शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

वीज खंडित झाल्यास सरकारला आता ग्राहकांना द्यावी लागेल भरपाई

By किशोर कुबल | Updated: June 25, 2024 15:11 IST

नुकसान भरपाईची रक्कम ४० रुपये ते १००० रुपये प्रति दिवस किंवा विलंबाच्या तासापर्यंत असेल. 

किशोर कुबल/ पणजी : संयुक्त विद्युत नियामक आयोगाच्या (जेईआरसी) नियमांनुसार आता वीज खंडित झाल्यास किंवा  वीज वितरणातील विशिष्ट कामगिरी मानकांची पूर्तता न केल्यास वीजबिले समायोजित करून ९० दिवसांच्या आत ग्राहकांना भरपाई द्यावी लागेल. नुकसान भरपाईची रक्कम ४० रुपये ते १००० रुपये प्रति दिवस किंवा विलंबाच्या तासापर्यंत असेल. 

वीज पुरवठ्यातील बिघाड, बिलिंगमध्ये विलंब, बिलिंग तक्रारींचे निराकरण, मीटरच्या समस्या सोडवणे, बिघाड झाल्यानंतर वीज पुनर्संचयित करणे, विजेच्या दाबाचा चढउतार व्यवस्थापित करणे आणि वितरण नेटवर्क समस्यांचे निराकरण करणे यासाठी ग्राहक भरपाईचा दावा करू शकतात. 

आयोगाने १२ जून रोजी गोवा राज्य आणि केंद्रशासित प्रदेश (वितरण परवानाधारकांसाठी कार्यप्रदर्शन मानक) (प्रथम दुरुस्ती) विनियम अधिसूचित केले आहे.  

 सरकारने नुकसान भरपाई न दिल्यास ग्राहकांना ग्राहक तक्रार निवारण मंच कडे जाण्याचा पर्याय आहे. गोवा सरकारला सहा महिन्यांच्या आत ग्राहकांना तक्रार नोंदवण्यासाठी आणि नुकसान भरपाई मागण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म स्थापन करावा लागेल. सरकारला ग्राहक संबंध व्यवस्थापन प्रणाली देखील लागू करावी लागेल. 

नवीन वीज जोडणीकरिता मेट्रो शहरांसाठी तीन दिवस, शहरी भागांसाठी सात दिवस, ग्रामीण भागासाठी १५ दिवस आणि नवीन सुधारणांनुसार अर्ज प्राप्त झाल्यानंतर ग्रामीण बेटांसाठी ३० दिवसांची मुदत आयोगाने अधिसूचनेत निश्चित केली  आहे. वीज पुरवठ्यातील बिघाडांसाठी पुनर्संचयित करण्याची वेळ चार तासांपासून अठ्ठेचाळीस तासांपर्यंत आहे. 

टॅग्स :goaगोवा