठे केली होती, असा सवाल त्यांनी केला. बँकांमध्ये लोकांनी जे पैसे भरले त्यातून कर्जे बुडविणाºयांचे पैसे फेडून घेण्यात आले. देशाची तिजोरी रिकामी केली. हे असेल चालू राहिले तर पुढील पाच वर्षात भिकेचा कटोरा घेऊन फिरावे लागेल. शिवसेनेने काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. आयकर मर्यादा ५ लाखांवर न्यावी, ज्येष्ठ नागरिकांना कायम ठेवींवर व्याज वाढवून द्यावे, अशी मागणी केली होती. 
गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा देणार काय, या प्रश्नावर उध्दव यांनी ‘आधी सरकार द्या, आणि काय करतो ते नंतर पहा’ असे उत्तर देताना जनतेला हव्या आहेत त्या गोष्टी करीन, असे ते म्हणाले. 
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आलेले उध्दव यानी मगोपचे सुदिन ढवळीकर, गोवा सुरक्षा मंचचे सुभाष वेलिंगकर यांच्याबरोबर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. गोव्यात हे तिन्ही पक्ष युतीने निवडणूक लढवित आहेत. ढवळीकर यांनी २४ जागा युतीला मिळतील, असा दावा केला. केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपबरोबर सत्तेत असताना शिवसेनेची गोव्यात वेगळी भूमिका का, या प्रश्नावर उध्दव म्हणाले की, ‘काँग्रेस नको म्हणून नाईलाजाने आम्ही या दोन्ही ठिकाणी भाजपबरोबर आहोत. मात्र असे असेल तरी  सत्तेवर अंकूश ठेवण्याचे काम करतोय,’.