शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
6
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
7
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
8
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
9
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
10
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
11
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
12
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
13
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
14
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
15
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
16
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
17
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
18
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
19
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
20
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

धो धो पावसात नळ मात्र कोरडे! म्हापसा, साळगाव, शिवोली, कळंगुटवर संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 10:01 IST

धो धो पाऊस असतानाही नळाला पाणी न आल्याने लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी म्हापशात दरबार भरवून काही तासही उलटले नसताना, उत्तर गोव्याच्या म्हापसा या प्रमुख शहरासह शिवोली, कळंगुट, साळगांवमध्ये नळ कोरडे पडले आहेत. धो धो पाऊस असतानाही नळाला पाणी न आल्याने लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात तिळारीचे येणारे गढूळ पाणी फिल्टरिंग करण्यात अडथळे येत आहेत, तसेच वारंवार वीज खंडित होत असल्याने बंद पडणारे पंप यामुळे पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. नळ कोरडे पडल्याने, मोठ्या प्रमाणात याची झळ लोकांना बसली. काही ठिकाणी लोकांना आंघोळीलाही पाणी मिळाले नाही, तर काही भागात अत्यंत गढूळ पाणी आले, ते हातात घ्यायच्या लायकीचे नसल्याचे समोर आले आहे.सोमवारीच बांधकाममंत्री नीलेश काचाल यांनी खात्याच्या वरिष्ठ अधिकांऱ्यासमोर म्हापशात जनता दरबार घेतला. त्यावेळी लोकांनी वरचेवर तोंड द्यावे लागत असलेल्या पाणीटंचाईचा विषय उपस्थित केला होता. मंत्र्यांनी आश्वासनही दिले होते, परंतु या गोष्टीला २४ तासही उलटले नसताना नळ कोरडे पडले.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता (पाणी विभाग) संतोष म्हापणे यांनी 'लोकमत'शी बोलताना असे सांगितले की, तिळारीच्या पाणी गढूळ झाले आहे. ते फिल्टर करण्यासाठी अडचणी येतात, शिवाय वरचेवर वीज खंडित होत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पावसाने उसंत घेतल्यानंतर ते ठीक होईल, तसेच भूमिगत वीज वाहिनीचे काम चालू आहे, ते पूर्ण झाल्यानंतर विजेची समस्या दूर होईल. अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात रोज १२० एमएलडी पाणी फिल्टर केले जाते. गढूळ पाणी येत असल्याने हे प्रमाण बरेच घटले आहे. त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

अस्नोडातील प्रकल्पात बिघाड

अस्नोडा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात कच्चे पाणी खेचणारी मुख्य जलवाहिनी नादुरुस्त झाली. त्यामुळे तालुक्यातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. पावसामुळे वाहिनीच्या दुरुस्ती कामात अडथळे निर्माण झाले आहेत, तसेच वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या पुरवठ्यामुळे पाणीपुरवठ्यावरही परिणाम होत आहे. लोकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने दुरुस्ती काम हाती घेण्यात आले असून, पुरवठा लवकरात लवकर सुरु करण्याचे प्रयत्न केला जात आहेत.

काँग्रेसचा आज घागर मोर्चा

बार्देश तालुक्याला होणारा पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे आज बुधवारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागावर घागर मोर्चा नेण्याचा इशारा काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी दिला आहे. राज्यात मुसळधार पाऊस पडत असताना लोकांना पाणी मिळत नाही, हे सरकारचे अपयश आहे. सरकारकडून घेण्यात येणारा जनता दरबार ही लोकांची दिशाभूल करण्यासाठी होता. असाही आरोप भिके यांनी केला.

आज पुरवठा होणार सुरळीत

अस्नोड्यातील प्रकल्पातील पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागातील एका अभियंत्याकडून मान्य करण्यात आले. तसेच पाण्यात गढूळपणा निर्माण झाल्याने शुद्धीकरणाची समस्या निर्माण झाल्याची माहिती देण्यात आली. बुधवारपर्यंत पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही सांगण्यात आले.

म्हापसा पालिका क्षेत्राबरोबर शिवोली मतदारसंघ साळगावच्या काही भागांतील पुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ज्या भागात पुरवठा सुरू आहे. त्या भागात काही प्रमाणात गडूळ पुरवठा होत असल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली. जे पाणी पुरवले जाते, ते पिण्यास योग्य नसल्याचेही सांगण्यात आले. अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला अखंडितपणे पुरवठा व्हावा, यासाठी तेथे भूमिगत वीजवाहिनी घालून पुरवठा सुरु करण्यात आला होता, पण भूमिगत वाहिनीतील पुरवण्यात बिघाड झाला. आरएमव्ही युनिट दोन दिवसांपूर्वी खराब झाल्याने होणारा ओव्हरहेड वाहिनीवरून पुरवठा केला होता, अशी माहिती डिचोलीतील सहायक अभियंता सावंत यांनी दिली. म्हापशातील काही भागांतल्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती नगरसेवक शशांक नार्वेकर यांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून धुळेर शेट्येवाडा, डांगी कॉलनीतील काही भागांना पुरवठा आलाच नसल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाmonsoonमोसमी पाऊस