शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गोव्यातील मराठी अकादमीचे ग्रहण सुटता सुटेना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 11:33 IST

स्व. नारायण आठवले, स्व. शशिकांत नार्वेकर अशा दिग्गजांच्या नेतृत्वाखाली 1980च्या दशकात गोमंतकीय समाजाच्या आर्थिक पाठबळावर स्थापन झालेली गोमंतक मराठी अकादमी आता पुन्हा एकदा वादात सापडली आहे.

पणजी : स्व. नारायण आठवले, स्व. शशिकांत नार्वेकर अशा दिग्गजांच्या नेतृत्वाखाली 1980च्या दशकात गोमंतकीय समाजाच्या आर्थिक पाठबळावर स्थापन झालेली गोमंतक मराठी अकादमी आता पुन्हा एकदा वादात सापडली आहे. अकादमीला लागलेले ग्रहण अजुनही सुटत नसल्याने अकादमीवर श्रद्ध ठेवून असलेल्या गोव्यातील मराठीप्रेमींमध्ये वेदनेची भावना व्यक्त होत आहे.

मोठ्या हिंसक आंदोलनानंतर गव्यात सरकारने 1987च्या सुमारास कोंकणीला राजभाषेचा दर्जा दिला व मराठीला सहभाषेचे स्थान दिले. त्याचप्रसंगी गोवाभरातील मराठीप्रेमींनी एकत्र येऊन गोमंतक मराठी अकादमीची स्थापना केली. गोव्यात मराठी भाषा व संस्कृतीचे  संवर्धन करण्यासाठी गेली अनेक वर्षे अकादमीने वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले. महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकांना सतत गोव्यात निमंत्रित करून त्यांचे विचार ऐकण्याची संधी गोमंतकीयांना दिली. मात्र अलिकडे अकादमीमध्ये दोन गट पडले आणि निर्माण झालेल्या वादामुळे सरकारने अकादमीला अनुदान देणे बंद केले. तसेच लोकांनी स्थापन केलेल्या या अकादमीला पर्याय म्हणून गोवा सरकारने नवी सरकारी अकादमी स्थापन केली. ती सरकारी अकादमीही विविध उपयुक्त उपक्रम राबवत आहे.

87 नंतर स्थापन झालेल्या गोमंतक मराठी अकादमीच्या निवडणुका गेल्या ऑगस्टच्या अखेरीस पार पडल्या व प्रदीप घाडी आमोणकर हे अध्यक्षपदी निवडून आले. मात्र तिस दिवस झाले तरी अजुनही अकादमीचे सचिव सुदेश आर्लेकर यांनी अकादमीची चावी आणि अकादमीची एकूण सूत्रे नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीकडे सोपविली नाही. यामुळे अकादमी पुन्हा चर्चेत आली आहे. आपल्याला नाईलाजास्तव सचिवांविरुद्ध न्यायालयात जावे लागेल, असा इशारा प्रदीप आमोणकर यांनी लोकमतशी बोलताना दिला आहे. सचिव आर्लेकर यांनीही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग घेतला होता. ते हरले. तथापि, अकादमीने घटना दुरूस्तीला मान्यता घेतली नाही. तसेच बेकायदा निवडणूक घेतली व एकूण प्रक्रिया नियमबाह्य पार पडल्यामुळे आपण अकादमीची चावी देत नाही आणि सूत्रेही देणार नाही, असे आर्लेकर यांनी आता प्रथमच जाहीर केले आहे. फेरनिवडणूक घ्या किंवा माझ्याकडे कायदेशीर पद्धतीने चावी व ताबा मागण्यासाठी या मग आपण चावी देईन असे आर्लेकर म्हणाले. एकंदरीत या वादामुळे गेले महिनाभर अकादमी बंद आहे. तिचे कुलूप काढले गेलेले नाही.