शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

धो धो पावसात नळ मात्र कोरडे! म्हापसा, साळगाव, शिवोली, कळंगुटवर संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 10:01 IST

धो धो पाऊस असतानाही नळाला पाणी न आल्याने लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी म्हापशात दरबार भरवून काही तासही उलटले नसताना, उत्तर गोव्याच्या म्हापसा या प्रमुख शहरासह शिवोली, कळंगुट, साळगांवमध्ये नळ कोरडे पडले आहेत. धो धो पाऊस असतानाही नळाला पाणी न आल्याने लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात तिळारीचे येणारे गढूळ पाणी फिल्टरिंग करण्यात अडथळे येत आहेत, तसेच वारंवार वीज खंडित होत असल्याने बंद पडणारे पंप यामुळे पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. नळ कोरडे पडल्याने, मोठ्या प्रमाणात याची झळ लोकांना बसली. काही ठिकाणी लोकांना आंघोळीलाही पाणी मिळाले नाही, तर काही भागात अत्यंत गढूळ पाणी आले, ते हातात घ्यायच्या लायकीचे नसल्याचे समोर आले आहे.सोमवारीच बांधकाममंत्री नीलेश काचाल यांनी खात्याच्या वरिष्ठ अधिकांऱ्यासमोर म्हापशात जनता दरबार घेतला. त्यावेळी लोकांनी वरचेवर तोंड द्यावे लागत असलेल्या पाणीटंचाईचा विषय उपस्थित केला होता. मंत्र्यांनी आश्वासनही दिले होते, परंतु या गोष्टीला २४ तासही उलटले नसताना नळ कोरडे पडले.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता (पाणी विभाग) संतोष म्हापणे यांनी 'लोकमत'शी बोलताना असे सांगितले की, तिळारीच्या पाणी गढूळ झाले आहे. ते फिल्टर करण्यासाठी अडचणी येतात, शिवाय वरचेवर वीज खंडित होत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पावसाने उसंत घेतल्यानंतर ते ठीक होईल, तसेच भूमिगत वीज वाहिनीचे काम चालू आहे, ते पूर्ण झाल्यानंतर विजेची समस्या दूर होईल. अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात रोज १२० एमएलडी पाणी फिल्टर केले जाते. गढूळ पाणी येत असल्याने हे प्रमाण बरेच घटले आहे. त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

अस्नोडातील प्रकल्पात बिघाड

अस्नोडा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात कच्चे पाणी खेचणारी मुख्य जलवाहिनी नादुरुस्त झाली. त्यामुळे तालुक्यातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. पावसामुळे वाहिनीच्या दुरुस्ती कामात अडथळे निर्माण झाले आहेत, तसेच वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या पुरवठ्यामुळे पाणीपुरवठ्यावरही परिणाम होत आहे. लोकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने दुरुस्ती काम हाती घेण्यात आले असून, पुरवठा लवकरात लवकर सुरु करण्याचे प्रयत्न केला जात आहेत.

काँग्रेसचा आज घागर मोर्चा

बार्देश तालुक्याला होणारा पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे आज बुधवारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागावर घागर मोर्चा नेण्याचा इशारा काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी दिला आहे. राज्यात मुसळधार पाऊस पडत असताना लोकांना पाणी मिळत नाही, हे सरकारचे अपयश आहे. सरकारकडून घेण्यात येणारा जनता दरबार ही लोकांची दिशाभूल करण्यासाठी होता. असाही आरोप भिके यांनी केला.

आज पुरवठा होणार सुरळीत

अस्नोड्यातील प्रकल्पातील पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागातील एका अभियंत्याकडून मान्य करण्यात आले. तसेच पाण्यात गढूळपणा निर्माण झाल्याने शुद्धीकरणाची समस्या निर्माण झाल्याची माहिती देण्यात आली. बुधवारपर्यंत पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही सांगण्यात आले.

म्हापसा पालिका क्षेत्राबरोबर शिवोली मतदारसंघ साळगावच्या काही भागांतील पुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ज्या भागात पुरवठा सुरू आहे. त्या भागात काही प्रमाणात गडूळ पुरवठा होत असल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली. जे पाणी पुरवले जाते, ते पिण्यास योग्य नसल्याचेही सांगण्यात आले. अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला अखंडितपणे पुरवठा व्हावा, यासाठी तेथे भूमिगत वीजवाहिनी घालून पुरवठा सुरु करण्यात आला होता, पण भूमिगत वाहिनीतील पुरवण्यात बिघाड झाला. आरएमव्ही युनिट दोन दिवसांपूर्वी खराब झाल्याने होणारा ओव्हरहेड वाहिनीवरून पुरवठा केला होता, अशी माहिती डिचोलीतील सहायक अभियंता सावंत यांनी दिली. म्हापशातील काही भागांतल्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती नगरसेवक शशांक नार्वेकर यांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून धुळेर शेट्येवाडा, डांगी कॉलनीतील काही भागांना पुरवठा आलाच नसल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाmonsoonमोसमी पाऊस