शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

मानसबागवाड्यावरील तलाव गाळानेभरला

By admin | Updated: May 3, 2014 14:26 IST

मुळगाव पंचायत क्षेत्रातील मानसबागवाडा येथील पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या दोन तलावांपैकी फक्त एकच तलाव उपसण्यात आलेला असून दुसरा अद्याप पावतो उपसण्यात आलेला नसल्यामुळे शेतकर्‍यांनी चिंता व्यक्त केली आहे.

शेतकरी चिंतेत अस्नोडा : मुळगाव पंचायत क्षेत्रातील मानसबागवाडा येथील पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या दोन तलावांपैकी फक्त एकच तलाव उपसण्यात आलेला असून दुसरा अद्याप पावतो उपसण्यात आलेला नसल्यामुळे शेतकर्‍यांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान प्राप्त माहितीनुसार पि›मेकडे असलेला तलाव काही वर्षांपूर्वी गोव्यातील मिनरल फाऊंडेशनने उपसला होता. सर्व चिखल, झाडेझुडूपे तथा शेवाळ काढून टाकले होते. त्यामुळे त्या तलावाचे पाणी स्वच्छ झाले होते व त्याचवेळी लवकरच पूर्वेकडील तलाव उपसण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र अजूनपर्यंत त्या तलावाबाबत कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे शेतकर्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या तलावात चिखलाचे साम्राज्य असून त्यासोबत कमळांची फुले वाढलेली आहेत. तसेच शेवाळाने हा तलाव पूर्णपणे व्यापलेला आहे. याच पूर्वेकडील तलावाला लागून एक ओहोळ असून त्या ओहोळाद्वारेच शेतीला पाणीपुरवठा व्हायचा. हा ओहोळ पण चिखलाने व गवताने व्यापलेला होता. मात्र तत्कालीन खाण व्यवसायिक धेंपो कंपनीने सदर ओहोळ उपसला होता; परंतु तलाव चिखलाने व्यापलेला असल्यामुळे या ओहोळात पाण्याचा अभाव असतो.दहा बारा वर्षापूर्वी येथील शेती व्यवसाय आघाडीवर होता. मात्र या काही वर्षापासून सदर व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. गेल्या १२ वर्षांपासून सदर वायंगण शेती पडीकच आहे. मुळगावातील बहुतेक युवक धेंपो कंपनीत कामाला होते; पण सध्या सर्व खाणी बंद असल्यामुळे सर्वांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे पूर्वेकडील हा तलाव त्वरीत उपसण्यात यावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. (वार्ताहर)