शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

लोकांना सतावणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करू, मुख्यमंत्र्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 20:12 IST

पालिका, ग्रामपंचायती, पोलिस खाते यांनी लोकांची कामे व तक्रारी खूप गंभीरपणे घ्यायला हव्यात.

पणजी : राज्यातील जे सरकारी कर्मचारी लोकांची कामे करणो टाळतात व जे लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात, अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी आपला पहिला जनता दरबार मंत्रलयात घेतल्यानंतर दिला.

मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रीपदी असताना दर महिन्याला एकदा जनता दरबार घ्यायचे. आपल्याला दोन महिने निवडणूक आचारसंहितेमुळे असा दरबार आयोजित करता आला नाही. गुरुवारी आपण दोन ते तीन तासांत शंभरपेक्षा जास्त लोकांना भेटलो. ग्रामीण भागात प्रशासन कसे चालते ते मला जाणून घ्यायचे होते. लोकांनी अनुभव सांगितले व तक्रारीही केल्या.

पालिका, ग्रामपंचायती, पोलिस खाते यांनी लोकांची कामे व तक्रारी खूप गंभीरपणे घ्यायला हव्यात. लोकांचे अर्ज अनेक ठिकाणी प्रलंबित उरतात. लोकांच्या कामांना सरकारी कर्मचा-यांनी प्राधान्याने न्याय द्यावा. कामचुकार व असंवेदनशील कर्मचारी व अधिका-यांना यापुढे कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा मी आताच देऊन ठेवतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कुणाच्या घरांचा, कुणाच्या शौचालयांच्या बांधकामांचा तर कुणाच्या पोलिस तक्रारीविषयीचा अनुभव मला पहिल्या जनता दरबारावेळी ऐकायला मिळाला. प्रशासन खूप सक्रिय करण्याची गरज आहे कळून आले. आज शिवराज्यभिषेक दिन आहे. आम्हाला शिवरायांचे सुशासन गोव्यात आणायचे आहे. पोलिस खात्याच्या कामातही सुधारणा करावी लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. आपण रोज सकाळी साखळीतही माझ्या निवासस्थानी गोवाभरातील लोकांना भेटतो, असे सावंत यांनी नमूद केले.

दरम्यान, सर्व मंत्र्यांनी लोकांसाठी दर सोमवारी पर्वरीच्या मंत्रलयात बसावे आणि दर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली जावी, असे काही मंत्र्यांना अपेक्षित आहे, असे एका मंत्र्याने लोकमतला सांगितले. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे याबाबत चर्चाही केली आहे. नोकर भरतीच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करून वेगाने नोकर भरती केली जावी, असाही मुद्दा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडला आहे. प्रशासनाची पकड घेण्यासाठी सर्वानाच थोडा वेळ लागेल, असेही हे मंत्री म्हणाले.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा