शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
4
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
5
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
6
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
7
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
8
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
9
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
10
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
11
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
12
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
13
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
14
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
15
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
16
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
17
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
18
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
19
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
20
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी

मानसबागवाड्यावरील तलाव गाळानेभरला

By admin | Updated: May 3, 2014 14:26 IST

मुळगाव पंचायत क्षेत्रातील मानसबागवाडा येथील पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या दोन तलावांपैकी फक्त एकच तलाव उपसण्यात आलेला असून दुसरा अद्याप पावतो उपसण्यात आलेला नसल्यामुळे शेतकर्‍यांनी चिंता व्यक्त केली आहे.

शेतकरी चिंतेत अस्नोडा : मुळगाव पंचायत क्षेत्रातील मानसबागवाडा येथील पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या दोन तलावांपैकी फक्त एकच तलाव उपसण्यात आलेला असून दुसरा अद्याप पावतो उपसण्यात आलेला नसल्यामुळे शेतकर्‍यांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान प्राप्त माहितीनुसार पि›मेकडे असलेला तलाव काही वर्षांपूर्वी गोव्यातील मिनरल फाऊंडेशनने उपसला होता. सर्व चिखल, झाडेझुडूपे तथा शेवाळ काढून टाकले होते. त्यामुळे त्या तलावाचे पाणी स्वच्छ झाले होते व त्याचवेळी लवकरच पूर्वेकडील तलाव उपसण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र अजूनपर्यंत त्या तलावाबाबत कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे शेतकर्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या तलावात चिखलाचे साम्राज्य असून त्यासोबत कमळांची फुले वाढलेली आहेत. तसेच शेवाळाने हा तलाव पूर्णपणे व्यापलेला आहे. याच पूर्वेकडील तलावाला लागून एक ओहोळ असून त्या ओहोळाद्वारेच शेतीला पाणीपुरवठा व्हायचा. हा ओहोळ पण चिखलाने व गवताने व्यापलेला होता. मात्र तत्कालीन खाण व्यवसायिक धेंपो कंपनीने सदर ओहोळ उपसला होता; परंतु तलाव चिखलाने व्यापलेला असल्यामुळे या ओहोळात पाण्याचा अभाव असतो.दहा बारा वर्षापूर्वी येथील शेती व्यवसाय आघाडीवर होता. मात्र या काही वर्षापासून सदर व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. गेल्या १२ वर्षांपासून सदर वायंगण शेती पडीकच आहे. मुळगावातील बहुतेक युवक धेंपो कंपनीत कामाला होते; पण सध्या सर्व खाणी बंद असल्यामुळे सर्वांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे पूर्वेकडील हा तलाव त्वरीत उपसण्यात यावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. (वार्ताहर)