शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

विकास प्रकल्पांबाबत नागरिकांना विश्वासात घ्या; माजी केंद्रीय सुरेश मंत्री प्रभू यांची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2024 07:31 IST

कायद्यात तशी तरतूद असून, हा नियम गोव्यालाही लागू होतो, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : एखाद्या ठिकाणी जेव्हा कधी नवा प्रकल्प येतो, तेव्हा तेथील नागरिकांना विश्वासात घ्यायलाच हवे. त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरूच करू नये. कायद्यात तशी तरतूद असून, हा नियम गोव्यालाही लागू होतो, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. 

प्रभू म्हणाले की, लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प पुढे नेऊच नये. कारण आपल्या भागात कोणता प्रकल्प येतो, त्याची स्थिती काय असेल, याची माहिती लोकांना असणे गरजेचे आहे. मी केंद्रात मंत्री असताना एखादा प्रकल्प आणायचा असल्यास त्याबाबत लोकांची मते जाणून घेणे हा आपला हट्ट असायचा. कायद्यात तशी तरतूदही आहे. 

प्रभू म्हणाले की, गोवा हा भौगोलिकदृष्ट्या लहान आहे. राज्यात जागा कमी आहेत. लोकसंख्यादेखील अन्य राज्यांच्या तुलनेत कमी असली, तरी त्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांची गरज आहे. त्यामुळे कोणताही प्रकल्प आणला जाईल, तेव्हा राज्याच्या वहन क्षमतेचा अभ्यास व्हावा. गावात जेव्हा प्रकल्प आणण्याचा निर्णय होतो, तेव्हा त्याबाबत लोकांना विश्वासात घ्यावे, त्यांच्या सहमतीने प्रकल्प व्हावेत. आयआयटी महत्त्वाचा प्रकल्प असून, त्याचा लाभ निश्चित गोव्याला होईल. ते लोकांपर्यंत पोहोचवावेत.

'अमेझिंग गोवा' ८ नोव्हेंबरपासून 

'अमेझिंग गोवा ही परिषद गोव्यात यंदा ८ ते १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. बांबोळी येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये व्हायब्रेट गोवा फाउंडेशनकडून ही परिषद होईल. यात देश-विदेशातील गुंतवणूकदार सहभागी होतील. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणSuresh Prabhuसुरेश प्रभू