शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्षाची सवय घातक; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 10:40 IST

गोमंत विभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गेल्या दहा वर्षांत गोवा राज्य सर्वच क्षेत्रात विकास करीत आहे. मात्र, काही लोकांना चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची सवय झाली आहे. ते चांगल्या गोष्टींचे कौतुक न करता केवळ टीकाच करतात, असा टोला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधकांना लगावला. दोनापावल येथील राजभवनमध्ये आयोजित गोमंत विभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमात पद्मश्री विनायक खेडेकर यांना लोककला, तर पंडित प्रभाकर कारेकर यांना भारतीय शास्त्रीय संगीतसाठी गोमंत विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर आमदार दिगंबर कामत, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, कला व संस्कृती खात्याचे सचिव मिनीनो डिसोझा, माहिती व प्रसिद्धी खात्याचे सचिव सुभाष चंद्र व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, 'कला व साहित्य क्षेत्रात गोव्यात अनेक रत्ने तयार झाली आहेत. या कलाकारांच माहिती भावी पिढीला मिळावी कलाकारांच्या कला व साहित्य क्षेत्रातील योगदानाचे कौतुक गोमंत विभूषण पुरस्काराद्वारे केले जाते गोवामुक्तीनंतर जन्माला आलेला म एकमेव मुख्यमंत्री आहे. आज गोव्यातील लोककला, कलाकारांनी संगीत व साहित्य क्षेत्रात केलेल्य कामाचे जतन अर्थात त्याचे रेकॉ ठेवले जात आहे. कला व संस्कृती खात्याने ही प्रक्रिया सुरू केली आहे भावी पिढीला त्याचा मोठा फायद होईल. गोव्यात कला व संस्कृतील मोठा वाव आहे. आज येथील तरुणांना संगीत शिकण्यासाठी महाविद्यालय तसेच अनेक संस्था उपलब्ध आहेत.'

कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले, 'गोवा ही भारताची सांस्कृतिक राजधानी आहे. गोव्याच्या संगीताला जागतिक किर्ती मिळत आहे. भारतीय संगीताचाही जगभरात प्रसार होत आहे. खेडेकर व कारेकर यांना गोमंत विभूषण पुरस्काराने सन्मानित करणे, हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे', असे त्यांनी सांगितले.

पन्नास वर्षांतील कामाशी तुलना करा 

'सध्याचा काळ हा असा आहे, की जिथे लोकांना चांगले ऐकण्याची, बघण्याची सवय नाही. राज्याने मागील १० वर्षात सर्व क्षेत्रात विकास साधला. मात्र, काहींना तो पाहायचा नसून ते केवळ टीकाच करतात. खरेतर त्यांनी मागील ५० वर्षे आणि आताच्या १० वर्षातील विकासाची तुलना करणे अपेक्षित आहे. राज्याचा विकास, सर्व कामे मीच केली, असे म्हणत नाही. यात सर्वांचे योगदान आहे. मुख्यमंत्री या नात्याने चांगले व वाईट अशा दोन्ही गोष्टी ऐकण्याची माझी तयारी आहे,' असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

 

 

टॅग्स :goaगोवा