शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

सरकार गप्प बसणार नाही ; आसगाव प्रकरणात सर्व गुडांना तुरुंगात टाकणार - मुख्यमंत्री

By किशोर कुबल | Updated: June 27, 2024 14:33 IST

"आगरवाडेकर कुटूंबाला घर नको असेल तर ती त्यांची मर्जी."

किशोर कुबल/पणजी

पणजी : आसगांव येथे घर पाडल्याच्या प्रकरणात सरकार गप्प बसणार नाही. सर्व गुंडांना टाकले जाईल. पोलिस पथके मुंबई व बेळगांवला रवाना झालेली आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

ते म्हणाले कि,‘या प्रकरणात आगरवाडेकर कुटूंबाला कोणाशीही तडजोड करायची असेल किंवा सरकारकडून त्यांना घर नको असेल तर ती त्यांची मर्जी, परंतु सरकार या प्रकरणात गप्प बसणार नाही. घर पाडणाय्रा सर्व गुंडांना आत टाकीन. जे कोणी दोषी आहेत त्या सर्व जणांवर कठोर कारवाई केली जाईल.’

आगरवाडेकर कुटूंबाने तक्रार मागे घेण्याची तयारी चालवली असल्याने त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्र्यांनी वरील भाष्य केले.दरम्यान, स्थानिक आमदार डिलायला लोबो यांनीही या कुटुंबाने अचानक घुमजाव केल्याबद्दल संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, 'आम्ही सर्वजण मदतीला गेलो परंतु या कुटुंबांने सर्वांनाच गृहीत धरले. आज सर्व गोवा त्या कुटुंबावर नाराज आहे. मुख्यमंत्र्यांनी क्राइम ब्रांचमार्फत चौकशी चालूच ठेवावी व हे प्रकरण धसास लावावे. या कुटुंबाने मला भेटण्यासाठी इच्छा प्रदर्शित केली होती परंतु मला आता त्यांना भेटायचे नाही.'

गोव फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी या प्रकरणानंतर सरकारला उपरोधिक सल्ला दिला आहे. ते म्हणाले की,' ज्या गुंडांनी घर पाडले त्यांना राज्य पुरस्कार देऊन गौरवावे तर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले त्यांना राष्ट्रपती पदके देऊन त्यांचा सन्मान करावा. सरदेसाई पुढे म्हणाले की आमदार डिलायला लोबो यांनी एका रात्रीत पक्ष बदललाला तसेच या कुटुंबाने केले. त्यामुळे डिलायला यांना धक्का बसण्याचे कारण नाही. ते म्हणाले की कुटुंबातील महिलेची 'लाय डिटेक्टर' चाचणी घेतल्यास सर्व काही बाहेर येईल.'

टॅग्स :goaगोवा