शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेचा पारा चढल्याने फळांचे भाव वाढले, ज्युस सेंटरमध्ये किमती वाढविल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 14:59 IST

राज्यात उष्णतेचा पारा वाढत असून या उष्णतेचा बचाव करण्यासाठी लोकांनी फळांच्या आहारात वाढ केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे कलिंगण, द्राक्षे, संत्रे, शहाळे, काेकम सरबत, लिंबू पानी तसेच अन्य विविध फळांच्या रसाला मागणी वाढली आहे.

नारायण गावस

पणजी: राज्यात उष्णतेचा पारा वाढत असून या उष्णतेचा बचाव करण्यासाठी लोकांनी फळांच्या आहारात वाढ केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे कलिंगण, द्राक्षे, संत्रे, शहाळे, काेकम सरबत, लिंबू पानी तसेच अन्य विविध फळांच्या रसाला मागणी वाढली आहे. लाेकांना आता आरोग्याची काळजी सतावत असल्याने थंड पेय कमी केल्याने फळांचा रसाला मागणी वाढली आहे. त्यामुळे या उष्णतेच्या बचावासाठी बाजारात फळे विक्रेत्यांनी तसेच ज्युस सेंटरमध्ये याच्या किमती काही प्रमाणात वाढविल्या आहेत.

राज्यात सध्या दुपारचा उष्णतेचा पारा ३५ अंश सेल्सियस पर्यंत जात असतो. त्यामुळे दुपारी ११ ते सांय ४ पर्यंत बाहेर फिरणे  कठीण झाले आहे. उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे लाेकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. आता हिवाळी हंगाम कमी झाला असून ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी काही थंडी असते. पण शहरात दिवसरात्री उष्णतेचा पारा वाढलेला असतो.

राज्यात मागील काही वर्षांपासून उष्णतेचा पारा वाढत आहे. यंदा हिवाळी हंगाम नोव्हेंबर डिसेंबर फक़्त दोनच महिने काही प्रमाणात मिळाला. तर जानेवारीपासून पुन्हा उष्णतेचा पारा चढायला सुरवात झाली. या वाढत्या उष्णतेमुळे लोक आता आरोग्यदायी आहारावर भर देत असल्याने असे अशी पौष्टिक आहार मागणी वाढली आहे. आता आणखी पुढील दाेन महिने ही असाहाय्य उष्णता सहन करावी लागणार आहे.

फळांच्या किंमतीत वाढ 

वाढत्या उष्णतेमुळे फळांच्या किमंती मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. कलिंगड  ३० रुपये प्रती किलाेने विकले जात आहे. संत्री १५० रुपये प्रती किलाे, द्राक्षे १०० रुपये प्रती किलाे, लिंबू १० रुपयाला एक असा आहे. तर शहाळे  ६० रुपये एक अशी विकली जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे या फळांची मागणी वाढली आहे.