शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

देव, धर्म, देशाचे महत्त्व मुलांना सांगा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2025 09:27 IST

कल्याण आश्रमाचा स्थापना दिवस उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'विकसित भारत २०४७' ची दूरदर्शी योजना तयार करीत आहे. ही योजना पुढील पिढी समोर नेताना भावी पिढीला अधिक सक्षम करण्यासाठी त्यांना देव, धर्म व देश यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे केले.

कल्याण आश्रम गोवातर्फे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमच्या ७४ व्या स्थापना दिन कार्यक्रम पाटो- पणजी येथील संस्कृती भवनच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळे ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की कल्याण आश्रमाच्या कार्याला ७० हून अधिक वर्ष पूर्ण झाली. मात्र, अजूनही ते त्याच चिकाटीने काम करीत आहेत. याचे खरेच कौतुक आहे. प्रत्येकाने अशा कार्याला हातभार लावावा. विकसित भारताच्या माध्यमातून भावी पिढीला सक्षम करावे.

कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले, की दुसऱ्यांमध्ये चांगले आचार व विचार प्रदान करणे हे फार महत्वाचे असते. नकारात्मक विचार तसेच नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर राहावे. चांगल्या विचारांचे व्यासपीठ निर्माण करण्याचे काम अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम करीत आहेत. महत्वाचे म्हणे त्यांची नेपाळ येथेही शाखा आहे. राष्ट्र घडणीत तसेच देशाला महासत्ता बनवण्याच्या प्रक्रियेत अशा संस्थांचे योगदान महत्वाचे ठरते. या संस्था समाज सेवा करण्याचे महत्वाचे काम करतात. वनवासी कल्याण आश्रमचे सहसंघटनमंत्री भगवान सहाय म्हणाले, की कल्याण आश्रम एक सामाजिक संस्था आहे व समाज कार्य करते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोवा विभागाचे संघचालक राजेंद्र भोबे, कल्याण आश्रम गोवाचे अध्यक्ष डॉ. वेंकू गावडे उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत