शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार वेळा वीज गायब; जणू अघोषित भारनियमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 11:00 IST

म्हापशात १६ महिन्यांत वीजखात्याचा प्रताप 

लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : म्हापशातील वीजसमस्या ही आता नित्याची बाब बनली आहे. दिवसातून किती वेळा वीजपुरवठा खंडित होतो, याचा थांगपत्ता लागत नसतो. खंडित झालेली वीज पुन्हा कधी सुरू होईल, याची शाश्वती नसते. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त बनले आहेत. उपलब्ध माहितीनुसार दर दिवशी किमान ५ ते ७ वेळा आणि मागील १६ महिन्यांत किमान १० हजार वेळा तरी वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला आहे.

नुकसान होतेय; पण दखल घेतोय कोण?

खंडित होणाऱ्या पुरवठ्यामुळे विजेची अनेक उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातून नागरिकांना बरेच नुकसान सहन करावे लागत आहे. गरजेच्या वेळी पुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त असल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली. काही वेळा तर अघोषित भारनियमन असते. खंडित पुरवठ्याची झळ फक्त सामान्य नागरिकांना झाली नसून बऱ्याच व्यावसायिकांनाही त्याचा त्रास नुकसानीच्या रूपात सहन करावा लागत आहे. मुलांच्या अभ्यासावरही परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. ज्येष्ठांच्या आरोग्यावरही परिणाम झाले आहेत. व्यावसायिकांनाही खंडित वीजपुरवठ्याचा जबर फटका बसत आहे.

वीजपुरवठ्यातही अनियमितता

ऊन, वारा, पाऊस असो किंवा नसो; वीजपुरवठा मात्र कारण नसतानाही खंडित होत असतो, असा आरोप म्हापसावासीयांकडून केला जात आहे. काहीवेळा पुरवठ्यात अनियमितताही असते. खंडित पुरवठ्याबरोबर विजेचा उच्च दाबाने, तर काहीवेळा कमी दाबाने पुरवठा सुरू असतो. पुरवठ्यातील अनियमिततेमुळे विद्युत उपकरणांवर परिणाम होतो. बऱ्याच नागरिकांचे फ्रिज, टीव्ही, वायफाय राउटर, लॅपटॉप, वातानुकूलित यंत्रणा तसेच इतर इलेक्ट्रॉनिक यंत्रणा खराब होण्याचे प्रकार घडले आहेत.

आरोग्यावरही होतोय परिणाम

खंडित होणाऱ्या पुरवठ्याचे अनेकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याचे प्रकार घडले आहेत. म्हापसावासीयांनी दिलेल्या माहितीनुसार खंडित पुरवठ्यातून वाढत्या उष्म्यामुळे अस्वस्थता वाढण्याच्या घटना घडल्या आहेत. खंडित पुरवठ्यामुळे आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घ्यावी, असाही प्रश्न ज्येष्ठ नागरिकांकडून उपस्थित केला आहे.

तक्रारदारालाच उद्धटपणाची वागणूक

वीज पुरवठ्यावर तक्रार केल्यास जात नाही. उपकेंद्रावरील कर्मचायांकडून योग्य प्रकारे सहकार्य केले कर्मचाऱ्यांकडून उद्धटपणाची वागणूक, दिली जाते. तक्रारींसाठी फोनसुद्धा लागत नाही. पावसाळ्यात पुरवठा खंडित होण्याचे प्रकार बरेच वाढले होते, अशीही माहिती नागरिकांनी दिली

भूमिगत वाहिनी खोदकामांचाही फटका

सध्या भूमिगत वीजवाहिनीचे काम सुरु आहे. गेल्या वर्षी सुरु केलेले काम सुमारे ८० टक्के पूर्ण झाल्याचा दावा विभागीय कार्यालयाकडून केला जातो. मात्र, प्रत्यक्षात हे काम केव्हा पूर्ण होईल, याची शाश्वती मात्र नाही. खोदकामामुळे रस्त्यांची दुरुस्ती वेळेवर केली नसल्याने तोही त्रास सहन करण्याची वेळ लोकांवर आली आहे.

पाऊस असो किंवा नसो, दिवसाबरोबर रात्रीच्या वेळीसुद्धा त्रास सहन करावा लागतो. पुरवठा खंडित होण्यामागची कारणे अस्पष्ट असून हेल्पलाइन नंबरसुद्धा कार्यान्वित नसतो. याचा फटका सर्वसामान्यांसह व्यावसायिकांनाही बसत आहे. - अॅड. शशांक नार्वेकर, नगरसेवक, म्हापसा

म्हापशातील वीजपुरवठा कधी खंडित व पूर्ववत होईल याची शाश्वती नसते. बयाच वेळी पूर्वकल्पना न देता पुरवठा बंद केला जातो. तक्रार केल्यास दखल घेतली जात नाही. म्हापसा शहर दुर्लक्षितांचे बनू लागले आहे. -श्रीपाद येंडे, म्हापसा

म्हापसा शहरात सध्या भूमिगत वीजवाहिनीचे काम सुरु आहे. त्यामुळे काही भागांत उच्चदाबाची भूमिगत वाहिनी घालण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा पुरवठा खंडित करावा लागतो. नागरिकांनी आणखी महिनाभर सहकार्य करावे. सुभाष पार्सेकर, कार्यकारी अभियंता.

 

टॅग्स :goaगोवाelectricityवीज