शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

दहा हजार वेळा वीज गायब; जणू अघोषित भारनियमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 11:00 IST

म्हापशात १६ महिन्यांत वीजखात्याचा प्रताप 

लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : म्हापशातील वीजसमस्या ही आता नित्याची बाब बनली आहे. दिवसातून किती वेळा वीजपुरवठा खंडित होतो, याचा थांगपत्ता लागत नसतो. खंडित झालेली वीज पुन्हा कधी सुरू होईल, याची शाश्वती नसते. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त बनले आहेत. उपलब्ध माहितीनुसार दर दिवशी किमान ५ ते ७ वेळा आणि मागील १६ महिन्यांत किमान १० हजार वेळा तरी वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला आहे.

नुकसान होतेय; पण दखल घेतोय कोण?

खंडित होणाऱ्या पुरवठ्यामुळे विजेची अनेक उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातून नागरिकांना बरेच नुकसान सहन करावे लागत आहे. गरजेच्या वेळी पुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त असल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली. काही वेळा तर अघोषित भारनियमन असते. खंडित पुरवठ्याची झळ फक्त सामान्य नागरिकांना झाली नसून बऱ्याच व्यावसायिकांनाही त्याचा त्रास नुकसानीच्या रूपात सहन करावा लागत आहे. मुलांच्या अभ्यासावरही परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. ज्येष्ठांच्या आरोग्यावरही परिणाम झाले आहेत. व्यावसायिकांनाही खंडित वीजपुरवठ्याचा जबर फटका बसत आहे.

वीजपुरवठ्यातही अनियमितता

ऊन, वारा, पाऊस असो किंवा नसो; वीजपुरवठा मात्र कारण नसतानाही खंडित होत असतो, असा आरोप म्हापसावासीयांकडून केला जात आहे. काहीवेळा पुरवठ्यात अनियमितताही असते. खंडित पुरवठ्याबरोबर विजेचा उच्च दाबाने, तर काहीवेळा कमी दाबाने पुरवठा सुरू असतो. पुरवठ्यातील अनियमिततेमुळे विद्युत उपकरणांवर परिणाम होतो. बऱ्याच नागरिकांचे फ्रिज, टीव्ही, वायफाय राउटर, लॅपटॉप, वातानुकूलित यंत्रणा तसेच इतर इलेक्ट्रॉनिक यंत्रणा खराब होण्याचे प्रकार घडले आहेत.

आरोग्यावरही होतोय परिणाम

खंडित होणाऱ्या पुरवठ्याचे अनेकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याचे प्रकार घडले आहेत. म्हापसावासीयांनी दिलेल्या माहितीनुसार खंडित पुरवठ्यातून वाढत्या उष्म्यामुळे अस्वस्थता वाढण्याच्या घटना घडल्या आहेत. खंडित पुरवठ्यामुळे आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घ्यावी, असाही प्रश्न ज्येष्ठ नागरिकांकडून उपस्थित केला आहे.

तक्रारदारालाच उद्धटपणाची वागणूक

वीज पुरवठ्यावर तक्रार केल्यास जात नाही. उपकेंद्रावरील कर्मचायांकडून योग्य प्रकारे सहकार्य केले कर्मचाऱ्यांकडून उद्धटपणाची वागणूक, दिली जाते. तक्रारींसाठी फोनसुद्धा लागत नाही. पावसाळ्यात पुरवठा खंडित होण्याचे प्रकार बरेच वाढले होते, अशीही माहिती नागरिकांनी दिली

भूमिगत वाहिनी खोदकामांचाही फटका

सध्या भूमिगत वीजवाहिनीचे काम सुरु आहे. गेल्या वर्षी सुरु केलेले काम सुमारे ८० टक्के पूर्ण झाल्याचा दावा विभागीय कार्यालयाकडून केला जातो. मात्र, प्रत्यक्षात हे काम केव्हा पूर्ण होईल, याची शाश्वती मात्र नाही. खोदकामामुळे रस्त्यांची दुरुस्ती वेळेवर केली नसल्याने तोही त्रास सहन करण्याची वेळ लोकांवर आली आहे.

पाऊस असो किंवा नसो, दिवसाबरोबर रात्रीच्या वेळीसुद्धा त्रास सहन करावा लागतो. पुरवठा खंडित होण्यामागची कारणे अस्पष्ट असून हेल्पलाइन नंबरसुद्धा कार्यान्वित नसतो. याचा फटका सर्वसामान्यांसह व्यावसायिकांनाही बसत आहे. - अॅड. शशांक नार्वेकर, नगरसेवक, म्हापसा

म्हापशातील वीजपुरवठा कधी खंडित व पूर्ववत होईल याची शाश्वती नसते. बयाच वेळी पूर्वकल्पना न देता पुरवठा बंद केला जातो. तक्रार केल्यास दखल घेतली जात नाही. म्हापसा शहर दुर्लक्षितांचे बनू लागले आहे. -श्रीपाद येंडे, म्हापसा

म्हापसा शहरात सध्या भूमिगत वीजवाहिनीचे काम सुरु आहे. त्यामुळे काही भागांत उच्चदाबाची भूमिगत वाहिनी घालण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा पुरवठा खंडित करावा लागतो. नागरिकांनी आणखी महिनाभर सहकार्य करावे. सुभाष पार्सेकर, कार्यकारी अभियंता.

 

टॅग्स :goaगोवाelectricityवीज