शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

बाबूश वि. पर्रीकर वादापासून मुख्यमंत्री दोन हात दूरच

By किशोर कुबल | Updated: January 11, 2024 14:15 IST

प्रतिक्रियेस नकार : स्मार्ट सिटीचे काम ३० मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

पणजी : बाबूश विरूद्ध पर्रीकर वादापासून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोन हात दूरच राहणे पसंत केले आहे. या वादावर प्रतिक्रिया देण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. राजधानी शहरातील स्मार्ट सिटीची सर्व कामे येत्या ३० मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मी दिलेले आहेत, एवढेच ते म्हणाले.

स्थानिक आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना पणजीचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्यावर हल्लाबोल केला होता. पर्रीकर यांनी २५ वर्षे राजधानी शहराची वाट लावली, असा आरोप करताना त्यांनी आणलेल्या सल्लागारांनी स्मार्ट सिटीच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खाल्ले, असा आरोपही बाबूश यांनी केला होता. पंचवीस वर्षात सल्लागारावर जेवढा खर्च केला तेवढ्या पैशात दोन पूल बांधता आले असते. पर्रीकरांनी साधे पदपथ बांधण्यासाठी ही सल्लागार नेमले, अशी टीकाही त्यांनी केली होती. शिवाय उत्पल यांनी वारशाने काही मिळेल म्हणून वाट पाहू नये. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत माझ्याविरुद्ध लढावे, असे आव्हानही  दिले होते.बाबूशनी प्रथमच एवढ्या कठोर शब्दात दिवंगत पर्रीकर यांच्यावर हल्लाबोल केल्याने भाजपातही खळबळ माजली आहे.मुख्यमंत्र्यांची यावर प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांनी केला परंतु मुख्यमंत्र्यांनी यावर भाषण टाळले.

 भाजप प्रवक्त्याकडून समाचारदरम्यान, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी बाबूशनी केलेल्या टिकेचा ट्विटरवर समाचार करताना घेताना 'जे टीका करत आहेत, त्यांनी पर्रीकर यांचे थोडे तरी गुण आत्मसात करावेत. पर्रीकरांनी नेहमीच लोकांप्रती त्याग भावना दाखवली. लोकांना गरज पडेल तेव्हा ते त्यांच्या मदतीला धावत असत. आधुनिक गोव्याचे खरे शिल्पकार होते', असे म्हटले आहे.

ते पुढे म्हणतात की,'दोन दशकात आमदार म्हणून पर्रीकर यांनी पणजीचा कायापालट केला. शहरातील रस्ते रुंद केले. आयनॉक्ससारखे सिनेमागृह उभे केले. शहरात भूमिगत वीज वाहिन्या टाकल्या. पणजी शहर सुरक्षित बनविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पूर्वी राजधानी शहरात गॅंगवर होत होती, ती बंद केली. पर्रीकर यांचे काम काही ओळीत स्पष्ट करू शकत नाही. त्यांना  प्रशासनाची उत्तम जाण होती टीका करणाऱ्यांनी हे समजून घ्यावे.'

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंत