शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भोमा येथील आंदोलन चिघळले; सीमांकनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रोखले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 17:39 IST

सविस्तर वृत्तानुसार, बुधवारी सकाळी प्रशासन अधिकारी भोम येथे सीमांकन करण्यासाठी पोहोचले. अधिकारी आल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले.

- अजय बुवा

फोंडा : भोम येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गप्रकरणी चालू असलेले आंदोलन बुधवारी चांगलेच चिघळले. जमिनीचे सीमांकन करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांना रोखल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी १०० ग्रामस्थांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी थेट कुळे पोलिस ठाण्यात केली. तीन तास ग्रामस्थानी पोलिसांशी हुज्जत घातली.

सविस्तर वृत्तानुसार, बुधवारी सकाळी प्रशासन अधिकारी भोम येथे सीमांकन करण्यासाठी पोहोचले. अधिकारी आल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले. प्रकल्पाला विरोध करणारे संजय नाईक हेही घटनास्थळी दाखल झाले. हे प्रकरण उच्च न्यायालयात असताना सीमांकन कसे काय करता? असा सवाल करत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना वाचारत धारेवर धरले.  यावेळी मोठ्या संख्येने पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता. 

पोलीस उपअधीक्षक आशिष शिरोडकर, पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर, संयुक्त मामलेदार संगीता बिर्जे आदी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांचा आक्षेप असतानाही मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या अंगावर ग्रामस्थ धावून जात असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना अडवले. पोलिस बंदोबस्तात काम सुरू आहे ते पाहून ग्रामस्थ आणखीनच खवळले व त्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालण्यास सुरुवात केली. आंदोलनात महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

ग्रामस्थांची धरपकडआंदोलक आक्रमक बनल्याने परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी ग्रामस्थांची धरपकड सुरू केली. काही युवकांना पोलिसांनी पकडून ठेवले. अटक करणार तर सगळ्यांनाच अटक करा, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. परंतु त्या अगोदर सीमांकन बंद ठेवा, असा आग्रह धरला. परंतु पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना उचलून चार बसमध्ये कोंबून कुळे येथील पोलीस ठाण्यात आणले.

सरपंचांनाही उचललेग्रामस्थांना ताब्यात घेण्याचे सत्र चालू झाल्याचे लक्षात येताच सरपंच दामोदर नाईक हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेऊन कुळे येथे त्यांची रवानगी केली.

हे सर्व मंत्र्यांनीच घडवून आले : ग्रामस्थज्यावेळी पोलिसांनी अटक सत्र सुरू केले त्यावेळी काही महिला प्रसार माध्यमांकडे बोलताना म्हणाल्या की, काहीच चूक नसताना जबरदस्तीने आमच्या मुलांना पोलिसांनी बसमध्ये टाकले आहे. हा प्रकल्प आम्हाला नको आहे. परंतु आमदार गोविंद गावडे यांच्यामुळे हा प्रकल्प येत आहे. आज जे प्रकरण घडले त्याला मंत्रीच जबाबदार आहेत. सरकारी कामांमध्ये हस्तक्षेप केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व ग्रामस्थांची दुपारी मुक्तता करण्यात आली.

टॅग्स :goaगोवा