शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
2
भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
3
Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
4
भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
5
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
6
बसखाली बाईक अडकली, आग उसळली, दरवाजे उघडेनात... २० प्रवाशांचा जळून मृत्यू! नेमकं काय घडलं?
7
टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार
8
IND vs AUS: रोहित शर्मा होणार 'षटकारांचा राजा', आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्यापासून 'इतका' दूर!
9
Satara Crime: "...तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही"; विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
10
'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल
11
PSI सोबतची 'ती' दुसरी व्यक्ती कोण? डॉक्टरने हातावर लिहिलेल्या 'त्या' नावाची ओळख उघड
12
पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...
13
रोहित शर्माला मिडिया फोटोसाठी हाक मारताच गौतम गंभीर म्हणाला, "फोटो काढून घे, सगळ्यांना..."
14
सौदी-पाकिस्तानच्या अणु करारामुळे भारताचा मित्र असणारा मुस्लिम देश संतापला! मनधरणी करायला पाकचे सेना प्रमुख रवाना
15
आशियात नव्या युद्धाची चाहूल; किम जोंगच्या सैनिकांवर दक्षिण कोरियाचा गोळीबार, कारण काय..?
16
ग्लोव्ह्ज कापून काढले, सलाईन लावताना सुई मोडली! तिलक वर्मानं केलाय 'या' जीवघेण्या आजाराचा सामना
17
Carbide Gun : दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत; 'कार्बाइड गन' आहे तरी काय?
18
'बिग बॉस'मध्ये प्रणित मोरेचा पुन्हा कॉमेडी शो, सदस्यांना खळखळून हसवलं; नेटकरी म्हणतात...
19
आयडियाची कल्पना! सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी लढवली शक्कल; डोकं केलं पिंजऱ्यात बंद
20
Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली? 

विरोधकांच्या रणनीतीवर सत्ताधाऱ्यांचे डावपेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 13:05 IST

मुख्यमंत्र्यांनी भाजप व मित्रपक्षांचे मंत्री, आमदारांची बैठक घेऊन केले मार्गदर्शन.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजप व मित्रपक्षांचे मंत्री, आमदार यांची बैठक घेऊन विरोधकांना कसे हाताळायचे याबद्दल रणनीती ठरवली. बैठकीत काही महत्त्वाच्या सूचनाही त्यांनी आमदारांना केल्या. पावसाळी अधिवेशनात विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी करत असताना आता सत्ताधाऱ्यांनीही डावपेच आखले आहेत.

आमदार गोविंद गावडे हेही बैठकीत सहभागी झाले होते. अलीकडेच त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्याने त्यांची भूमिका विधानसभेत काय असेल? ते सरकारला घेरणार की सरकारच्या बाजूने राहणार याबद्दल उत्कंठा आहे. पत्रकारांनी विचारले असता गावडे यांनी कोणतेही भाष्य करण्याचे टाळले.

येत्या २१ जुलैपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून पंधरा दिवस प्रत्यक्ष कामकाज चालणार आहे. सत्ताधारी आमदारांनी तसेच मंत्र्यांनी या अधिवेशनात कोणत्या गोष्टी आवर्जून पाळाव्यात याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. काय करावे व काय करू नये, याचा पाढाच वाचण्यात आला.

मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर बैठकीस अनुपस्थित राहिल्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, ते काही खासगी कामानिमित्त गोव्याबाहेर आहेत व त्यांनी तसे कळवले होते. अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये व आंतोन वास उपस्थित राहिले.

सोमवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, यापुढे भाजपचा कोणताही मंत्री किंवा आमदार एकमेकांविरुद्ध आरोप करणार नाही किंवा एकमेकांची बदनामी करणार नाही. पक्षशिस्त पाळण्याचे सक्त निर्देश मी सर्वांना दिलेले आहेत.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विधानसभा अधिवेशनाच्या तयारीसाठीच ही बैठक होती. भाजप विधिमंडळ सदस्य व सरकारमधील घटक पक्ष तसेच सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची मिळून ही बैठक बोलावली होती. विधानसभा अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा झाली. काही धोरणात्मक निर्णय जाहीर केले जाणार आहेत. तसेच खासगी ठराव व खासगी विधेयके सादर करण्यासाठी अजून दोन दिवस बाकी आहेत, त्यावर चर्चा झाली.

...म्हणून विधानसभा अधिवेशन पंधरा दिवसांचे

अधिवेशनाचे दिवस कमी केल्याबद्दल विरोधी आमदारांकडून होत असलेल्या टीकेसंबंधी विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणावरील तीन दिवसांची चर्चा गेल्या अधिवेशनातच झालेली आहे. त्यामुळे ते तीन दिवस कमी झाले म्हणून अधिवेशन पंधरा दिवसांचे आहे. तर आमदार दिगंबर कामत म्हणाले की, विधानसभा अधिवेशनापूर्वी नेहमीच अशी बैठक होते. या बैठकीत अधिवेशनाबद्दल चर्चा करण्यात आली. आणखी कोणतेही विषय नव्हते. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण