शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

बोगस विमा कंपन्यांवर कारवाई करा

By admin | Updated: August 13, 2016 02:03 IST

पणजी : राज्यात गेल्या काही वर्षांपासून बचत करण्यास प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली विविध कंपन्यांनी लोकांचे पैसे लुटले आहेत.

पणजी : राज्यात गेल्या काही वर्षांपासून बचत करण्यास प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली विविध कंपन्यांनी लोकांचे पैसे लुटले आहेत. ह्युमन राईट डिफेन्डर्स संघटनेने २0१४ साली पॅनकार्ड क्लब आणि आरटीएससी लिमिटेड, सिट्रस या कंपन्यांची पोलिसांत तक्रार करूनही आतापर्यंत त्यांची चौकशी करण्यात आलेली नाही. आता समृद्ध जीवन सोसायटी आणि टीएम शॉपी या कंपन्यांनी लोकांची आर्थिक फसवणूक केली. सरकारने येत्या १० दिवसांत या कंपनीकडून नागरिकांचे पैसे वसूल केले नाहीत तर आंदोलन करू, असा इशारा ह्युमन राईट डिफेन्डर्स संघटनेने पत्रकार परिषदेत दिला. संघटनेचे अध्यक्ष एडविन फर्नांडिस म्हणाले, गेल्या काही वर्षांत म्हापसा, डिचोली, साखळी या भागांत ‘बचत’, ‘विमा’ या क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या संस्था स्थापन झाल्या. या संस्थांचे मालक बिगर गोमंतकीय असतात. संस्था स्थापन केल्यानंतर काही लोकांना सदस्य बनवून घेतले जाते व त्यांच्याकडून सदस्य करून घेण्यासाठी साखळी रचली जाते. या साखळीप्रमाणे त्यांना कमिशन दिले जाते. अधिक व्याज मिळत असल्याने आणि योजनेत पैसे गुंतविण्यासाठी आग्रह करणारे लोक ओळखीचे असल्याने नवीन सदस्य अशा संस्थांमध्ये पैसे गुंतवतात. अशा संस्थांमध्ये पैसे गुंतविणाऱ्यांत महिलांचे प्रमाण जास्त आहे, असे फर्नांडिस यांनी सांगितले. विविध शहरांत अशा संस्थांना सरकारी अधिकाऱ्यांकडून परवानगी दिली जाते. या वेळी या संस्थांची चौकशी का होत नाही, असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे. सरकारकडून अशा फसव्या कंपन्यांची सूची करून नागरिकांत जागृती करण्याची आवश्यकता आहे. संघटनेने तक्रार केलेल्या कंपन्यांची चौकशी करून लोकांचे पैसे परत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. याबाबत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी त्वरित चौकशीचा आदेश द्यावा. येत्या १० दिवसांत लोकांना त्यांचे पैसे परत मिळण्याबाबत प्रयत्न करावा. अन्यथा आंदोलन करू, असा इशारा संघटनेने दिला आहे. या वेळी संघटनेचे विविध भागांतील सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)