शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

स्मार्ट सिटीच्या खोदकामाचा अडथळा सुरुच; पुन्हा बीएसएनएलचा केबल ताेडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2023 15:32 IST

पणजी शहरात स्मार्ट सिटीची कामे केली जात असताना कुठलेच योग्य नियाेजन केले जात नाही.

- नारायण गावस पणजी: राजधानी पणजी शहरात स्मार्ट सिटीची कामे सुरु आहेत. येत्या ७ महिन्यांत पणजीतील ही सर्व कामे पूर्ण करण्याचे आव्हान कंत्राटदारासमोर आहे. त्यामुळे कामगारांकडून जलदगतीने कामे केली जात आहेत. याचा परिणाम म्हणून अनेक वेळा ताेडातोडही होत आहे. सकाळी गटाराचे खाेदकाम  सुरु असताना बीएसएनएलचा केबल तोडण्यात आला. यामुळे काही बॅँकची इंटरनेट  सेवा काही तास बंद हाेती. त्याचप्रमाणे या अगोदर पाण्याची पाईपलाईन अनेक वेळा फोडली गेली आहे.

पणजी शहरात स्मार्ट सिटीची कामे केली जात असताना कुठलेच योग्य नियाेजन केले जात नाही. मिळेल तिथे खोदले जात आहे. शहरातील प्रमुख रस्ते सध्या खोदले आहेत. गटार खाेदण्याची कामे  घाईगडबडीत केली जात आहेत. काही दिवसांपूर्वी रायबंदर येथे स्मार्ट सिटीचे काम करत असताना गटारात पडून एका कामगाराचा मृत्यू झाला होता. तर या अगोदर अनेक वेळा वाहनचालकांचे या खड्ड्यात पडून अपघात झाले आहेत. अनेक वेळा पाण्याचे टॅँकर तसेच  इतर माेठी अवजड वाहने या खड्ड्यात रुतून पडली होती. पण तरीही स्मार्ट सिटीची काम नियाेजन पद्धतीने केली जात नाही.

पणजीचे आमदार तसेच महापौर या विषयी  गंभीर दिसत नाही.  स्मार्ट सिटीच्या कामाविषयी विचारल्यावर ते प्रत्येक वेळी लाेकांनी काही काळ कळ साेसावी असे सांगतात. पण सर्वसामांन्याच्या भावना कोणीच ऐकून घेत नाही.  स्मार्ट  सिटीसाठी केंद्र सरकार व राज्यसरकारकडून करोडो रुपये निधी आला आहे. तो खर्च करण्यासाठी  विविध प्रकल्प बांधले जात आहेत. अजूनही स्मार्ट सिटीची ५० टक्के कामे ही बाकी आहेत.

टॅग्स :goaगोवा