शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धो धो पावसात नळ मात्र कोरडे! म्हापसा, साळगाव, शिवोली, कळंगुटवर संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 10:01 IST

धो धो पाऊस असतानाही नळाला पाणी न आल्याने लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी म्हापशात दरबार भरवून काही तासही उलटले नसताना, उत्तर गोव्याच्या म्हापसा या प्रमुख शहरासह शिवोली, कळंगुट, साळगांवमध्ये नळ कोरडे पडले आहेत. धो धो पाऊस असतानाही नळाला पाणी न आल्याने लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात तिळारीचे येणारे गढूळ पाणी फिल्टरिंग करण्यात अडथळे येत आहेत, तसेच वारंवार वीज खंडित होत असल्याने बंद पडणारे पंप यामुळे पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. नळ कोरडे पडल्याने, मोठ्या प्रमाणात याची झळ लोकांना बसली. काही ठिकाणी लोकांना आंघोळीलाही पाणी मिळाले नाही, तर काही भागात अत्यंत गढूळ पाणी आले, ते हातात घ्यायच्या लायकीचे नसल्याचे समोर आले आहे.सोमवारीच बांधकाममंत्री नीलेश काचाल यांनी खात्याच्या वरिष्ठ अधिकांऱ्यासमोर म्हापशात जनता दरबार घेतला. त्यावेळी लोकांनी वरचेवर तोंड द्यावे लागत असलेल्या पाणीटंचाईचा विषय उपस्थित केला होता. मंत्र्यांनी आश्वासनही दिले होते, परंतु या गोष्टीला २४ तासही उलटले नसताना नळ कोरडे पडले.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता (पाणी विभाग) संतोष म्हापणे यांनी 'लोकमत'शी बोलताना असे सांगितले की, तिळारीच्या पाणी गढूळ झाले आहे. ते फिल्टर करण्यासाठी अडचणी येतात, शिवाय वरचेवर वीज खंडित होत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पावसाने उसंत घेतल्यानंतर ते ठीक होईल, तसेच भूमिगत वीज वाहिनीचे काम चालू आहे, ते पूर्ण झाल्यानंतर विजेची समस्या दूर होईल. अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात रोज १२० एमएलडी पाणी फिल्टर केले जाते. गढूळ पाणी येत असल्याने हे प्रमाण बरेच घटले आहे. त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

अस्नोडातील प्रकल्पात बिघाड

अस्नोडा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात कच्चे पाणी खेचणारी मुख्य जलवाहिनी नादुरुस्त झाली. त्यामुळे तालुक्यातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. पावसामुळे वाहिनीच्या दुरुस्ती कामात अडथळे निर्माण झाले आहेत, तसेच वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या पुरवठ्यामुळे पाणीपुरवठ्यावरही परिणाम होत आहे. लोकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने दुरुस्ती काम हाती घेण्यात आले असून, पुरवठा लवकरात लवकर सुरु करण्याचे प्रयत्न केला जात आहेत.

काँग्रेसचा आज घागर मोर्चा

बार्देश तालुक्याला होणारा पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे आज बुधवारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागावर घागर मोर्चा नेण्याचा इशारा काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी दिला आहे. राज्यात मुसळधार पाऊस पडत असताना लोकांना पाणी मिळत नाही, हे सरकारचे अपयश आहे. सरकारकडून घेण्यात येणारा जनता दरबार ही लोकांची दिशाभूल करण्यासाठी होता. असाही आरोप भिके यांनी केला.

आज पुरवठा होणार सुरळीत

अस्नोड्यातील प्रकल्पातील पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागातील एका अभियंत्याकडून मान्य करण्यात आले. तसेच पाण्यात गढूळपणा निर्माण झाल्याने शुद्धीकरणाची समस्या निर्माण झाल्याची माहिती देण्यात आली. बुधवारपर्यंत पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही सांगण्यात आले.

म्हापसा पालिका क्षेत्राबरोबर शिवोली मतदारसंघ साळगावच्या काही भागांतील पुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ज्या भागात पुरवठा सुरू आहे. त्या भागात काही प्रमाणात गडूळ पुरवठा होत असल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली. जे पाणी पुरवले जाते, ते पिण्यास योग्य नसल्याचेही सांगण्यात आले. अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला अखंडितपणे पुरवठा व्हावा, यासाठी तेथे भूमिगत वीजवाहिनी घालून पुरवठा सुरु करण्यात आला होता, पण भूमिगत वाहिनीतील पुरवण्यात बिघाड झाला. आरएमव्ही युनिट दोन दिवसांपूर्वी खराब झाल्याने होणारा ओव्हरहेड वाहिनीवरून पुरवठा केला होता, अशी माहिती डिचोलीतील सहायक अभियंता सावंत यांनी दिली. म्हापशातील काही भागांतल्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती नगरसेवक शशांक नार्वेकर यांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून धुळेर शेट्येवाडा, डांगी कॉलनीतील काही भागांना पुरवठा आलाच नसल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाmonsoonमोसमी पाऊस