शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सरकारी योजनांचा लाभ घ्या - मुख्यमंत्री

By काशिराम म्हांबरे | Updated: December 9, 2023 15:27 IST

हळदोणा मतदार संघातील उसकई-पुनोळा- पालयेंपंचायत क्षेत्रातील संपन्न झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री बोलत होते.

म्हापसा:  केंद्र सरकारने लोकांच्या हितार्थ सुरु केलेल्या विविध योजनांचा लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. हळदोणा मतदार संघातील उसकई-पुनोळा- पालयेंपंचायत क्षेत्रातील संपन्न झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष राज्य सभेचे खासदार सदानंद तानावडे, माजी आमदार ग्लेन टिकलो, पंचायतीच्या उपसरपंचा रिया मयेकर, इतर पंच सदस्य सरकारच्या विविध खात्यातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सरकारच्या विविध योजनांवर मोठ्या प्रमाणात जागृती केली जाते. ज्यांना या योजनांचा लाभ मिळालेला नाही त्यांच्यापर्यंत अशा योजना पोहचवण्याचा प्रयत्न स अशा यात्रेतून केला जातो. पंतप्रधान विमा योजना, उज्वला योजना, आवास योजना, स्वामीत्व योजना तसेच इतर योजनांचा लाभ लोकांनी घ्यावा. अशा प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांचा नक्कीच लाभ होणार असाही विश्वास मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केला.

यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी बोलताना केंद्र सरकारने आपल्या विविध योजनातून लोकांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. एखादा लाभार्थी मागे राहिल्यास त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून लाभ घ्यावा अशीही सुचना नाईक यांनी केली. देशाचा विकास हा सामान्य लोकांच्या विकासावर अवलंबून असून सामान्य लोक जेव्हा योजनांचा लाभ घेईल तेव्हाच देश विकसित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सदानंद तानावडे यांनी आपले विचार मांडले. २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदि यांनी देशात केलेल्या विकासाची, तयार केलेल्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवणे हा असल्याचे सांगितले. गोव्यात ही यात्रा पूर्ण यशस्वी झाल्याचाही दावा त्यांनी केला. आरंभी या यात्रेचे स्वागत श्रीपाद नाईक तसेच तानावडे यांनी केले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत